शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

बील थकले, वीज कट, फोन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:22 IST

तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत

पालघर : जिल्ह्यातील बीएसएनएलच्या तारापूर केंद्रांतर्गत वीज बिलांची १८ लाख ८६ हजार ३७३ हजारांची रक्कम थकल्याने ८ मुख्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत.तारापूरच्या भारत संचार निगम लिमिटेडच्या केंद्रांतर्गत येणाऱ्या डहाणूच्या उपविभागीय कार्यालयाची ५ लाख ९७ हजार ३४० रुपयांची थकबाकी असून, उपविभागीय अभियंता विभागाची २ लाख २२ हजार ३१३ रुपये, नरपड (डहाणू) विभागाची २६ हजार ७१०, पालघर (माहीम) च्या उपविभागीय अभियंता विभागाची ३ हजार ५८०, पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ४६ हजार २०० रुपये, बोईसर (आर) उपअभियंता विभागाचे ४६ हजार ११० रुपये, बोईसर (आर) उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ११ हजार ८१० रुपये तर तारापूर एमआयडीसी मधील कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी कार्यालयाची ९ लाख ३२ हजार ३१० रुपये असे एकूण १८ लाख ८६ हजार ३७३ हजार रु पयांची थकबाकी आहे.महावितरणने बुधवारी एकूण ८ विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे तारापूर अणुऊर्जा केंद्रासह बँका, शासकीय कार्यालये, सायबर कॅफे, तसेच खाजगी व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. वसई च्या टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाचीही मोठी थकबाकी असल्याने विद्युत वितरण वसई विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथील एका अधिकाºयाने काही दिवसाची मुदत मागितल्याने कारवाई टळल्याचे बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील बीएसएनएलच्या बेपर्वाईमुळे दूरसंचार विभागाच्या तारापूर, पालघर, बोईसर, माहीम आदी केंद्रांसह जिल्ह्यातील बहुतांशी दूरध्वनी केंद्रासह कार्यालयाची वीजदेयके न भरल्याने या दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार दूरध्वनी व बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. सर्वत्र कामाचा खोळंबा झाल्याने ओरड सुरू झाल्याने जनरेटर अथवा इन्व्हर्टरच्या आधारावर ही सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून थकबाकी रक्कम भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.ग्राहकांची पाठ ; शेकडो दूरध्वनी जोडण्या बंदबीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबर इंटरनेट व मोबाइल सेवा खंडित झाल्याने वेस्टर्न टेलिकॉम रिजन (डब्ल्यू टी आर) द्वारा इतर राज्यांना जोडणारी दूरध्वनी सेवादेखील खंडित झाली आहे. एक बाजूला बीएसएनएलची ही अवस्था असतानाच दुसºया बाजूला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने दर आठवड्याला शेकडो दूरध्वनी ग्राहक स्वत:च आपल्या दूरध्वनी जोडण्या बंद करत आहेत.बीएसएनएलच्या या कारभारामुळे येथील इंटरनेट सेवा देखील ग्राहक बंद करू लागले असून ते खाजगी सेवा अथवा केबलनेट सेवेच्या वापराकडे वळत आहेत, बीएसएनएलच्या लँड लाईन सेवे ऐवजी विविध खाजगी कंपनीच्या मोबाईल सेवेकडे जिल्ह्यातील ग्राहकमोठ्या प्रमाणात वळल्याने त्याचाही आर्थिक परिणाम बीएसएनएलवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची विद्युत देयके भरण्याची क्षमताच दिवसेंदिवस कमी होते आहे.

टॅग्स :Internetइंटरनेटpalgharपालघर