शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
2
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
3
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
4
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
5
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
6
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
7
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
8
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
9
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
10
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
11
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
12
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
13
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
14
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
15
“ते म्हणजे महाराष्ट्र या मानसिकतेतून ठाकरेंनी बाहेर यावे”; देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
17
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
18
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
19
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
20
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ

बारवीचे दरवाजे बंद; जिल्ह्याचा पाणीप्रश्न सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2019 11:09 PM

अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झाली चाचणी

बदलापूर : बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर त्या धरणात अजूनही क्षमतेएवढे पाणी साठवण्यात आले नव्हते. पुनर्वसनाचा प्रश्न निकाली न निघाल्याने दरवाजांचे काम रखडले होते. मात्र, गेल्या वर्षभरात पुनर्वसनाचे काम अंतिम टप्प्यात आल्याने आता बारवी धरणाचे दरवाजे हे या वर्षात बंद होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे या दरवाजांची चाचणी आमदार किसन कथोरे आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली आहे.अंबरनाथ आणि मुरबाड तालुक्यांच्या मध्यावरील बारवी धरण हे एमआयडीसीच्या अखत्यारितील धरण असून या धरणातून संपूर्ण ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जाणार आहे. ६५.१५ मीटर उंचीच्या या धरणात १७२ दशलक्ष घनमीटर इतकी पाण्याची क्षमता होती. आता नव्याने धरणाची उंची नऊ मीटरने वाढवल्याने हीच क्षमता दुप्पट झाली असून आता धरणात ३४०.४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा राहणार आहे. धरणाच्या उंचीच्या वाढीसोबत आता धरणातील ११ स्वयंचलित दरवाजांचे कामही पूर्ण झाले आहे. मात्र, धरणात क्षमतेएवढे पाणी साठवणे अवघड जात होते. धरणाच्या पाणलोटक्षेत्रातील गावांनी स्थलांतराला विरोध केला होता.पुनर्वसन पॅकेज, नोकरी आणि घरांच्या मोबदल्यात भरपाई या विषयांवर सातत्याने वाद सुरू होता. आता एमआयडीसीनेही या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचा निर्णय घेतला आहे. मुरबाड तालुक्यातील तोंडली, काचकोली, कोळे-वडखळ आणि मोहघर येथील १२०४ कुटुंबांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून धरणाची उंची नऊ मीटरने वाढूनही अतिरिक्त पाणीसाठा करता येत नव्हता. मात्र, गेल्या वर्षभरात शेकडो कुटुंबे त्यांना दिलेल्या जागेत स्थलांतरित झाली आहेत.३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवणारयंदा धरणात ३४० दशलक्ष घनमीटर पाणी साठवण्यासाठी ११ दरवाजे बंद करण्यात येणार आहे. मात्र, धरण भरल्यावर हे दरवाजे उघडता यावे, यासाठी त्याची चाचणी करण्यात आली. हे दरवाजे स्वयंचलित असून वेळेवर हायड्रोलिक पद्धतीचाही अवलंब करता येणार आहे. या चाचणीत दरवाजांची उघडझाप पडताळण्यात आली. यावेळी आमदार कथोरे यांनीही यंत्रणेची माहिती घेतली. यंदाच्या वर्षात दरवाजे बंद करून धरणात साठा निर्माण केला जाणार आहे.

टॅग्स :Damधरण