शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

श्वासाच्या झुंझीशी लढणारे मुकुल गरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 03:33 IST

रुग्णांना करतात समुपदेशन; आर्थिक मदतही दिली मिळवून

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याणमध्ये राहणारे मुकुल गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. त्याचे निदान उशिरा झाले. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी दोनच वर्षे जगू शकाल, असे सांगितले. मात्र, ते आता ५० वर्षांचे आहेत. हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना उपचारासाठी त्यांनी समुपदेशन तसेच मागदर्शन करून मदत मिळवून दिली आहे.आईच्या गर्भात असतानाच गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. मात्र, १६ व्या वर्षी त्याचे निदान झाले. हृदयाच्या झडपांनाच छिद्र असल्याने त्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. ते दोनच वर्षे जगतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. गरे यांनी शालेय व पदवी शिक्षण घेतल्यावर मेडिकल रिप्रेंझेटेटिव्हची नोकरी पत्करली. हृदयाला छिद्र असल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही. मात्र, ४० व्या वर्षी त्यांनी एका विधवा महिलेशी विवाह केला. तिला त्यांनी तिच्या मुलासह स्वीकारले. त्यांचा वैद्यकीय व्यवसायाशी तसा चांगला संबंध आला.हृदयाला छिद्र असलेल्यांना काय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव गरे यांना होती. हा आजार मुलाला आईच्या गरोदरपणात होतो. आईने चुकीचे औषध उपचार घेतल्यास, तसेच फास्टफूड व बदलती आहारशैली यामुळेही हा आजार होतो. पूर्वी याचे निदान लवकर होत नव्हते. मात्र, आता निदानाचे प्रमाण वाढले आहे. हृदयाला छिद्र असलेल्यांना गरे समुपदेशन करतात. उपचारासाठी आर्थिक कुवत नसलेल्यांना ते राजीव गांधी आरोग्य योजनेतून उपचारासाठी मदत मिळवून देतात. काही वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे. गरे यांना हृदयविकार तज्ज्ञ चैतन्य गोखले यांची मदत मिळते. त्याचबरोबर त्यांनी ‘झुंज श्वासाशी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे.गरे म्हणाले, रायपूर येथील मोठ्या रुग्णालयात हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया होते. परंतु, तेथे प्रतीक्षा यादी जास्त आहे. त्यामुळे निदान झाले आणि तातडीने शस्त्रक्रिया झाली, असे होत नाही. एका रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. सामान्यांना हा खर्च परवडत नाही. राज्य सरकारने मुंबईत या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी रायपूर रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय उभे करावे, अशी मागणी गारे यांनी केली आहे. त्याचा फायदा खेड्यापाड्यातील रुग्णांना होऊ शकतो. त्यासाठी रायपूरला जाण्याची गरज भासणार नाही.सव्वासहा लाख रुग्णगरे म्हणाले, हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना प्राणवायू कमी मिळतो. हिमोग्लोबिन वाढते. दर वेळी २५० ते ३०० मिलीलिटर रक्त काढावे लागते. भारतात एक लाख लोकांमागे ५० जणांना हा आजार आढळून येते. सध्या देशात या आजाराचे सव्वासहा लाख रुग्ण आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणHealthआरोग्य