शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
राज ठाकरे पहिल्यांदाच ‘मविआ’ नेत्यांसोबत दिसले; CM फडणवीस म्हणाले, “भाजपा अन् महायुती...”
4
हरयाणात काय चाललंय? ASI ची गोळी झाडून आत्महत्या; दिवंगत IPS पूरन कुमार यांच्यावर गंभीर आरोप
5
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
6
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
7
पैसाच पैसा! माकडाने पळवली ५० हजारांची बॅग; झाडावर चढला, केला ५०० रुपयांच्या नोटांचा वर्षाव
8
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
9
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
10
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
11
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
12
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
13
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
14
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
15
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
16
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
17
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
18
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
19
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:40 IST

पालिका प्रशासनाकडून ४१ मृत्यूंची माहिती : पोलिसांकडून मात्र आतापर्यंत ३८ मृतदेहांचा पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत आढळली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४१ रहिवाशांचा बळी गेला असून, पोलिसांनी मात्र आतापर्यंत ३८ मृतदेहांचाच पंचनामा केल्याचे सांगितले आहे.

पटेल कम्पाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेतील काही मृतांची नावे, आडनावे आणि मृतांच्या आकडेवारीतही तफावत दिसून आली. बुधवारी सायंकाळी ४१ मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्याला सरळसरळ पंचनाम्याचा आधार आहे. मात्र, बचाव पथकाने बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना ४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

दुसरीकडे, बचाव पथकाने शोधमोहीम राबवण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानताना पालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रामध्ये ४० जणांच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे. भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याची माहिती गुरुवारी दिली. मात्र, वेगवेगळ्या यंत्रणांकडून येत असलेल्या वेगवेगळ्या आकड्यांबाबत ते काही बोलू शकले नाहीत. गुरुवारी चौथ्या दिवशी, सकाळी ११ वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली. त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.

८० तासांची शोधमोहीमतीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लगेचच बचावकार्य सुरु करण्यात आले होते. जवळपास ८० तासांपासून सुरू असलेली शोधमोहीम गुरुवारी सकाळी ११ वाजता थांबवण्यात आली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना