शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

आमचं सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार- जितेंद्र आव्हाड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2019 1:53 PM

दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते.

ठाणे - दिवसेंदिवस रेल्वेप्रवाशांची दुर्दशाच होत आहे. जीव मुठीत धरून रेल्वेत चढलो तरी जिवंत परत येऊ का?, अशी धाकधूक रेल्वे प्रवासी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात कायम असते. रेल्वेच्या पुलांसह रेल्वेंना जोडणारे पादचारी पूल आणि रस्त्यांवरील पूल धोकादायक झालेले असतानाही हे सरकार जबाबदारी स्वीकारण्याऐवजी चालणाऱ्या प्रवाशांना दोष देत आहेत.असा निर्लज्जपणा आणि मग्रुरी प्रथमच अनुभवायला मिळत आहे. वास्तविक पाहता, बुलेट ट्रेनवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यापेक्षा उपनगरीय रेल्वे सेवा सुधारणे गरजेचे आहे. मात्र, तेच केले जात नाही. त्यामुळे आमचे सरकार आल्यानंतर प्रथम बुलेट ट्रेन रद्द करून तो निधी उपनगरीय रेल्वेसाठी वापरणार असून, जाहीरनाम्यामध्येही तसे नमूद करणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे. दरम्यान, सीएसटी पुल दुर्घटनेतील मृतांना 25 लाख आणि जखमींना 15 लाखांचे अर्थसाह्य देण्यात यावे, अशीही मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.गेल्या 5 वर्षांत रेल्वे प्रवाशांची आणि रेल्वेसेवेची दुर्दशा झाली आहे. कर्जत-कसारा ते सीएसटी; पनवेल ते सीएसटी आणि विरार ते चर्चगेट असा प्रवास करणारे चाकरमानी जीव मुठीत धरून प्रवास करीत असतात. गेल्या वर्षभरात मुंबईमध्ये तीन पूल कोसळले. पण त्याचे या राजकीय व्यवस्थेला कसलेही सोयरसुतक नाही. हा अपघात प्रवाशांच्या चुकीमुळे झाला असल्याचा दावा हे लोक करीत आहेत. यावरून त्यांच्यातील मग्रुरीच दिसून येत आहे. रेल्वेच्या सुधारणा करण्याऐवजी प्रवाशांनाच दोष देण्याची ही कृती अत्यंत असंवेदनशील आणि बेशरमपणाची आहे.मुंबई ठाण्यातील रेल्वेचे पूल, रेल्वेशी संलग्न असलेले पूल, रस्त्यांवरील पूल यांना आता जवळपास 50 ते 70 वर्षे झालेले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे. त्यामध्ये टिळक पूल असो किंवा कोपरीचा पूल! कोपरीचा पूल तर अत्यंत जर्जर झालेला असून रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांनी बांधकाम खात्याच्या कार्यकारी अभियंत्यांना 5 नोव्हेंबर 2015 रोजी पत्र लिहून या पुलावरील जड वाहतूक बंद करण्याच्या सूचना केल्या आहेत.या पत्राला तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही सरकारकडून कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. लोकांचे जीव जाण्याचे वाट हे सरकार पाहत आहे का? गरीबांचा जीव हा जीव नसतो का? धोकादायक फलक लावण्याचेही औदार्यही दाखवण्यात आलेले नाही. त्यामुळे रेल्वे, रेल्वेशी संलग्न आणि रस्त्यावरील सर्व पुलांचे ऑडिट करून त्याची श्वेतपत्रिका काढावी; सकाळी आणि सायंकाळी रेल्वेतील प्रवाशांच्या गर्दीचे नियोजन करावे, अशी मागणी आ. आव्हाड यांनी केली आहे.दरम्यान, एकीकडे दररोज दोनशे अपघात होत आहेत. या दुर्घटनांमध्ये लोक मारले जात असताना जगाच्या बाजारात हा देश विकण्यासाठी हे सरकार बुलेट ट्रेन आणू पाहत आहे. हा प्रकल्प मुंबई, ठाणे-पालघरवासीयांच्या काही कामाचा नसतानाही तो लादला जात आहे. त्यामुळे तो तत्काळ रद्द करावा आणि त्यासाठी वापरण्यात येणारा निधी मुंबई प्रांतीय रेल्वे सुधारणेसाठी वापरावा, अशी मागणी करुन आमचे सरकार आल्यानंतर बुलेट ट्रेन तत्काळ रद्द करून तो निधी ठाणे, मुंबई रेल्वेसेवा आणि रेल्वेशी संलग्न असलेल्या सेवांसाठी वापरण्यात येईल, असे आश्वासन शरद पवार यांनी दिले असल्याचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडCST Bridge Collapseसीएसएमटी पादचारी पूल दुर्घटना