शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: 'हा' आहे पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड! कटामध्ये तिघांचा समावेश
2
Pahalgam Attack Update : पाकिस्तानच्या 'उरी' धडधड वाढली! सर्जिकल स्ट्राईकची भीती; रात्रीपासूनच हवाई दलाला केले ॲलर्ट
3
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
4
रिझर्व्ह बँकेनं छत्रपती संभाजीनगर येथील 'या' बँकेचा परवाना केला रद्द, जमा रकमेचं काय होणार? 
5
हृद्रयद्रावक! काश्मीर खोऱ्यात पतीच्या मृतदेहाशेजारी निस्तब्ध पडून राहिली नवी नवरी
6
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
7
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
8
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
9
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
10
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
11
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
12
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
13
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
14
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
15
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
16
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
17
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
18
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
19
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
20
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."

भाजप-मनसेचे सोशल मीडियावर वॉर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 00:21 IST

उमेदवाराचे शिक्षण, लोडशेडिंगचे मुद्दे चर्चेत : चौकसभा, रॅलींवर भर

डोंबिवली : डोंबिवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, मनसेचे मंदार हळबे व काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांच्यात तिरंगी लढत होत आहे. डोंबिवलीतील प्रचार रस्त्यापेक्षा सोशल मीडियावर अधिक जोमाने सुरू आहे. उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपासून लोडशेडिंगपर्यंत अनेक मुद्द्यांवरील आरोप-प्रत्यारोपांनी व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर कळस गाठला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे चव्हाण यांच्याकडे कोकणपट्ट्यातील ३९ विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांचे दौरे सुरू आहेत, त्यामुळे ते मतदारसंघामध्ये फारसा वेळ देत नसले तरी भाजप, शिवसेनेचे सर्व नगरसेवक कामाला लागले असून गल्लोगल्ली प्रचार सुरू आहे. त्यातच, पश्चिमेला नगरसेवक विकास म्हात्रे, राजन सामंत, पूर्वेला राहुल दामले, मुकुंद पेडणेकर हे निवडणूक प्रभारी म्हणून काम बघत आहेत.

चौकसभा, रॅली यावर सर्वच पक्षांनी जोर दिला आहे. मनसेच्या उमेदवारासाठी पक्षाचे नेते अविनाश अभ्यंकर, राजन गावंड हे प्रचाराला आले होते. तसेच पश्चिमेकडील पक्षाचे नगरसेवक, पदाधिकारी हे सकाळपासून जनसंपर्कावर भर देत आहेत. हळबेंसोबत शहराध्यक्ष राजेश कदम हे रॅलीत सहभागी होत आहेत. तसेच हळबे हे ठिकठिकाणी सोसायटी मीटिंगवर भर देत आहेत. सकाळच्या वेळेत पुसाळकर उद्यानासह क्रीडासंकुल, जिमखाना अशा सार्वजनिक ठिकाणी जाऊन ज्येष्ठ नागरिक, प्रतिष्ठितांच्या भेटी घेत आहेत. तसेच जनसामान्यांच्या असलेल्या अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

काँग्रेसकडून आतापर्यंत कोणतीही सभा झालेली नाही. परंतु, प्रदेशपातळीवरून चारुलता टोकस, बी.एन. संदीप असे नेते या ठिकाणी येऊन गेले. त्यांनी कार्यकर्ते, नगरसेवकांशी संवाद साधला. भाजपने प्रचारासाठी कोणतेही मोठे नेते अद्याप या ठिकाणी बोलावले नसले, तरी राज्यमंत्री चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पहाटेपर्यंत बैठका, सकाळच्या वेळेत कामाचे वाटप आणि प्रत्यक्ष प्रचार असे काम सुरू आहे.

शहरात काहीच झाले नाही, ही मनसेची टीका खोडून काढण्यासाठी भाजपने हिंदुत्ववादी विचारांचे व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे यांना मैदानात उतरवले असून त्यांच्या आतापर्यंत २० हून अधिक चौकसभा झालेल्या आहेत. मनसेने भाजपच्या राज्यमंत्र्यांनी गेल्या १० वर्षांत मतदारसंघाचा विकास केलेला नाही, हे मतदारांवर ठसवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामध्ये माणकोली प्रकल्प कसा अर्धवट असून राज्यमंत्र्यांनी त्यांच्या जाहीरनाम्यात तो पूर्ण झाल्याचे सांगून जनतेची दिशाभूल केली असल्याचा आरोप केला आहे. सोशल मीडियावर विकासाच्या मुद्द्यावरून भाजप, मनसेमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत.मनसेचा आरोप भाजपने काढला खोडूनआमदार रवींद्र चव्हाण यांनी शहर लोडशेडिंगमुक्त केले नाही, अशी टीका मनसेने केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून सर्वप्रथम डोंबिवली हे शहर चव्हाण यांनी लोडशेडिंगमुक्त कसे केले, याचे व्हिडीओ भाजपने प्रसृत केले. मनसे उमेदवाराचा आपण उच्चशिक्षित असल्याचा मुद्दादेखील भाजपने खोडून काढला. त्यावर मनसे उमेदवाराने मी उच्चशिक्षित नव्हे सुशिक्षित असल्याचे म्हटले.रा.स्व. संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांपासून स्वयंसेवकांपर्यंत सगळेच मतदारांच्या व मुख्यत्वे ज्येष्ठ नागरिक संघ, युवावर्ग, महिला मंडळ तसेच सर्वधर्मीयांच्या संस्था पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. अन्य निवडणुकांसारख्या जेवणावळी यावेळी दिसल्या नाही. अन्य पक्षांसह अपक्ष उमेदवारही त्यांच्या परीने प्रचार करीत आहेत.

टॅग्स :MNSमनसेBJPभाजपाdombivali-acडोंबिवलीMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019