शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

भार्इंदर-वसई अंतर ३० किमीने कमी करणाऱ्या १०८२ कोटी खर्चाच्या खाडीपुलास मुहूर्त सापडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 05:22 IST

मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.

- नारायण जाधव ठाणे : मुंबई शहर आणि वसई-विरार प्रदेशाच्या विकासात मैलाचा दगड ठरणा-या खाडीवरील बहुप्रतीक्षित भार्इंदर-वसई पुलासाठी अखेर एमएमआरडीएला मुहूर्त सापडला आहे.या पुलावर एमएमआरडीए १०८१ कोटी ६० लाख रुपये खर्च करणार आहे. त्यामुळे दोन्ही शहरांतील अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार आहे. त्याचा फायदा आठ लाख रहिवाशांसह मुंबई-गुजरात प्रवास करणा-या लाखो वाहनचालकांना होणार आहे. खाडीवरील ५ किमी लांबीचा हा पूल ३०.६ मीटर रुंद असा सहा पदरी असणार आहे. पुलाच्या बांधकामात खारफुटी आणि मिठागरांसह पाणजू बेटांवरील काही रहिवाशांचा अडथळा होता. त्यावर मात करून एमएमआरडीएने त्याच्या बांधकामासाठी निविदा मागविल्या आहेत. निविदा आल्यावर त्याबाबत निर्णय होणार आहे.हा पूल दोन्ही बाजूंना १४.३ मीटर रुंदीत तीनपदरी लेनद्वारे भार्इंदर आणि नायगांवदरम्यानच्या पश्चिम रेल्वे पुलाच्या समांतर तो बांधला जाणार आहे. तसेच तो पुढे मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग ८ला जोडला जाणार आहे.>वेळेसह कोट्यवधींच्या इंधनाची बचत होणार : सध्या मीरा-भार्इंदरहून वसई येथे जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ८ हाच एकमेव पर्याय आहे. काशिमीरा मार्गे वसईला जाण्यासाठी घोडबंदर रस्त्याने जेएनपीटीहून गुजरातकडे जाणाºया हजारो कंटेनरच्या वाहतुकीमुळे या रस्त्यावर नेहमीच वाहतूककोंडीला सामारे जावे लागते. यामुळे भार्इंदर ते वसई हे ३९ किमीचे अंतर कापण्यासाठी एक तास १७ मिनिटे लागतात. मात्र, हा पूल झाल्यास हे अंतर तब्बल ३० किमीने कमी होणार असून, भार्इंदर-वसई ये-जा करण्यासाठी अवघी १० ते १५ पंधरा मिनिटे लागणार आहेत. यामुळे एक तासाची बचत होऊन कोट्यवधींच्या इंधनाची मोठी बचत होणार आहे.>विलंबामुळे खर्च वाढला२०१३मध्ये प्रस्तावित केलेल्या या पुलाचा खर्च ३०० कोटी रुपये गृहीत धरला होता. परंतु, विलंबामुळे तो आता दीड हजार कोटींवर जाणारआहे. मिठागरांसह ३.४४ हेक्टर खारफुटीचा अडथळा आणि पाणजू बेटावरील रहिवाशांच्या विरोधामुळे त्यास विलंब झाला आहे. या पुलामुळे समुद्रातील मासेमारीसह इतर पर्यावरणाला हानी पोहोचेल, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे.>पाणजू बेटास जोडणारवसई नजिकच्या पाणजू बेटास या पुलामुळे अ‍ॅक्सेस मिळणार आहे. यासाठी ६०० मीटर लांबीच्या आणि साडेआठ मीटररुंद असा दोन रॅम्पद्वारे हा पूल जोडण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. यामुळे गैरसोय दूर होईल.

टॅग्स :thaneठाणे