शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये मोठा राडा! प्रचाराला आलेल्या तेजप्रताप यादवांवर दगडफेक; तेजस्वींच्या समर्थकांनी हुसकावून लावले
2
'जिनपिंग यांची ही गोष्ट चांगली नाही', ट्रम्प यांची थेट प्रतिक्रिया, जिनपिंग यांनी लगेच हिशेब चुकता केला
3
मोंथाने समुद्राच्या तळातून ब्रिटीशकालीन जहाज बाहेर आणले; शेवटचे दहा वर्षांपूर्वी दिसलेले...
4
"टॅरिफनं महागाई वाढवली," पॉवेल यांचा पुन्हा ट्रम्प यांच्यावर निशाणा; फेड रिझर्व्हनं केली व्याजदरात कपात
5
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
6
Post Office ची जबरदस्त स्कीम; केवळ व्याजातूनच महिन्याला होईल ₹२०,५००ची कमाई, कर सवलतीचाही फायदा
7
'ती' रात्र, रूम नंबर ११४ अन् १७ तासांचे रहस्य! महिला डॉक्टर आत्महत्या, हॉटेल रूममधील वस्तुस्थिती
8
'तो' किंचाळला, रक्ताच्या थारोळ्यात.... १ कोटीची लॉटरी लागलेल्या तरुणाचा संशयास्पद मृत्यू
9
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
10
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
11
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
12
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
13
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
14
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
15
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
16
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
17
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
18
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
19
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
20
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?

डोंबिवलीचा बालेकिल्ला भाजपने राखला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 01:17 IST

जातीच्या राजकारणाला मतदारांनी झिडकारले

- अनिकेत घमंडीडोंबिवली : डोंबिवली मतदारसंघातील विजयाची परंपरा कायम राखत भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली. चव्हाण यांनी ८६ हजार २२७ मते मिळवत दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले मनसेचे उमेदवार मंदार हळबे यांचा ४१ हजार ३११ मतांनी पराभव केला. हळबे यांना ४४ हजार ९१६, तर तिसºया क्रमांकावर राहिलेल्या काँग्रेसच्या उमेदवार राधिका गुप्ते यांनी सहा हजार ६१३ मते मिळवली. नोटाचे प्रमाण वाढले असून चार हजार ९१ मतदारांनी नोटाला पसंती दिली. जनसंघापासून बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातील विजय स्पष्ट होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

मतमोजणीच्या पहिल्याच फेरीत चव्हाण यांनी पश्चिमेकडील मोठागाव येथून १५०० मतांची आघाडी घेतली. मात्र, तिसºया फेरीत चव्हाण आणि हळबे यांना मिळालेल्या मतांमध्ये अवघे ३४ मतांचे अंतर होते. मात्र, तिन्ही फेऱ्यांमधील १५०० मतांची आघाडी कायम होती. त्यानंतर, चव्हाण यांची आघाडी वाढत गेली. हळबे यांनाही पश्चिमेला चांगली मते मिळाली, पण पूर्वेत भाजपने एकतर्फी वर्चस्व राखले.

हळबे यांना ते ज्या रामनगर या प्रभागातून नगरसेवक म्हणून निवडून आले, तेथेही मते मिळाली नसल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले.काँग्रेसच्या राधिका गुप्ते यांना अवघी सहा हजार ६१३ मते मिळाली. काँग्रेसचे या ठिकाणी तीन नगरसेवक असूनही काँग्रेसला अपेक्षित मते न मिळाल्यामुळे हा धक्का असल्याचे गुप्ते म्हणाल्या. काँग्रेस, बसपा, संभाजी ब्रिगेड, अपक्ष या चारही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी जयराम पवार यांनी दिली.

डोंबिवली या रा.स्व. संघ व भाजपच्या गडात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा पराभव करण्याकरिता मनसेने मंदार हळबे या ब्राह्मण तरुणास उमेदवारी दिली. यामुळे ब्राह्मण मते मनसेकडे वळतील, असा राज ठाकरे यांचा होरा होता. मात्र, प्रत्यक्षात भाजप व संघाची मतपेटी अभेद्य राहिली व चव्हाण विजयी झाले.

ठाकरे हे आपण जातपात पाहत नाही, असे सांगतात. त्याचप्रमाणे संघाने कधीही जातपातीचे अवडंबर माजवले नाही. मात्र, मनसेने हळबे विरुद्ध चव्हाण या लढतीत जातीचा फॅक्टर काम करील, असा विचार केला. तो फलद्रुप झाला नाही. शहरातील खड्डे, वाहतूककोंडी, पूलकोंडी, अर्धवट प्रकल्प, १० वर्षांत आमदार रवींद्र चव्हाण यांच्याकडून न झालेली काही कामे यावरून सोशल मीडियात टीकाटिप्पणी करण्यात येत होती. त्या मुद्द्यांवरून मनसेने चव्हाण यांना घेरण्यापेक्षा जातीच्या फॅक्टरवरून घेरण्याचा प्रयत्न केला व तेथेच मनसेच्या अपयशाचा पाया रचला गेला, असे बोलले जात आहे.

सामान्यांच्या संपर्कात चव्हाण कायम असल्याने त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. हळबे यांनी उच्चशिक्षणाच्या मुद्द्यावरूनही चव्हाण यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केल्याने त्या विषयावरही चर्चा झाली. मात्र, तोही मुद्दा फारसा चालला नाही. लोकसभा निवडणुकीत चव्हाण यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचाराकरिता जीवाचे रान केले. त्यामुळे शेजारील कल्याण पूर्व व पश्चिममध्ये शिवसेना-भाजपमध्ये संघर्ष सुरू असताना डोंबिवलीत शिवसेनेने चव्हाण यांना मनापासून साथ दिली.

मात्र, हळबेंना ४४ हजार मते मिळाली असून दिवंगत माजी आमदार हरिश्चंद्र पाटील यांना २०१४ मध्ये मिळालेल्या मतांच्या चारपट आहेत. त्यामुळे चव्हाण यांनी याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. २२० जागा मिळवण्याच्या वल्गना केलेल्या पक्षाची दारुण अवस्था झाली, ते चव्हाण पाहत आहेत. त्यांनी डोंबिवलीकरांच्या मूलभूत समस्यांना हात घातला नाही, तर परिस्थिती गंभीर होऊ शकते. केडीएमसीच्या मागील निवडणुकीत मनसेच्या जागा घटल्या व भाजपच्या वाढल्या. मनसेची वाढलेली मते मागील यश पुन्हा गमावण्याची नांदी ठरणार नाही, याची खबरदारी भाजपला घ्यावी.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019dombivali-acडोंबिवली