शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

भिवंडी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2020 06:40 IST

पालिका प्रशासनाकडून ४१ मृत्यूंची माहिती : पोलिसांकडून मात्र आतापर्यंत ३८ मृतदेहांचा पंचनामा

लोकमत न्यूज नेटवर्कभिवंडी : शहरातील धामणकरनाका परिसरातील इमारत दुर्घटनेतील मृतांच्या आकड्यांत तफावत आढळली आहे. पालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत ४१ रहिवाशांचा बळी गेला असून, पोलिसांनी मात्र आतापर्यंत ३८ मृतदेहांचाच पंचनामा केल्याचे सांगितले आहे.

पटेल कम्पाउंड येथील तीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली होती. या दुर्घटनेतील काही मृतांची नावे, आडनावे आणि मृतांच्या आकडेवारीतही तफावत दिसून आली. बुधवारी सायंकाळी ४१ मृतांची माहिती बचावकार्यासह मनपा प्रशासनाकडून देण्यात आली होती. मात्र, पोलीस प्रशासनाने मृतदेहांचा पंचनामा व इतर बाबी तपासल्यानंतर आतापर्यंत ३८ जणांचा मृत्यू, तर २५ जण जखमी झाल्याची माहिती दिली आहे. पोलिसांनी केलेल्या दाव्याला सरळसरळ पंचनाम्याचा आधार आहे. मात्र, बचाव पथकाने बुधवारी सायंकाळी पत्रकारांशी बोलताना ४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती.

दुसरीकडे, बचाव पथकाने शोधमोहीम राबवण्यासाठी घेतलेल्या अथक परिश्रमाबद्दल त्यांचे आभार मानताना पालिका प्रशासनाने दिलेल्या पत्रामध्ये ४० जणांच्या मृत्यूचा उल्लेख केला आहे. भिवंडी मनपा आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी या दुर्घटनेत ३८ जणांचा मृत्यू आणि २५ जण जखमी झाल्याची माहिती गुरुवारी दिली. मात्र, वेगवेगळ्या यंत्रणांकडून येत असलेल्या वेगवेगळ्या आकड्यांबाबत ते काही बोलू शकले नाहीत. गुरुवारी चौथ्या दिवशी, सकाळी ११ वाजता मृतदेहांची शोधमोहीम बचाव पथकाने थांबविली. त्यानंतर एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्निशमन दल, पोलीस, श्वान पथक व बचाव पथकातील इतरांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली.

८० तासांची शोधमोहीमतीन मजली जिलानी इमारत सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास कोसळली. त्यानंतर इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी लगेचच बचावकार्य सुरु करण्यात आले होते. जवळपास ८० तासांपासून सुरू असलेली शोधमोहीम गुरुवारी सकाळी ११ वाजता थांबवण्यात आली.

टॅग्स :bhiwandiभिवंडीBuilding Collapseइमारत दुर्घटना