शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

महाविकास आघाडीचा पाया रचला अंबरनाथमध्ये, पालिकेत एकत्र येत केली विकासकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2019 1:33 AM

राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अंबरनाथ : राज्यात आजपासून महाविकास आघाडीची सत्ता अस्तित्वात आली असली तरी या महाविकास आघाडीचा मूळ पाया अंबरनाथ शहरात रचला गेला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. अंबरनाथ पालिकेमध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येऊन शहर विकासाची काम करीत असल्याचे पाहावयास मिळते.२०१५ मध्ये अंबरनाथ पालिकेची निवडणूक झाली. त्यावेळी आणि त्यानंतर २०१७ मध्ये अशा दोन वेळा नगराध्यक्ष पदाच्या निवडणुका झाल्या. या दोन्ही वेळेस ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिलाहोता. राष्ट्रवादी काँग्रेसनेही शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यापूर्वी २०१३ मध्ये झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली नगरसेवकांची पळवापळवी थोडक्यात म्हणायचे तर झालेला घोडेबाजार लक्षात घेऊन त्यानंतरच्या निवडणुकीत शहर विकासासाठी आम्ही शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिल्याचे पाटील यांनी सांगितले.जानेवारी २०१७ मध्ये काँग्रेसचे कार्याध्यक्ष व नगरसेवक उमेश पाटील यांच्या पुढाकाराने त्यांच्या प्रभागात काँक्रिटच्या रस्त्याच्या कामाचा तसेच विविध विकासकामांचा भूमिपूजन सोहळा झाला होता. या कार्यक्र माला पालकमंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार डॉ. बालाजी किणीकर, नगराध्यक्षा मनीषा वाळेकर, शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते व शहर अध्यक्ष सदाशिव पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्र मात भाजपचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित नव्हते. कार्यक्र माच्या बॅनरवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची छायाचित्रे झळकली होती.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात लावलेल्या बॅनरचा आवर्जून उल्लेख केला होता. शहर विकासासाठी पक्षभेद विसरून काँग्रेसने लोकप्रतिनिधींना प्रमुख पाहुणे म्हणून बोलावले ही विशेष उल्लेखनीय गोष्ट आहे. याचा राज्याने आदर्श घ्यावा असे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले होते. त्यांचे हे वाक्य आजखरे ठरले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेत मध्येच गटबाजी निर्माण झाल्याने त्याठिकाणी सत्तेचे समीकरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली होती. या सत्तेत भाजपनेही पुढाकार घेऊन शिवसेनेच्या एका गटाच्या माध्यमातून सत्ता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. भाजपची ही खेळीहाणून पाडण्यात पुन्हा एकदा काँग्रेसने पुढाकार घेतला होता. नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या उमेदवारीला काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पाठिंबा देत सत्ता स्थापन केली होती. विशेष म्हणजे पाठिंबा देत असताना कोणतेहीपद काँग्रेसने स्वीकारले नव्हते.पाच वर्षे एकत्रगेल्या पाच वर्षात झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना ही एकत्रित निवडणूक लढवत आली आहे. अशा परिस्थितीत राज्यात निर्माण झालेली महाविकास आघाडी त्याचा पाया हा अंबरनाथमधील रचला गेला असेम्हटले तर वावगे ठरणार नाही 

टॅग्स :ambernathअंबरनाथShiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस