शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांकडे आरोपांशिवाय काही उरलेलं नाही"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी हुतात्म्यांना वाहिली आदरांजली
2
‘आधी बूथ कॅप्चर व्हायचं, आता उमेदवारच पळवले जाताहेत’, इंदूरमधील घटनेवरून काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
3
महाराष्ट्राच्या लुटारुंना लोकसभा निवडणुकीत जागा दाखवू; उद्धव ठाकरेंचा घणाघात
4
Delhi DPS Bomb Threat : दिल्लीतील शाळेला ईमेलद्वारे बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी दाखल
5
१०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी
6
काहीही किंमत द्यायला लागली तरी चालेल, पण...; शरद पवारांचा भाजपाला इशारा
7
Success Story : स्कूल ड्रॉपआऊट, जे बनले देशातील सर्वात श्रीमंत ज्वेलर; देश-विदेशात पसरलाय व्यवसाय
8
आरक्षण, घटनेवर खोटा प्रचार सुरू; ४०० हून अधिक जागा जिंकणार : गृहमंत्री शाह
9
भाजप राज्यघटना फाडूनच फेकेल; घटनेची प्रत हाती धरून राहुल गांधी यांचा दावा
10
VIDEO : महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंचं रिल, महाराष्ट्रातील जनतेला केलं विशेष आवाहन
11
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
12
मुख्यमंत्री महिलांच्या कपड्यांकडेच बघत असतात, कारण काय? माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांचा नितीश कुमारांवर पलटवार
13
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
14
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
15
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
16
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
17
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
18
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
19
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
20
लालूंच्या कन्येकडे १५.८२ कोटींची संपत्ती; कोणतेही कर्ज नाही

२७ गावांचे प्रश्न न सोडवल्यास लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2019 2:48 AM

कल्याण-डोंबिवली महापालिकेत २०१५ मध्ये परिसरातील २७ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांतील समस्या व प्रश्न येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी न सोडवल्यास तेथील नागरिक, मतदार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेत २०१५ मध्ये परिसरातील २७ गावे समाविष्ट करण्यात आली. या गावांतील समस्या व प्रश्न येत्या लोकसभा निवडणुकीपूर्वी न सोडवल्यास तेथील नागरिक, मतदार लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा सर्वपक्षीय युवा मोर्चाने राज्यपालांना पाठवलेल्या निवेदनात दिला आहे.केडीएमसीतून २७ गावे वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्याची मागणी सरकारदरबारी प्रलंबित आहे. हा मुद्दा अधिवेशनातही उपस्थित केला गेला आहे. याप्रकरणी तीन याचिका न्यायप्रविष्ट आहेत. सरकारने स्वतंत्र पालिका स्थापन करण्याचे दिलेले आश्वासन पाळलेले नाही. तसेच स्वतंत्र नगरपालिकेसाठी ७ सप्टेंबर २०१५ च्या अधिसूचनेची पूर्तता केलेली नाही, असे निवेदनात म्हटले आहे.कल्याण ग्रोथ सेंटर उभारण्यासाठी सरकारने एक हजार ८९ हेक्टर जागेवर एक हजार ८९ कोटी रुपये खर्च केले जातील, अशी घोषणा केली. मात्र, ग्रोथ सेंटरची एकही वीट रचलेली नाही. ग्रोथ सेंटर बाधितांसोबत सकारात्मक चर्चा केलेली नाही. त्यामुळे ग्रोथ सेंटरचा तिढा अद्याप कायम आहे. ग्रोथ सेंटरमध्ये बांधकाम परवानगी बिल्डरांना दिली जाते. मात्र, भूमिपुत्रांना परवानगी नाकारली जाते. २७ गावांमध्ये घरांच्या नोंदणीसंदर्भात सरकारचा कोणताही आदेश नसतानाही ती बंद करण्यात आली आहे. भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्याच्या रस्ता रुंदीकरणात बाधित होणाऱ्या प्रकल्पग्रस्तांना मोबदला दिल्याशिवाय रस्त्याचे काम सुरू करू नये, अशी मागणी निविदनात करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी २७ गावांतील प्रश्न सोडवावेत. अन्यथा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येईल, असा इशारा युवा मोर्चाने दिला आहे.‘ते’ गुन्हे मागे घ्यानेवाळीतील शेतकºयांनी जमिनी परत मिळाव्यात, या मागणीसाठी आंदोलन केले. परंतु, पोलिसांनी त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. ते गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणीही केली आहे.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाdombivaliडोंबिवली