शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
2
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
3
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
5
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
6
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
7
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
8
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
9
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
10
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
11
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
12
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
13
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
14
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
15
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
16
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
17
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
18
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
19
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
20
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

अंबरनाथ, बदलापूरला दिवसाआड पाणीपुरवठा,  बारवी, आंध्र धरणांतील साठ्यात घट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2018 3:27 AM

नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे.

बदलापूर - नवीन वर्षात अंबरनाथ, बदलापूर शहरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागणार आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी आणि आंध्र या दोन्ही धरणांच्या साठ्यात घट झालेली आहे. जिल्ह्यात आठवड्यातून ३० तास पाणीकपात करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने ११ डिसेंबर २०१८ च्या झालेल्या बैठकीत घेतला आहे.जानेवारीच्या दुसºया आठवड्यापासून बदलापूर आणि अंबरनाथ या दोन्ही शहरांना धरणातून होणारा पाणीपुरवठा यापुढे एक दिवसाआड होणार असल्याचे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. शहरातील नागरिकांनी पाणीटंचाईला सहकार्य करावे व पाणी जपून वापरावे, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे. तसेच गळतीचे प्रमाणही वाढत आहे. त्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अधिकारी गांभीर्याने कधी बघणार, असा सवाल नागरिक विचारत आहेत.यापूर्वी अंबरनाथ आणि बदलापूर शहरांत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्यात येत होती. मात्र, पाणीटंचाईच्या झळा आता यापुढे अधिक प्रकर्षाने जाणवणार आहेत. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यानंतर ही पाणीकपात लागू होणार असल्याने यापुढील काळात नागरिकांना उन्हाळा जसजसा जवळ येईल, तसतसा पाणीकपातीचा आणखीनच सामना करावा लागणार आहे.मागील काही दिवसांपासून अंबरनाथ आणि बदलापूरच्या अनेक भागांत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यातच, एक दिवसाआड पाणीपुरवठा होणार असल्याने बदलापूर, अंबरनाथमधील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. पाणीटंचाईला नागरिकांनी सहकार्य करावे व पाणी जपून आणि काटकसरीने वापरावे, असे आवाहन महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.  टंचाईग्रस्त अंबरनाथकरांनी रोखला महामार्गअंबरनाथ : नियमित पाणीपुरवठा होत नसल्यामुळे पाणीटंचाईने त्रस्त झालेल्या नागरिकांनी हंडा आणि कळशा घेऊन कल्याण-बदलापूर महामार्ग बुधवारी सकाळच्या वेळेस काही काळ रोखून धरला होता. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर महामार्ग सुरळीत करण्यात आला. पाणीकपात आणि अनियमित येणारे पाणीही येत नसल्याने बुवापाडा परिसरातील नागरिकांना हंडा, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.बुवापाडा येथे मागील काही दिवसांपासून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्याने येथील नागरिकांनी संतप्त होऊन कल्याण-बदलापूर महामार्ग रोखून धरला. यामुळे काही काळ कोंडी झाली होती. जोपर्यंत जीवन प्राधिकरणाचे अधिकारी येऊन पाणीपुरवठा नियमित करण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, अशी भूमिका घेतल्याने अर्धा तास महामार्ग रोखून धरला होता. शेवटी, पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. पाणीखात्याचे अधिकारी टंचाईग्रस्त भागातील नागरिकांची बैठक बोलावून मार्ग काढण्याचे सांगितल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.लघुपाटबंधारे खात्याच्या सूचनेवरून पाणीपुरवठा सोमवारी बंद ठेवण्यात येत असल्याने त्यापुढे पाण्याची पातळी वाढण्यास काही कालावधी लागतो. मात्र, बुवापाडा भागात भेडसावणारी पाणीटंचाईची तीव्रता कमी करण्यासाठी लक्ष देणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.डी. शिंदे यांनी दिली.

टॅग्स :Waterपाणीbadlapurबदलापूर