शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्तांच्या दिलगिरीनंतर ठाणे महापालिकेतील वाद शमला; उद्धव ठाकरेंकडे झाली बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2019 23:46 IST

अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याचे पत्र घेणार मागे; अधिक ताणून न धरण्याचे आदेश, कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यासाठी घेतली होती भेट

ठाणे : ठाण्यातील सत्ताधारी शिवसेनेसह अन्य पक्षाचे नगरसेवक व आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यात गेले दोन आठवडे रंगलेला वाद मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मध्यस्थीनंतर तात्पुरता शमला आहे. जयस्वाल यांनी दिलगिरी व्यक्त केल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. आपल्या विरोधात दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव तातडीने चर्चेला घेण्याची मागणी करणारे जे पत्र जयस्वाल यांनी दिले होते ते मागे घेण्याची तयारीही त्यांनी दाखवली आहे.

ठाणे जिल्हा रुग्णालयाच्या ८३ वर्षे जुन्या इमारतीचा पुनर्विकास करुन तेथे ५७४ खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उभे करण्याकरिता राज्य सरकारने ३१४ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रुग्णालयाच्या संकल्पचित्राचे अनावरण उद्या, बुधवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्याकरिता चार दिवसांपूर्वी जयस्वाल यांनी ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उभयतांमध्ये महापालिकेतील वादंगाबाबत चर्चा झाली होती. नगरसेवक व आयुक्त वाद चिघळला असतानाच कार्यक्रमाकरिता उपस्थित राहिलो तर मीडिया याच विषयावरुन प्रश्नांची सरबत्ती करण्याची शक्यता ठाकरे यांना वाटत होती. शिवाय या कार्यक्रमात वादाचे पडसाद उमटले तर नामुश्की होईल, अशी भीतीही त्यांना वाटत होती. त्यामुळे पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापौर मीनाक्षी शिंदे, सभागृह नेते नरेश मस्के आदींसोबत आयुक्त जयस्वाल यांना ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्रीवर बोलावून घेतले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्त जयस्वाल यांनी आपण महापौर शिंदे यांना अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याबाबत दिलेल्या पत्रात एकाही शिवसेना नगरसेवकाचा उल्लेख केला नसल्याकडे लक्ष वेधले. आपण पत्रात काँग्रेस, भाजप नगरसेवकांचा उल्लेख केला असून सत्ताधारी शिवसेनेला सहकार्य करण्याचीच भूमिका सातत्याने घेतली आहे.

वेळप्रसंगी राज्यातील सत्ताधारी भाजपचा रोष पत्करला आहे. मात्र असे असतानाही विनाकारण आपल्याला शिवसेनेच्या काही नगरसेवकांकडून लक्ष्य केले जाते, अशी भूमिका जयस्वाल यांनी घेतली. मात्र महापौर शिंदे यांनी आपण सुरु केलेल्या कामांचे प्रस्ताव आयुक्तांनी हेतूत: कसे रोखून धरले, महासभेला अनुपस्थित राहण्याचे मेसेज कसे अधिकाऱ्यांना दिले गेले वगैरे बाबींकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले. आयुक्त हे महापौर, नगरसेवक यांचा अपमान करतात, याकडे महापौरांनी लक्ष वेधले. त्यामुळे जयस्वाल यांनी आपल्याकडून काही चुका झाल्याचे कबुल करीत दिलगिरी व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे यांनीही अधिक ताणून न धरण्याचे आदेश महापौरांना दिले.मातोश्री भेटीनंतर वर्षावर पायधूळमातोश्रीवर आयुक्त जयस्वाल व शिवसेना नेतृत्व यांच्यात झालेल्या बैठकीनंतर त्यांनी तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वर्षा निवासस्थान गाठले असे समजते. बैठकीत झालेल्या निर्णयांची माहिती जयस्वाल यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिल्याचे बोलले जाते. अर्थात याला दुजोरा मिळू शकला नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात राज्याच्या मुख्य सचिवांपासून अनेक बडे सनदी अधिकारी मातोश्रीवर पायधूळ झाडत होते. मात्र ठाण्यात सेनेची स्वबळावरील सत्ता असल्याने जयस्वाल यांनाही मातोश्रीवर पायधूळ झाडावी लागली, याची ठाण्यातील वर्तुळात चर्चा आहे.ठाणे आयुक्त चार दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांना भेटले होते. वाद वाढू नये ही विनंती आयुक्तांनी केली होती. त्यामुळे ठाकरे यांनी सर्वांना बोलावले होते. समोरासमोर बसवून गैरसमज दूर केले. अविश्वास प्रस्ताव चर्चेला घेण्याचे पत्र मागे घेण्यास आयुक्तांना सांगितले. महापौर मीनाक्षी शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र सभागृहात आयुक्तांची उपस्थिती असावी याबाबतचे आहे. शहराचा विकास डोळ््यासमोर ठेवून एकत्र काम करण्याच्या सूचना ठाकरे यांनी केल्या आहेत. -एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणेआमच्याकडून कोणताच वाद नव्हता. आयुक्तांनी सुरुवात केली होती. मातोश्रीवर येऊन जयस्वाल यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी मुख्यमंत्र्यांना दिलेले पत्र परत घेणार नाही. कारण वाद आयुक्तांनी सुरु केला होता. आयुक्त महासभेला वारंवार गैरहजर रहात होते. त्यामुळे आम्ही त्या पत्रात आयुक्तांनी महासभेला हजर रहावे, अशी सूचना केली आहे. कितीही वाद असले तरी ठाणे शहराच्या विकासासाठी एकत्र कामाला लागलो आहोत. वैयक्तिक वादाचा ठाण्याच्या विकासावर परिणाम होऊ नये या मताचे आम्ही आहोत.- मीनाक्षी शिंदे, महापौर, ठाणे

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका