शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

बील थकले, वीज कट, फोन बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 23:22 IST

तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत

पालघर : जिल्ह्यातील बीएसएनएलच्या तारापूर केंद्रांतर्गत वीज बिलांची १८ लाख ८६ हजार ३७३ हजारांची रक्कम थकल्याने ८ मुख्य केंद्राचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याने तारापूर, डहाणू, बोईसर पालघर मधील मोबाईल व इंटरनेट सेवा ठप्प पडली असून त्याचा फटका शासकीय कार्यालये, बँका आदीना बसून व्यवहार बंद पडले आहेत.तारापूरच्या भारत संचार निगम लिमिटेडच्या केंद्रांतर्गत येणाऱ्या डहाणूच्या उपविभागीय कार्यालयाची ५ लाख ९७ हजार ३४० रुपयांची थकबाकी असून, उपविभागीय अभियंता विभागाची २ लाख २२ हजार ३१३ रुपये, नरपड (डहाणू) विभागाची २६ हजार ७१०, पालघर (माहीम) च्या उपविभागीय अभियंता विभागाची ३ हजार ५८०, पालघर उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ४६ हजार २०० रुपये, बोईसर (आर) उपअभियंता विभागाचे ४६ हजार ११० रुपये, बोईसर (आर) उपविभागीय अधिकारी कार्यालयाची ११ हजार ८१० रुपये तर तारापूर एमआयडीसी मधील कनिष्ठ टेलिकॉम अधिकारी कार्यालयाची ९ लाख ३२ हजार ३१० रुपये असे एकूण १८ लाख ८६ हजार ३७३ हजार रु पयांची थकबाकी आहे.महावितरणने बुधवारी एकूण ८ विभागाचा विद्युत पुरवठा खंडित केला होता. त्यामुळे तारापूर अणुऊर्जा केंद्रासह बँका, शासकीय कार्यालये, सायबर कॅफे, तसेच खाजगी व्यावसायिकांचा व्यवसाय ठप्प पडला आहे. वसई च्या टेलिफोन एक्स्चेंज कार्यालयाचीही मोठी थकबाकी असल्याने विद्युत वितरण वसई विभागाचे अधिकारी विद्युत पुरवठा खंडित करण्यासाठी गेले होते. मात्र, तेथील एका अधिकाºयाने काही दिवसाची मुदत मागितल्याने कारवाई टळल्याचे बीएसएनएलच्या एका अधिकाºयाने लोकमतला सांगितले.जिल्ह्यातील बीएसएनएलच्या बेपर्वाईमुळे दूरसंचार विभागाच्या तारापूर, पालघर, बोईसर, माहीम आदी केंद्रांसह जिल्ह्यातील बहुतांशी दूरध्वनी केंद्रासह कार्यालयाची वीजदेयके न भरल्याने या दूरध्वनी केंद्रांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील सुमारे नऊ हजार दूरध्वनी व बीएसएनएलची मोबाइल व इंटरनेट सेवा खंडित झाली आहे. सर्वत्र कामाचा खोळंबा झाल्याने ओरड सुरू झाल्याने जनरेटर अथवा इन्व्हर्टरच्या आधारावर ही सेवा सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर वरिष्ठ पातळीवरून थकबाकी रक्कम भरण्यासाठी धावपळ सुरू झाली आहे.ग्राहकांची पाठ ; शेकडो दूरध्वनी जोडण्या बंदबीएसएनएलच्या दूरध्वनी सेवेबरोबर इंटरनेट व मोबाइल सेवा खंडित झाल्याने वेस्टर्न टेलिकॉम रिजन (डब्ल्यू टी आर) द्वारा इतर राज्यांना जोडणारी दूरध्वनी सेवादेखील खंडित झाली आहे. एक बाजूला बीएसएनएलची ही अवस्था असतानाच दुसºया बाजूला ग्राहकांना व्यवस्थित सेवा देण्यास असमर्थ ठरत असल्याने दर आठवड्याला शेकडो दूरध्वनी ग्राहक स्वत:च आपल्या दूरध्वनी जोडण्या बंद करत आहेत.बीएसएनएलच्या या कारभारामुळे येथील इंटरनेट सेवा देखील ग्राहक बंद करू लागले असून ते खाजगी सेवा अथवा केबलनेट सेवेच्या वापराकडे वळत आहेत, बीएसएनएलच्या लँड लाईन सेवे ऐवजी विविध खाजगी कंपनीच्या मोबाईल सेवेकडे जिल्ह्यातील ग्राहकमोठ्या प्रमाणात वळल्याने त्याचाही आर्थिक परिणाम बीएसएनएलवर मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची विद्युत देयके भरण्याची क्षमताच दिवसेंदिवस कमी होते आहे.

टॅग्स :Internetइंटरनेटpalgharपालघर