शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
5
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
6
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
7
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
8
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
9
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
10
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
11
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
12
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
13
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
14
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
15
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
16
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
17
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
18
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
19
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
20
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'

विटावा ते कोपरी खाडीपुलाला मंजुरी, खाडीवर चौथा पूल, ठाणे पूर्वचा वळसा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:32 AM

कळवा खाडीपुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरू असताना आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान नव्या खाडीपुलाची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे.

- अजित मांडकेठाणे : कळवा खाडीपुलावर तिसऱ्या पुलाचे काम सुरू असताना आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान नव्या खाडीपुलाची उभारणी करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे नवी मुंबईकडून येणारी वाहतूक आता थेट या नव्या पुलामुळे कोपरी पूर्वेतून ईस्टर्न एक्स्प्रेसवर जाणार आहे. तसेच सध्याच्या कळवा खाडीवर अस्तित्वात असलेल्या पुलावरील ताण कमी होऊन येथील वाहतूककोंडी सुटण्यासही मदत होणार आहे. याशिवाय, कळव्यातून पुढे जाणाºया कळवा ते आत्माराम पाटील चौकादरम्यानच्या रस्त्याचे रुंदीकरण आणि सेवारस्ता तयार करण्यालाही मान्यता दिल्याने कळव्यातून थेट पारसिकनगर, मुंब्य्राकडे जाणारा रस्ता सुसाट होणार आहे. या दोन्ही प्रकल्पांवर अंदाजे ८०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.सध्या कळवा खाडीपुलावर ठाणे महापालिकेच्या माध्यमातून तिसºया पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे कळवानाका ते विटावा आदी भागांत वाहतूककोंडी होत आहे. हा पूल झाला तरी वाहतूककोंडीची समस्या फारशी सुटणार नसल्याचे दिसत आहे. सध्या कळवा खाडीपुलावर ब्रिटिशकालीन पूल आहे. परंतु, तो वाहतुकीसाठी बंद केला आहे. दुसरा पूल वाहतुकीचा ताण सहन करण्यापलीकडे गेला आहे. त्यामुळे आता तिसºया पुलाचे काम वेगाने सुरूआहे. परंतु, एवढे होऊनही कळवानाक्यावर बॉटलनेक असल्याने भविष्यात या ठिकाणी वाहतूककोंडी होणार, हे निश्चित मानले जात होते. त्यामुळे मागील काही वर्षांपासून कळव्यातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी स्थानिक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. मागील हिवाळी अधिवेशनातदेखील त्यांनी विटावा ते कोपरी खाडीपूल आणि कळवा ते आत्माराम पाटील चौकापर्यंत रस्त्याचे काम करावे, अशी मागणी त्यांनी लावून धरली होती. हे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली होती. त्यानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील आठ दिवसांत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार, आता शासनाने विटावा ते कोपरीदरम्यान खाडीपुलाच्या कामाला मंजुरी दिली आहे. तसेच कळवा ते आत्माराम पाटील चौक रस्ता रुंदीकरण आणि सेवारस्त्याचा प्रकल्प मार्गी लावण्याबाबतही ग्रीन सिग्नल दिला आहे. या दोन्ही प्रकल्पांची कामे ठाणे महापालिकेने करावीत, असेही शासनाने आदेशात नमूद केले आहे.या पुलाच्या बांधकामासाठी ठाणे महापालिकेला तांत्रिक साहाय्याची आवश्यकता भासल्यास आवश्यकतेनुसार एमएमआरडीएने ते करावे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.नवी मुंबई तेकोपरी होणार सुसाट१ विटावा ते कोपरी खाडीपूल नवी मुंबईतील पटनी कंपनीपासून ते कोपरी असा दोन किमीचा असणार आहे. या पुलामुळे नवी मुंबईतून ज्यांना मुंबईत जायचे असेल, त्यांना हा शॉर्टकट ठरणार आहे. त्यामुळे कळवानाक्यावर किंवा विटावा पुलाखाली होणारी कोंडी फुटण्यास मदत होणार आहे.२ या पुलावरून वाहतूक थेट कोपरीमार्गे ईस्टर्न एक्स्प्रेसला जाऊ शकणार आहे. तर, कळवानाक्याजवळ बॉटलनेक असल्याने कळव्यावरून रेतीबंदरपर्यंत जाण्यासाठी वाहनचालकांना कसरत करावी लागत होती. परंतु, आता या रस्त्याचेदेखील रुंदीकरण करण्यात येणार आहे.३कळवा ते आत्माराम पाटील चौक हा रस्ता सुमारे साडेपाच किमीचा आहे. आता त्याच्या रुंदीकरणाचाही मार्ग मोकळा झाल्याने तो सुसाट होणार आहे. त्यातही या मार्गावर सेवारस्तादेखील होणार असल्याने लहान, हलक्या वाहनांसाठीदेखील हा रस्ता फायदेशीर होणार आहे.४या दोन्ही प्रकल्पांचा खर्च सुमारे ८०० कोटींच्या आसपास असल्याची माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली. एकूणच या दोनही प्रकल्पांमुळे कळव्याचा बॉटलनेक मोकळा होणार असून भविष्यात येथे वाहतूककोंडी नावालादेखील शिल्लक राहणार नसल्याचे सध्या तरी दिसत आहे.मागील पाच वर्षे याबाबत पाठपुरावा सुरू होता. मागील हिवाळी अधिवेशनातदेखील या प्रकल्पांचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी यावर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. आता शासनाने या प्रकल्पांना मंजुरी दिल्याने खºया अर्थाने कळव्याची कोंडी फुटणार आहे.- जितेंद्र आव्हाड, आमदार, कळवा-मुंब्रा विधानसभा क्षेत्र, राष्टÑवादी

टॅग्स :thaneठाणे