शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

भाजपपाठोपाठ मनसेचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:40 IST

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा व्यवस्थापन करवसुलीस सुरुवात केली आहे. या करवसुलीस भाजपने विरोध केला आहे. भाजपच्या पाठोपाठ आता ...

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेने कचरा व्यवस्थापन करवसुलीस सुरुवात केली आहे. या करवसुलीस भाजपने विरोध केला आहे. भाजपच्या पाठोपाठ आता मनसेनेही कचरा करवसुलीस विरोध केला आहे. कराची ही वसुली त्वरित रद्द करण्यात यावी, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.

आमदार पाटील यांनी यासंदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निदर्शनास ही बाब आणली आहे. महापालिकेने कचरा व्यवस्थापनापोटी प्रत्येक मालमत्ताधारकास दाेन रुपये दररोज शुल्क आकारले आहे. महिन्याला ६० रुपये आणि वर्षाला ७२० रुपये कचरा करापोटी नागरिकांना द्यावे लागणार आहेत. ही करवसुली एप्रिल २०२१ पासून महापालिकेने सुरू केली आहे. महापालिका कचरा वर्गीकरणासाठी शून्य कचरा मोहीम मे २०२० पासून महापालिका हद्दीत राबवीत आहे. कचरा वर्गीकरण मोहीम १०० टक्के यशस्वी झालेली नाही. त्याचबरोबर कचराकुंड्या हटविल्याने नागरिक कुठेही रस्त्यावर कचरा टाकत आहेत. महापालिकेचे कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेनिशी सुरू नाहीत. काही प्रकल्प निर्माणाधीन आहेत. याशिवाय कचरा डम्पिंग ग्राऊंड बंद झालेले नाही. कचरा वर्गीकरण आणि व्यवस्थापनासह विल्हेवाट प्रकल्प पूर्ण सुरू झालेले नसताना, अशा प्रकारचा कर वसूल करणे कितपत योग्य आहे, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. पालिका हद्दीतील २७ गावांचा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे. ही गावे महापालिकेतून वगळली जातात. कधी महापालिकेत समाविष्ट केली जातात. या सरकारच्या धरसोडवृत्तीमुळे या गावातील कचराप्रश्न कायम आहे. मार्च २०२० पासून कोरोनाचे संकट आहे. या संकटनामुळे नागरिकांच्या हातचा रोजगार गेला आहे. त्याचबरोबर काहींना वेतनकपातीचा झटका बसला आहे. अशा परिस्थितीत नागरिकांकडून कचरा कर वसूल करणे कितपत योग्य आहे, असा प्रश्न आहे.

सूट देण्याऐवजी भुर्दंड

महापालिका सर्व प्रकारचे कर मिळून नागरिकांकडून मालमत्ता करापोटी ७१ टक्के कर वसूल करतो. नागरिकांना करात सूट देण्याऐवजी महापालिकेने बिल्डरांना सूट दिली आहे. आधीच ७१ टक्के कर भरणाऱ्यांना नागरिकांना आता कचरा कराचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. कचरा करवसुली तातडीने स्थगित करावी, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.

------------------------