शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

भार्इंदर-वसई अंतर ३० किमीने कमी करणाऱ्या १०८२ कोटी खर्चाच्या खाडीपुलास मुहूर्त सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:22 IST

मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.

- नारायण जाधव ठाणे : मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.या पुलावर एमएमआरडीए १०८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार आहे. त्याचा फायदा आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणा-या लाखो वाहनचालकांना होणार आहे. खाडीवरील ५ किमी लांबीचा हा पूल ३०.६ मीटर रुंद असा सहा पदरी असणार आहे. पुलाच्या बांधकामात खारफुटी आणि मिठागरांसह पाणजू बेटांवरील काही रहिवाशांचा अडथळा होता. त्यावर मात करून एमएमआरडीएने त्याच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा आल्यावर त्याबाबत निर्णय होणार आहे.हा पूल दोन्ही बाजूंना १४.३ मीटर रुंदीत तीनपदरी लेनद्वारे भार्इंदर आणि नायगांवदरम्यानच्या पश्चिम रेल्वे पुलाच्या समांतर तो बांधला जाणार आहे. तसेच तो पुढे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ८ला जोडला जाणार आहे.>वेळेसह कोट्यवधींच्या इंधनाची बचत होणार : सध्या मीरा-भार्इंदरहून वसई येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हाच एकमेव पर्याय आहे. काशिमीरा मार्गे वसईला जाण्यासाठी घोडबंदर रस्त्याने जेएनपीटीहून गुजरातकडे जाणाºया हजारो कंटेनरच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडीला सामारे जावे लागते. यामुळे भार्इंदर ते वसई हे ३९ किमीचे अंतर कापण्यासाठी एक तास १७ मिनिटे लागतात. मात्र, हा पूल झाल्यास हे अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार असून, भार्इंदर-वसई ये-जा करण्यासाठी अवघी १० ते १५ पंधरा मिनिटे लागणार आहेत. यामुळे एक तासाची बचत होऊन कोट्यवधींच्या इंधनाची मोठी बचत होणार आहे.>विलंबामुळे खर्च वाढला२०१३मध्ये प्रस्तावित केलेल्या या पुलाचा खर्च ३०० कोटी रुपये गृहीत धरला होता. परंतु, विलंबामुळे तो आता दीड हजार कोटींवर जाणारआहे. मिठागरांसह ३.४४ हेक्टर खारफुटीचा अडथळा आणि पाणजू बेटावरील रहिवाशांच्या विरोधामुळे त्यास विलंब झाला आहे. या पुलामुळे समुद्रातील मासेमारीसह इतर पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.>पाणजू बेटास जोडणारवसई नजिकच्या पाणजू बेटास या पुलामुळे अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यासाठी ६०० मीटर लांबीच्या आणि साडेआठ मीटररुंद असा दोन रॅम्पद्वारे हा पूल जोडण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यामुळे गैरसोय दूर होईल.

टॅग्स :thaneठाणे