शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंडिया आघाडी' तुटणार? बिहारमधील पराभवानंतर, काँग्रेसवर एकट्याने निवडणूक लढण्याचा वाढला दबाव
2
'माझ्या प्रियकराला भैय्या म्हणायचीस, आता बाबू बोलतेस'; दोन तरुणींचा रस्त्यातच राडा, केस ओढून मारहाण; व्हिडीओ व्हायरल
3
कुठे तोडफोड, कुठे राडा; उमेदवारीवरून राज्यभरात दिसला 'हायव्होल्टेज ड्रामा'! इच्छुकांचे नेत्यांपुढे रडगाणे...
4
पाकिस्तानात मोठी खळबळ! लष्कर मुख्यालयात लष्करप्रमुखांच्या मुलीचा निकाह; फोटो का आले नाहीत समोर?
5
नवीन वर्ष २०२६ मध्ये PM Kisan योजनेचा २२ वा हप्ता कधी जारी होईल? कोणाला मिळणार नाहीत पैसे, जाणून घ्या
6
२००३ मध्ये भारताच्या हातातला वर्ल्डकप हिसकावणारा फलंदाज कोमामध्ये; ऑस्ट्रेलियाचा स्फोटक दिग्गज मृत्यूशी देतोय झुंज
7
भारत-पाक संघर्षात चीनची उडी! "आम्हीच केली मध्यस्थी"; ट्रम्प यांच्यानंतर आता 'ड्रॅगन'चा नवा दावा
8
टार्गेट पूर्ण...! केंद्र सरकारने 'या' इलेक्ट्रिक वाहनांवरील सबसिडी बंद केली; टू-व्हीलर, कारही रांगेत...
9
Union Bank of India मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,२३९ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
10
६ राशींचे धनलाभाने २०२६ नववर्ष सुरू, यश-प्रगती; समृद्धी-भरभराट, तुमच्या राशीवर कसा प्रभाव?
11
निवडणुकीला समोरे जाण्यापूर्वी योगी आदित्यनाथ अखेरचा डाव टाकणार; संक्रांतीनंतर अनेक मंत्र्यांना डच्चू देणार, मंत्रिमंडळाचा विस्तार करणार...
12
गुड न्यूज! रेल्वे तिकिटावर ३ टक्के सवलत; प्रवाशांना आर्थिक दिलासा
13
भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था; जपानला टाकले मागे; केंद्र सरकारची अधिकृत घोषणा
14
सैन्य भरतीची तयारी करत होता, पण प्रेमाच्या जाळ्यात अडकला; प्रेयसीच्या एका फोन कॉलने घात केला!
15
नाराज निष्ठावंतांचा उद्रेक, थेट नेत्यांनाच शिव्यांची लाखोली! वर्षानुवर्षे पक्षनिष्ठा जपणारे, सतरंज्या उचलणारे भाजप कार्यकर्ते भडकले
16
नातेवाईकच उदंड झाले कार्यकर्ते वाऱ्यावर उडाले, ३० नेत्यांसह ११६ नातेवाईक निवडणूक रिंगणात
17
आजचे राशीभविष्य ३१ डिसेंबर २०२५ : सरत्या वर्षाचा शेवट कोणासाठी गोड होणार? कसा असेल आजचा दिवस...
18
तिसरं महायुद्ध अन् मोठी आपत्ती...! 2026 साठी बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
19
सावधान! मोबाईलमध्ये 'हे' गाणे आढळल्यास थेट तुरुंगवास; चीनने लादले कडक निर्बंध
20
KDMC: मतदानाआधीच भाजपच्या रेखा चौधरी विजयी? कल्याण- डोंबिवली महापालिकेत नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवलीचा बालेकिल्ला भाजपने राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:17 IST

जातीच्या राजकारणाला मतदारांनी झिडकारले

- अनिकेत घमंडीडोंबिवली : डोंबिवली मतदारसंघातील विजयाची परंपरा कायम राखत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. चव्हाण यांनी ८६ हजार २२७ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा ४१ हजार ३११ मतांनी पराभव केला. हळबे यांना ४४ हजार ९१६, तर तिसºया क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते यांनी सहा हजार ६१३ मते मिळवली. नोटाचे प्रमाण वाढले असून चार हजार ९१ मतदारांनी नोटाला पसंती दिली. जनसंघापासून बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील विजय स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत चव्हाण यांनी पश्चिमेकडील मोठागाव येथून १५०० मतांची आघाडी घेतली. मात्र, तिसºया फेरीत चव्हाण आणि हळबे यांना मिळालेल्या मतांमध्ये अवघे ३४ मतांचे अंतर होते. मात्र, तिन्ही फेऱ्यांमधील १५०० मतांची आघाडी कायम होती. त्यानंतर, चव्हाण यांची आघाडी वाढत गेली. हळबे यांनाही पश्चिमेला चांगली मते मिळाली, पण पूर्वेत भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले.

हळबे यांना ते ज्या रामनगर या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले, तेथेही मते मिळाली नसल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना अवघी सहा हजार ६१३ मते मिळाली. काँग्रेसचे या ठिकाणी तीन नगरसेवक असूनही काँग्रेसला अपेक्षित मते न मिळाल्यामुळे हा धक्का असल्याचे गुप्ते म्हणाल्या. काँग्रेस, बसपा, संभाजी ब्रिगेड, अपक्ष या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली.

डोंबिवली या रा.स्व. संघ व भाजपच्या गडात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पराभव करण्याकरिता मनसेने मंदार हळबे या ब्राह्मण तरुणास उमेदवारी दिली. यामुळे ब्राह्मण मते मनसेकडे वळतील, असा राज ठाकरे यांचा होरा होता. मात्र, प्रत्यक्षात भाजप व संघाची मतपेटी अभेद्य राहिली व चव्हाण विजयी झाले.

ठाकरे हे आपण जातपात पाहत नाही, असे सांगतात. त्याचप्रमाणे संघाने कधीही जातपातीचे अवडंबर माजवले नाही. मात्र, मनसेने हळबे विरुद्ध चव्हाण या लढतीत जातीचा फॅक्टर काम करील, असा विचार केला. तो फलद्रुप झाला नाही. शहरातील खड्डे, वाहतूककोंडी, पूलकोंडी, अर्धवट प्रकल्प, १० वर्षांत आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून न झालेली काही कामे यावरून सोशल मीडियात टीकाटिप्पणी करण्यात येत होती. त्या मुद्द्यांवरून मनसेने चव्हाण यांना घेरण्यापेक्षा जातीच्या फॅक्टरवरून घेरण्याचा प्रयत्न केला व तेथेच मनसेच्या अपयशाचा पाया रचला गेला, असे बोलले जात आहे.

सामान्यांच्या संपर्कात चव्हाण कायम असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. हळबे यांनी उच्चशिक्षणाच्या मुद्द्यावरूनही चव्हाण यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने त्या विषयावरही चर्चा झाली. मात्र, तोही मुद्दा फारसा चालला नाही. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराकरिता जीवाचे रान केले. त्यामुळे शेजारील कल्याण पूर्व व पश्चिममध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना डोंबिवलीत शिवसेनेने चव्हाण यांना मनापासून साथ दिली.

मात्र, हळबेंना ४४ हजार मते मिळाली असून दिवंगत माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांना २०१४ मध्ये मिळालेल्या मतांच्या चारपट आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. २२० जागा मिळवण्याच्या वल्गना केलेल्या पक्षाची दारुण अवस्था झाली, ते चव्हाण पाहत आहेत. त्यांनी डोंबिवलीकरांच्या मूलभूत समस्यांना हात घातला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. केडीएमसीच्या मागील निवडणुकीत मनसेच्या जागा घटल्या व भाजपच्या वाढल्या. मनसेची वाढलेली मते मागील यश पुन्हा गमावण्याची नांदी ठरणार नाही, याची खबरदारी भाजपला घ्यावी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dombivali-acडोंबिवली