शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

श्वासाच्या झुंझीशी लढणारे मुकुल गरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 03:33 IST

रुग्णांना करतात समुपदेशन; आर्थिक मदतही दिली मिळवून

- मुरलीधर भवारकल्याण : कल्याणमध्ये राहणारे मुकुल गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. त्याचे निदान उशिरा झाले. त्यावेळी त्यांना डॉक्टरांनी दोनच वर्षे जगू शकाल, असे सांगितले. मात्र, ते आता ५० वर्षांचे आहेत. हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना उपचारासाठी त्यांनी समुपदेशन तसेच मागदर्शन करून मदत मिळवून दिली आहे.आईच्या गर्भात असतानाच गरे यांच्या हृदयाला छिद्र होते. मात्र, १६ व्या वर्षी त्याचे निदान झाले. हृदयाच्या झडपांनाच छिद्र असल्याने त्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. ते दोनच वर्षे जगतील, असे डॉक्टरांनी सांगितले होते. गरे यांनी शालेय व पदवी शिक्षण घेतल्यावर मेडिकल रिप्रेंझेटेटिव्हची नोकरी पत्करली. हृदयाला छिद्र असल्याने त्यांनी लग्नाचा विचार केला नाही. मात्र, ४० व्या वर्षी त्यांनी एका विधवा महिलेशी विवाह केला. तिला त्यांनी तिच्या मुलासह स्वीकारले. त्यांचा वैद्यकीय व्यवसायाशी तसा चांगला संबंध आला.हृदयाला छिद्र असलेल्यांना काय त्रास सहन करावा लागतो, याची जाणीव गरे यांना होती. हा आजार मुलाला आईच्या गरोदरपणात होतो. आईने चुकीचे औषध उपचार घेतल्यास, तसेच फास्टफूड व बदलती आहारशैली यामुळेही हा आजार होतो. पूर्वी याचे निदान लवकर होत नव्हते. मात्र, आता निदानाचे प्रमाण वाढले आहे. हृदयाला छिद्र असलेल्यांना गरे समुपदेशन करतात. उपचारासाठी आर्थिक कुवत नसलेल्यांना ते राजीव गांधी आरोग्य योजनेतून उपचारासाठी मदत मिळवून देतात. काही वर्षांपासून त्यांचे हे काम सुरू आहे. गरे यांना हृदयविकार तज्ज्ञ चैतन्य गोखले यांची मदत मिळते. त्याचबरोबर त्यांनी ‘झुंज श्वासाशी’ हे पुस्तक लिहिले आहे. त्याची दुसरी आवृत्ती निघाली आहे.गरे म्हणाले, रायपूर येथील मोठ्या रुग्णालयात हृदयाच्या छिद्रावर शस्त्रक्रिया होते. परंतु, तेथे प्रतीक्षा यादी जास्त आहे. त्यामुळे निदान झाले आणि तातडीने शस्त्रक्रिया झाली, असे होत नाही. एका रुग्णाला शस्त्रक्रियेसाठी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो. सामान्यांना हा खर्च परवडत नाही. राज्य सरकारने मुंबईत या आजाराच्या रुग्णांवर उपचारासाठी रायपूर रुग्णालयाच्या धर्तीवर रुग्णालय उभे करावे, अशी मागणी गारे यांनी केली आहे. त्याचा फायदा खेड्यापाड्यातील रुग्णांना होऊ शकतो. त्यासाठी रायपूरला जाण्याची गरज भासणार नाही.सव्वासहा लाख रुग्णगरे म्हणाले, हृदयाला छिद्र असलेल्या रुग्णांना प्राणवायू कमी मिळतो. हिमोग्लोबिन वाढते. दर वेळी २५० ते ३०० मिलीलिटर रक्त काढावे लागते. भारतात एक लाख लोकांमागे ५० जणांना हा आजार आढळून येते. सध्या देशात या आजाराचे सव्वासहा लाख रुग्ण आहेत.

टॅग्स :kalyanकल्याणHealthआरोग्य