शहरं
Join us  
Trending Stories
1
धगधगतं फ्रान्स! लाखो लोक रस्त्यावर उतरले, काही ठिकाणी दगडफेक; रेल्वे, मेट्रो, बस, शाळा बंद
2
Mumbai Crime: घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर सापडला ३५ वर्षाच्या माणसाचा मृतदेह; कोणामुळे गेला जीव?
3
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
4
"आम्ही मित्र बनलो अन्..." १९ वर्षीय मॉडलनं का उचललं टोकाचं पाऊल?; बॅगेतील चिठ्ठीमुळे उघडलं रहस्य
5
रुममेटशी भांडण, पोलिसांनी थेट झाडल्या गोळ्या, अमेरिकेत भारतीय इंजिनियरचा मृत्यू  
6
बँक खात्यात पैसे नाही, टेन्शन कशाला? आता करा UPI पेमेंट, पुढच्या महिन्यात पैसे भरा; 'यांनी' आणलं जबरदस्त फीचर
7
आधी गोलंदाजीवर ठोकले गेले ५ षटकार, मग वडिलांचं निधन, श्रीलंकन क्रिकेटपटूवर कोसळला दु:खाचा डोंगर   
8
Nilon's Success Journey: लोणचं खायला घालून कंपनीनं कमावले ४०० कोटी; छोट्या किचनमधून झाली सुरुवात, आज परदेशातही आहे व्यवसाय
9
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
10
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
11
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
12
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
13
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
14
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
15
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
16
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
17
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
18
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
19
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
20
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली

भाईंदरमध्ये आवाज पोलिसांचाच, ध्वनिप्रदूषणाच्या जाचातून नागरिकांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 01:39 IST

मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे.

मीरा रोड : मीरा- भाईंदरमध्ये यंदा नवरात्रीनिमित्त ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद वाजवण्यासाठी असलेल्या रात्री दहाच्या वेळेची पोलिसां कडून अमलबजावणी केली जात असल्याने यंदा तरी आवाज पोलिसांचाच असल्याचे चित्र आहे. दहा ते सव्वादहा दरम्यान बहुतांश मोठे आणि व्यावसायिक आयोजकांचे कार्यक्रम बंद होत असल्याने नागरिकांनी ध्वनी प्रदूषणाच्या जाचातून सुटका झाल्याचा आनंद व्यक्त केला आहे.शहरात नवरात्रीला सुरूवात झाली असून विधानसभा निवडणुका असल्याने नवरात्रीला राजकीय रंग आला आहे. राजकारणी व लोकप्रतिनिधींमध्ये गरबा आयोजनासाठी वेगवेगळे गायक व कलाकार आणणे, बक्षिसे यात स्पर्धाच लागली आहे. आॅर्केस्ट्रा साऊंड, डीजेसारख्या कानठळ्या बसवणाऱ्या ध्वनियंत्रणांचा दणदणाट चालला आहे. उमेदवार व त्यांचे समर्थक नवरात्रीच्या आड आपला प्रचार करण्याचा खटाटोप करताना दिसत आहेत.रात्री दहापर्यंत ध्वनिक्षेपकास परवानगी असली तरी त्या नंतरही सर्रास ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद सुरू असल्याचा अनुभव आहे. पोलीस फक्त येऊन समज देऊन गेले की पुन्हा मंडळवाले ध्वनिक्षेपक सुरु करतात. कानठळ्या बसवणाºया आवाजाच्या वाढत्या पाºयामुळे सर्वसामान्य नागरिक त्रासले आहेत. ज्येष्ठ नागरिक, रूग्ण, लहान मुले यांना तर आवाज जाचक ठरत आहे. विद्यार्थी व कामावर जाणाºया बहुसंख्य नागरिकांनाही झोप पूर्ण होत नसल्याने त्रास सहन करावा लागत आहे. निदान रात्री १० वाजता ध्वनिक्षेपक बंद होईल अशी त्यांची आशा असते.यंदाच्या नवरात्रीलाही सुरूवातीला तसा अनुभव आला होता. पण ध्वनिप्रदूषणाने होणाºया त्रासाने वैतागलेल्या जागरूक नागरिकांनी ध्वनिप्रदूषणाबाबत तक्रारी केल्या आहेत. पोलिसांनी स्वत:हून गस्त घालून रात्री १० नंतर ध्वनिप्रदूषण करणा-या ध्वनिक्षेपक वा ध्वनियंत्रणांसह आयोजकांवर कारवाई करतानाच गुन्हा दाखल करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.यंदा मात्र पोलिसांनी ध्वनिप्रदूषणाने त्रासलेल्या वृध्द, रुग्ण, विद्यार्थी, लहान मुले आदी नागरिकांना सुखद धक्का देतानाच मोठा दिलासा दिला. कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी ध्वनिप्रदूषणाचा वाढता धोका आणि सामान्य नागरिकांना होणारा त्रास पाहता पोलिसांनी रात्री दहा वाजता ध्वनिक्षेपक व वाद्यवृंद बंद करण्याचे आदेश दिले होते. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजीराव राठोड यांनीही पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत ध्वनिप्रदूषण रोखण्यासह वेळेची मर्यादा काटेकोरपणे पाळण्याचे निर्देश दिले होते.वरिष्ठांच्या आदेशांमुळे पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाºयांनीही कुणाचा मुलाहिजा न ठेवता वेळेची मर्यादा पाळण्याची कार्यवाही चालवली आहे. काही ठिकाणी आयोजक मुजोरी करत असल्याने त्या ठिकाणी पोलिसच तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान, पोलिसांच्या या भूमिकेचे नागरिकांनी कौतुक केले आहे. थोडी कडक पावले उचलल्याशिवाय जरब बसणार नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.यंदा पोलिसांनी स्वत:हून ध्वनिप्रदूषण नियमांचे काटेकोर पालन करायला लावल्याने माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसह रूग्ण, मुले, महिला व नागरिकांना दिलासा मिळाला आहे. महत्वाचे म्हणजे १० वाजता कार्यक्रम बंद होत असल्याने घरातील लहान तसेच तरुण मुले लवकर घरी परतत असल्याने पालकांच्या जीवाला लागणारा घोर यंदा मिटला आहे.- अनंत आंगचेकर, ज्येष्ठ नागरिक, भाईंदरनवरात्रीचे धार्मिक पावित्र्य राहिलेले नाही. केवळ मौजमजा चालली आहे. नवरात्रीच्या नावाने मुले रात्री उशिरापर्यंत नाहक फिरत राहतात ते बंद झालेच पाहिजे. ध्वनिक्षेपकची रात्री दहाची वेळ काटेकोर पाळली जावी. आवाजाची पातळीही तपासली जावी. १२ पर्यंतची सवलत बंद करावी. वाटल्यास शेवटचाच एक दिवस द्यावा. - जागृती केळकर, गृहिणी, भाईंदर

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस