शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

उल्हासनगरमध्ये चार हजार पूरग्रस्तांना मदत; सात हजांरापेक्षा अधिक घरांचा पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2019 12:33 AM

पूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला

उल्हासनगर : वालधुनी नदीच्या महापुराचा फटका बसलेल्या सात हजारापेक्षा जास्त घरांची तहसील कार्यालयाकडून पाहणी व पंचनामा करण्यात आला होता. पूरग्रस्त नागरिकांना तहसील कार्यालयाकडून रोख स्वरूपात ५ हजार तर १० हजार रूपये बँक खात्यात जमा केली जाणार असून आतापर्यंत चार हजारापेक्षा जास्त नागरिकांना मदत दिल्याची माहिती तहसीलदार विजयकुमार वाकोडे यांनी दिली.

वालधुनी नदीच्या पुराचा फटका बसलेल्यांना सरकारची मदत मिळावी अशी मागणी झाल्यावर तहसील कार्यालयामार्फत तब्बल ७ हजारापेक्षा जास्त घरांचा पंचनामा करण्यात आला. तहसीलदार वाकोडे यांनी पाच पथकांची नियुक्ती करून त्यांच्यामार्फत पंचनामा केलेल्या नागरिकांना पाच हजार रोख स्वरूपात तर १० हजार रूपये त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

तसेच इतर पंचनामा केलेल्या पूरग्रस्तांना मदतीचे वाटप सुरू राहणार असल्याचे वाकोडे यांनी सांगितले. तर दुसरीकडे पुराचा फटका बसूनही घराची पाहणी व पंचनामा झालेला नाही, अशा नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे मदतीसाठी अर्ज केले आहे. त्यांच्या अर्जाचाही सरकारला विचार करावा लागणार आहे.

उल्हासनगरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीच्या पुराचा फटका २५ जुलै रोजी समतानगर, सम्राट अशोकनगर, आशीर्वाद व रेणुका सोसायटी, पंचशीलनगर, मातोश्री मीनाताई ठाकरेनगर, प्रबुध्दनगर, करोतियानगर, हिराघाट, स्मशानभूमी परिसरातील हजारो नागरिकांना बसला. अनेक घरात पुराचे पाणी शिरल्याने घरातील अन्नधान्य, कपडे, घरगुती साहित्य, शैक्षणिक साहित्य वाहून अथवा खराब झाले होते. सामाजिक संघटनेसह शिवसेना, इतर पक्षांनी पूरग्रस्तांना अन्नधान्यासह कपडयाचे वाटप केले. तसेच आरोग्य शिबिर घेऊन तपासणी केली होती.

अनेक घरांचा पंचनामा झालेला नाहीपूरग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदतीचा हात मिळण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सरकारकडे पाठपुरावा केला. तहसील कार्यालयाने याची दखल घेत पूरग्रस्त घरांची पाहणी व पंचनामा करत अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला. त्यानुसार पूरग्रस्त नागरिकांना मदत दिली जात आहे. मात्र आजही अनेक पूरग्रस्त नागरिकांच्या घराचा पंचनामा झालेला नाही. अशांना मदत मिळावी असी मागणी शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. वंचित राहिलेल्या शेकडो नागरिकांनी तहसील कार्यालयाकडे धाव घेऊन मदतीसाठी अर्ज केले आहेत.

टॅग्स :thaneठाणेfloodपूर