शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांचे 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 
2
Petal Gahlot : अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत?
3
अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं?
4
पुराचा धसका! चिखलातील स्वप्नांचा शोध..; पिकेच नाही तर मातीही वाहून गेल्याने भविष्य संकटात
5
विना इनक्रिमेंट १ लाखांपेक्षा अधिक वाढली सॅलरी; रुपया आणि डॉलर्सचा काय आहे याच्याशी संबंध?
6
हृदयद्रावक! खेळता खेळता उकळत्या दुधात पडून दीड वर्षांच्या मुलीचा मृत्यू, मांजरीच्या मागे गेली अन्...
7
सुपर ओव्हरमधील वादावरून श्रीलंकेचे प्रशिक्षक जयसूर्या संतप्त, ICCकडे केली अशी मागणी 
8
भारतीय औषध उद्योगाला ‘ट्रम्प’ झटका! १०.५ अब्ज डॉलरची निर्यात धोक्यात, अमेरिकेलाही बसणार झळ
9
ऑक्टोबरमध्ये शुक्र-शनीची युती; काही राशींना वाट्याला 'राजयोग' तर काहींना 'कर्माचे भोग'
10
अभिषेक शर्मा-अभिषेक बच्चनच्या नावात शोएब अख्तरचा गोंधळ; अभिनेता स्पष्टच म्हणाला- "तुझा आदर करतो, पण..."
11
Maharashtra Rain Alert: पुन्हा अतिवृष्टीचे संकट? आज, उद्या 'या' जिल्ह्यांत पाऊस घालणार धुमाकूळ, IMD सतर्कतेचा इशारा
12
Happy Birthday Google! २७ वा वाढदिवस साजरा करतोय गुगल! तुम्हाला Google चा फुल फॉर्म माहितीये का आणि कसं पडलं हे नाव?
13
२५ जण, ६ वाहनं... १ मिनिटात ९ कोटींवर डल्ला; दागिन्यांच्या दुकानात फिल्मी स्टाईल दरोडा
14
'शार्क टँक' फेम अश्नीर ग्रोव्हरला 'बिग बॉस १९'कडून ईमेल, वाइल्ड कार्ड एन्ट्रीची ऑफर; म्हणाला- "आधी सलमान खानला..."
15
TATA च्या बहुप्रतिक्षित आयपीओची तारीख अखेर ठरली, 'या' दिवशी मिळणार गुंतवणूकीची संधी, चेक करा डिटेल्स
16
"उद्ध्वस्त एअरबेस, जळालेले हँगर हा तुमचा विजय?"; भारताची पाकिस्तानला सणसणीत चपराक
17
काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
18
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केली तर २४ महिन्यांनंतर किती रुपये मिळतील? पटापट पाहा कॅलक्युलेशन
19
फ्लॅट वेळेत न दिल्यास बिल्डरला १८% व्याजासह भरपाई द्यावीच लागेल; सुप्रीम कोर्टाचा आदेश
20
राज्यातील ८९ फार्मसी महाविद्यालयांची मान्यता रद्द; तंत्रशिक्षण विभागाचा मोठा निर्णय

Ashadi Ekadashi: वारी म्हणजे वेगळा आनंद असतो; माऊलीच्या भेटीसाठी मन आतुर, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 00:47 IST

कोरोनाने आमचा वारीचा आनंद हिरावून घेतला. पण आता नाइलाज आहे. या वेळी पांडुरंगाला घरी राहूनच साकडे घालू. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवाला मनापासून प्रार्थना करू.

ठाणे - ३१ वर्षांचा इतिहास ठाण्यातून पंढरपूरला पायी जाणाऱ्या आषाढी दिंडी मंडळाच्या दिंडीला आहे. शिवाजी म्हात्रे यांच्या संकल्पनेतून वामन भोईर, दत्तात्रेय म्हात्रे, ज्ञानेश्वर म्हात्रे व इतर वारकरी अशा आठ वारकऱ्यांनी मिळून तीस सुरुवात केली. ३२ वारकऱ्यांचा समावेश असलेली ही दिंडी १९८९ साली काल्हेर-कशेळी- बाळकुम-खारीगाव यामार्गे रवाना झाली होती. गेली ३१ वर्षे खंड न पडता ती याच मार्गे निघत असून आज यात २०० ते २५९ वारकऱ्यांचा समूह आहे.माऊलीच्या भेटीसाठी मन आतुरवारीचे २८ वे वर्षे कोरोनामुळे हुकले. खास वारीसाठी मला रजा मिळत नसे. म्हणून मी एप्रिल-मे महिन्याची रजा राखून ठेवायचो. मी शासकीय अधिकारी असल्याने तीन आठवड्यांची रजा मंजूर होत नसे. त्यामुळे मी आजारी असल्याचे सांगायचो. ठाण्याहून आळंदीला बसने निघायचो. आळंदीहून माऊलीचे प्रस्थान निघायचे. प्रस्थान आणि पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शन मी कधी चुकविले नाही. वारीदरम्यान शासकीय काम आले की तेवढे उरकायचो आणि ज्या ठिकाणाहून वारी सोडली तिथून ३० ते ४० किमी चालून माऊलीला गाठायचो. वारी म्हणजे वेगळा आनंद असतो. माऊलीची मोठी शक्ती सोबत असते. माऊलीला भेटण्यासाठी आम्ही आतुर आहोत, पुढच्या वर्षीच्या वारीची वाट पाहत आहोत. - दिनकर पाचंगे, ठाणेवारीतील खंड अत्यंत क्लेशदायी४२ वर्षे माऊलीने माझ्याकडून पंढरपूरची वारी अखंड करून घेतली. सुदैवाने यात कधीही खंड पडला नाही. १९७७ साली मी पहिली वारी केली, तेव्हा मी फक्त ९ वर्षांचा होतो. ते पहिले वर्ष आईसोबत गेले. १९७७ साली मी आळंदी ते पंढरपूर वर्षभर वारी करणारे वारकरी नाना देशमुख यांच्या दिंडीमध्ये गेलो. तिथून सुरुवात झाली ती आजतागायत अखंडपणे सुरूच आहे. आजवर ज्या वारीमध्ये कोणत्याही परिस्थितीत खंड पडला नाही, त्या वारीमध्ये यंदा कोरोनाचे सावट आले आणि खंड पडला. याचे मनापासून दु:ख वाटते. या दु:खाचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही. परंतु, संत तुकाराम महाराज यांच्या शब्दांत सांगायचे तर, जीवना वेगळी मासळी, तैसा तुका तळमळी.- सुरेश कानडे, ठाणेघरूनच करणार पांडुरंगाची प्रार्थनामाझी पहिली वारी १९४७ साली आईच्या पोटात असतानाच झाली. त्यानंतर मी ५ ते ६ वर्षे मावशीबरोबर जायची. माझा वारकरी संप्रदायात जन्म झाल्यामुळे घरातील वातावरण तसेच होते. १९६८ साली मी पहिली पायी वारी केली आणि त्यानंतर काही अडचणी सोडल्या तर ३५ वर्षे ती केली आहे. गेल्या वर्षी गुडघेदुखीमुळे जाता आले नाही. त्यामुळे यंदा वारीला जाण्याचा निश्चय केला होता. परंतु, कोरोनामुळे यंदाची वारी चुकली. घरात एखादी दुर्घटना घडल्यावर जितके वाईट वाटत नाही तितके वारी चुकल्याचे वाईट वाटते. यंदा आमची काय चूक झाली, की पांडुरंगालाच आमचा कंटाळा आलाय, असे प्रश्न मनात येतात. कोरोनाचे संकट टळू दे, अशी प्रार्थना घरातूनच पांडुरंगाला करणार आहे. - सुनंदा आढाव, ठाणेवारीचे क्षण राहून राहून आठवतात१९८७ सालापासून मी पंढरीच्या वारीला न चुकता जात आहे. आजवर माऊलीच्या दर्शनात कोणत्याच कारणामुळे खंड पडला नाही. पण यंदा कोरोनामुळे देवाचे दर्शन होणार नाही, माऊलीबरोबर जाता येणार नाही, याचे खूप दु:ख झाले आहे. दरवर्षीचे वारीचे सर्व क्षण आठवत आहेत. वारकºयांसोबतच्या आठवणी राहून राहून मनात येत आहेत. त्यामुळे वारी चुकल्याचे जास्तच वाईट वाटत आहे. वारीच्या आनंदाला यंदा कोरोनामुळे मात्र मुकावे लागले, कोरोनाने आमचा वारीचा आनंद हिरावून घेतला. पण आता नाइलाज आहे. या वेळी पांडुरंगाला घरी राहूनच साकडे घालू. जगावर आलेले कोरोनाचे संकट दूर व्हावे, यासाठी देवाला मनापासून प्रार्थना करू. - दत्ता वैद्य, ठाणे

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीAshadhi Ekadashiआषाढी एकादशीPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर