शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
4
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
5
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
6
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
7
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
8
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
9
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
10
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
11
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
12
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
13
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
14
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
15
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
16
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
17
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
18
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
19
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
20
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

खरीप हंगामात अंबरनाथ तालुक्यात यंदा काळा भात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:29 IST

बदलापूर : बळीराजाला आणि नागरिकांना असे दोघांनाही अतिशय लाभदायक असलेल्या काळ्या भाताचे वाण तालुका कृषी खात्याच्या पुढाकाराने तयार ...

बदलापूर : बळीराजाला आणि नागरिकांना असे दोघांनाही अतिशय लाभदायक असलेल्या काळ्या भाताचे वाण तालुका कृषी खात्याच्या पुढाकाराने तयार करण्यात यश आले आहे. खरीप हंगामासाठी पाचशे किलो काळ्या भाताचे वाण तयार केले आहे. त्यामुळे यंदा प्रथमच अंबरनाथ तालुक्यात सुमारे अडीच टन काळ्या भाताचे उत्पन्न येऊ शकेल, असा विश्वास कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

गेल्या काही वर्षांत पावसाचे तंत्र बिघडले आहे. कधी जास्त पाऊस तर कधी कमी पाऊस, यामुळे खरीप हंगामातील भात हे मुख्य पीक कमालीचे बेभरवशाचे झाले आहे. गेल्या वर्षी हातातोंडाशी आलेले पीक पावसाळा लांबल्याने वाया गेले होते. यावर उपाय म्हणून कृषी विभागाने अभ्यास करून अतिवृष्टीतही तग धरू शकणाऱ्या काळ्या भाताचे वाण स्थानिक शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे सुरू केले आहे.

यंदा अंबरनाथ तालुक्यात काही निवडक शेतकऱ्यांना कृषी विभागाने उन्हाळी हंगामात काळ्या भाताचे २५ किलो बियाणे लागवडीसाठी दिले होते. त्यापासून आता ५०० किलो काळ्या भाताचे बियाणे तयार झाले आहे.

या भाताचे वैशिष्ट्य म्हणजे काळा तांदूळ हा आरोग्यदायी आणि पौष्टिक आहे, त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते. मधुमेहीसुद्धा हा भात खाऊ शकतात, त्यामुळे काळा भात हा नागरिकांच्या हिताचा आहे. काळा भात कितीही जोरात पाऊस पडला तरी तो शेतात उभा राहतो. या भाताच्या पिकाची उंची पाच ते सहा फूट इतकी असते, तसेच या भाताचा पेंढा अधिक काटक असतो. पूरजन्य परिस्थिती अथवा अतिवृष्टीतही तो वाकत नाही. त्यामुळे काळ्या भाताचे पीक वाया जात नाही. सर्वसाधारण तांदळाच्या तुलनेत काळा तांदूळ शेतकऱ्यांना जवळपास दुप्पट भाव मिळवून देतो. त्यामुळे काळ्या भाताची लागवड करणे शेतकऱ्यांच्या हिताचे आहे. साध्या भात लागवडीतून शेतकऱ्यांना प्रति किलो २० ते २५ रुपये मिळतात. काळा तांदूळ पन्नास रुपये किलो भावाने विकला जातो. बाजारात या तांदळाचा ८० ते १०० रुपये किलो भाव आहे. परिणामी, काळा भात हा शेतकऱ्यांना जसा लाभदायक आहे तसाच तो नागरिकांच्या हिताचा आहे.

अंबरनाथ तालुक्यातील चांदप येथे उन्हाळी हंगामात लावलेल्या काळ्या भाताची कापणी करण्यास प्रारंभ करण्यात आला.

-------------

फोटो आहे.