शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

भाजीपाला उत्पादनाचा कालावधी बदलल्याने फायदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 11:42 PM

विविध भाजीपाल्यांची लागवड; काकडी, मिरचीसोबतच कारल्याचेही घेतले उत्पादन

- जर्नादन भेरे भातसानगर : यंदा शहापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात काकडीचे उत्पादन आले होते. मात्र, भावच मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टर क्षेत्रावर लागवड केलेल्या काकडीच्या पिकावर अक्षरश: नांगर फिरवला होता. असे असले तरी तालुक्यातील सारमाळ येथील महिला शेतकरी मनीषा पाटील यांनी कालावधी बदलून काकडीचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांच्या शेतात पिकणाºया काकडीला चांगला भाव मिळत आहे.पती मंगेश पाटील यांच्या साथीने मनीषा या सात एकर शेतजमिनीत भाजीपाला पीक घेत आहेत. त्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहेत.पाटील यांनी कारली, अंतरपीक मिरची व झेंडूची फुले आणि दोन एकरमध्ये सिमला मिरचीची लागवड केली आहे. दिवसाआड ९०० किलो मिरची बाजारात विक्रीसाठी जाते, तर ८०० ते ९०० किलो काकडी १२ ते १४ रु पये दराने बाजारात विकली जात आहे. हीच काकडी काही दिवसांपूर्वी दोन रु पये किलोने जात होती. दीड फुटांपर्यंतच्या कारल्याचे उत्पादन त्या घेत असून अंतरपीक मिर्चीतूनही त्यांना एक ते दीड लाखांचा नफा अपेक्षित आहे. गेल्या आठवड्यात काकडीच्या अधिक उत्पादनामुळे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी काकडी उपटून फेकून देण्याची वेळ आली होती. मात्र, कालावधी बदलून घेतलेल्या काकडी आणि मिरचीच्या उत्पादनातून दोन ते अडीच लाखांपर्यंत नफा मिळण्याचा अंदाज पाटील यांनी व्यक्त केला आहे.सेंद्रिय खतांमुळे शेतातच उठावसर्वच शेतात ठिबकच्या सहाय्याने लागवड केली आहे. तसेच सेंद्रिय खतांची जोड दिल्याने या हिरव्यागार भाजीपाल्याला शेतातच मागणी मिळत असल्याचे मनीषा पाटील यांनी सांगितले. केवळ एकाच प्रकारच्या भाजीपाल्याच्या उत्पादनावर अवलंबून न राहता शेती केल्यास फायदेशीर ठरेल, असा सल्लाही त्यांनी दिला.विविध प्रकारच्या भाजीपाला पिकाच्या उत्पादनामुळे एखाद्या पिकाला भाव मिळाला नाही तरी दुसºया पिकातून ते भरून काढण्याची संधी शेतकºयांना मिळत आहे.- विलास झुंजाराराव, कृषी अधिकारी

टॅग्स :Farmerशेतकरी