शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 18:02 IST

Barvi Dam News : ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची तहान भागवणारे बारवी धरण दहीहंडीच्या मुहूर्तावर भरले. धरण शंभर टक्के भरल्यानंतर सात दरवाजे उघडण्यात आले. 

Barvi Dam Water Level today: ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिकांच्या शहरांसह सर्व कारखान्यांना पाणी पुरवठा करणारे बारवी धरण शनिवारी (16 ऑगस्ट) दुपारी ३.२५ वाजता दहीहंडीच्या मुहूर्तावर १०० टक्के भरले आहे. त्यामुळे आता ठाणे जिल्ह्यातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

बारवी धरणाचे एकाच वेळी सात स्वयंचलित दरवाजे उघडल्या गेले. त्यातून प्रारंभी सेकंदाला चार क्युसेस पाण्याचा विसंर्ग नदी पात्रात सोडण्यात आले आहे. त्यामुळे बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

बारवी धरण भरण्यास यंदा सात दिवस उशीर

जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्याच्या बदलापूर शहराजवळ असलेले बारवी धरण गेल्या वर्षी ९ ऑगस्ट रोजी भरले होते. यंदा पावसाचा जोर कायम असूनही भरण्यासाठी सात दिवस उशीर झाला आहे. मात्र या वर्षी धरण भरण्याला योगायोगाने दहीहंडीचा मुहुर्त साधता आलेला आहे. 

धरणात आता ३३९.२० दशलक्ष घनमीटर पाणी साठा होऊन ७२.६० मीटर पाणी पातळीला धरण १०० टक्के भरले आहे. यासाठी धरण परिसरात पडलेल्या पावसासह कान्होळ, ठाकूरवाडी, पाटगांवला आणि खानिवरे या पाणलोटक्षेत्रातील पावसाचे पाणी येऊन धरण भरले आहे.

एमआयडीतील कारखान्यांची पाणी चिंता मिटली

एमआयडीसीच्या मालकीचे असलेले बारवी धरण भरल्यामुळे आता ठाणे महापालिकेच्या कळवा, मुंब्रा परिसरसह कल्याण डोंबिवली महापालिकेचा बहुतांशी शहरीभाग, डोंबिवली एमआयडीसी, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर या महापालिकांसह जिल्ह्यातील सर्व एमआयडीसींमधील कारखान्याच्या पाणी पुरवठ्याची समस्या मिटली आहे.

टॅग्स :thaneठाणेDamधरणRainपाऊसWaterपाणीThane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाMIDCएमआयडीसी