शहरं
Join us  
Trending Stories
1
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
2
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
3
महिन्याभरात २६७ शेतकऱ्यांच्या आत्महत्या; जयंत पाटलांनी सरकारला धारेवर धरलं
4
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
5
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
6
संजय राऊतांच्या आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या बॅगा तपासल्या; नाशिकमध्ये काय घडलं?
7
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
8
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
9
बाळासाहेबांवर टीका करणाऱ्या अंधारेंना पक्षात का घेतलं?, CM विरोधात लढणार का?; आदित्य ठाकरेंची रोखठोक उत्तरं
10
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
11
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
12
गाडी चालविताना मोबाईल काय साधा कागद जरी हातात जरी पकडला तरी दंड; जाणून घ्या वाहतुकीचा नियम...
13
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
14
Post Officeच्या 'या' स्कीममध्ये PM Modiनी देखील केलीये ९ लाखांची गुंतवणूक, तुम्हालाही मिळेल उत्तम रिटर्न
15
'ड्रग्स पासून दूर राहा', शुभांगी गोखलेंनी लेकीला हात जोडून सांगितलं; ती लंडनला गेल्यावर...
16
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
17
ना पाकिस्तान, ना ऑस्ट्रेलिया! ब्रायन लाराने जाहीर केले T20 World Cup चे ४ सेमीफायनलिस्ट
18
दोन्ही पायांनी दिव्यांग, जिद्द नाही सोडली; स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवला हजारो लोकांचा जीव
19
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
20
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका

नाला नव्हे, चक्क डम्पिंग ग्राउंड, अंबरनाथमध्ये अस्वच्छतेचे साम्राज्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2018 6:29 AM

अंबरनाथ नगरपालिकेपासून १० मीटर अंतरावर स्टेशन रोडवरील मुख्य नाला हा सर्वांचे लक्ष वेधत आहे. कारण, या नाल्यातूनच पाणी कमी कचरा जास्त वाहत आहे.

अंबरनाथ - अंबरनाथ नगरपालिकेपासून १० मीटर अंतरावर स्टेशन रोडवरील मुख्य नाला हा सर्वांचे लक्ष वेधत आहे. कारण, या नाल्यातूनच पाणी कमी कचरा जास्त वाहत आहे. स्टेशन परिसरातील सर्व व्यापारी आपल्या दुकानातील कचरा घंटागाडीत न टाकता थेट मुख्य नाल्यातच टाकत आहे. त्यामुळे नाल्यातील पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण झाला आहे. तर, नाल्यात कचरा टाकणाऱ्यांवर पालिका कोणतीच ठोस कारवाई करताना दिसत नाही.अंबरनाथ रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मुख्य रस्त्यावरील नाल्यावर ५० वर्षांपूर्वीचा पूल आहे. या पुलाचे पाच वर्षांपूर्वी मजबुतीकरण करून ठेवले आहे. अंबरनाथ पश्चिम भागातील सर्व लहानमोठे नाले हे याच नाल्यात एकत्रित होत असतात. विम्कोनाक्यापासून ते सर्कस ग्राउंडमार्गे हा नाला स्टेशन परिसरात येतो. या नाल्याशेजारीच अनेक दुकाने आहेत. या नाल्यात अतिक्रमण करून अनेक दुकानेही थाटली आहेत. दिवसागणिक हा नाला अतिक्रमणामुळे अरुंद होत आहे. आता त्यात या नाल्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करण्यातही येत आहे. या नाल्यात १२ महिने पाणी असते. त्यातच पावसाळ्यात हा नाला भरून वाहत असतो.स्टेशन परिसरातील नाला महत्त्वाचा असतानाही पालिका त्याकडे दुर्लक्ष करत आहे. स्टेशन परिसरातील या नाल्यात आता स्थानिक व्यापारी आपल्या दुकानातील सर्व कचरा थेट नाल्यात टाकतात. अंबरनाथ पालिकेने सर्व व्यापाºयांना कचरा संकलित करण्यासाठी स्वतंत्र डबे पुरवले आहे. मात्र, या डब्यातील कचरा घंटागाडीत न टाकता तो थेट मुख्य नाल्यात टाकण्याचे काम केले जाते. सकाळी ८ पासून ते १० पर्यंत सर्व व्यापारी याच नाल्यात कचरा टाकत असतात. स्टेशन परिसरातील कचरा उचलण्यासाठी पालिकेने घंटागाडीची सोय केलेली असतानाही व्यापारी मात्र हा कचरा थेट नाल्यात फेकतात. नाल्यात साचलेल्या कचºयामध्ये सर्वाधिक कचरा हा कपड्यांचे बॉक्स, पिशव्या, चिंध्या आणि थर्माकोल यांचा आहे.स्टेशन परिसरातील दुकानदारांचा बेशिस्तपणा येथेच थांबलेला नाही. स्टेशन परिसरातील हॉटेलचालक आणि फेरीवालेही सर्व कचरा थेट याच नाल्यात टाकतात. नाल्याशेजारीच असलेला फळविक्रेतादेखील आपल्याकडील सर्व कचरा नाल्यात टाकतो. शेजारी असलेले सर्व हॉटेलचालकही दुकानातील सर्व घाण आणि वाया गेलेले अन्न नाल्यात फेकून देतात. सर्वात मोठी अडचण म्हणजे स्टेशन परिसरातील नारळविक्रेता हा पाणी संपलेले नारळ थेट नाल्यात फेकत असल्याने त्याचा खच पडला आहे.स्टेशन परिसरातील सर्वात जास्त रहदारी असलेल्या रस्त्यावरील नाल्यातदेखील ही परिस्थिती निर्माण झाल्याने पालिकेचे अधिकारी मात्र केवळ बघ्याची भूमिका घेत आहेत. स्टेशन परिसरातील मुख्य नाल्याची ही अवस्था असेल तर शहरातील इतर नाल्यांची अवस्था काय असेल, याची कल्पना न केलेली बरी.स्टेशन परिसरातील नाल्यातील कचºयाचे छायाचित्र काढून त्याची तक्रार पालिकेच्या आॅनलाइन तक्रार यंत्रणेकडे पाठवल्यावर पालिकेने दिलेले उत्तरही संतापजनक आहे. कचरा पडलेला असतानाही तक्रारीचे निवारण न करता पालिकेने हा कचरा थेट पावसाळ्यापूर्वी नालेसफाईदरम्यानसाफ केला जाईल, असे स्पष्ट करून आपली जबाबदारी झटकली आहे.स्वच्छतेसाठी एकीकडे अधिकारी झटत असताना काही अधिकारी आलेल्या तक्रारीला गांभीर्याने घेत नसल्याने अधिकाºयांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण होत आहे. आलेल्या तक्रारींची लागलीच दखल घेऊन त्या भागाची स्वच्छता करणे अपेक्षित असताना पालिका मात्र आपली जबाबदारी झटकताना दिसत आहे. पालिकेच्या या कारभारावर नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.व्यापाºयांकडूनच होतेय नियमांचे उल्लंघनदुसरीकडे स्टेशन परिसरातील सर्व व्यापाºयांना कचरा संकलित करून तो कचरा घंटागाडीतच टाकण्याच्या सूचना असतानाही हे व्यापारी थेट कचरा नाल्यात टाकत असल्याने त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. पालिकेने जातीने याकडे लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुख्य नाल्यासोबत भाजी मंडई येथील नाल्याची आणि बांगडीगल्ली येथील नाल्याचीदेखील तीच अवस्था असल्याने नाला हा व्यापाºयांसाठी मिनी डम्पिंग ग्राउंड झाले आहे. पालिकेने वेळीच या नाल्यांची सफाई न केल्यास शहरात आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे बोलले जात आहे.नाल्यातील सर्व कचरा लागलीच उचलण्याचे काम केले जाईल. तसेच यापुढे नाल्यात कचरा टाकणाºयांवर कारवाई करण्याचे आदेश पालिकेच्या आरोग्य विभागाच्या अधिकाºयांना दिले आहे.- देविदास पवार, मुख्याधिकारीसर्वात आधी नाल्याची स्वच्छता करणे गरजेचे आहे. त्यानंतर, स्टेशन परिसरातील सर्व व्यापाºयांना कचºयाच्या संकलनाविषयी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. त्यानंतरच कचरा टाकणाºयांवर कारवाई करणे गरजेचे आहे.- प्रदीप पाटील, विरोधी पक्षनेते

टॅग्स :thaneठाणेnewsबातम्या