शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आता कोकणासह राज्यातील कोणत्याही जिल्ह्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2018 18:12 IST

जिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल. या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे.

ठळक मुद्देकेवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले

ठाणे : विद्यार्थी संख्ये अभावी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न दिवसन दिवस गंभीर होत आहे. जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील १५६ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न निकाली काढत असताना केवळ ७७ शिक्षकांचे समायोजन जिल्हह्यातील खाजगी शाळांमध्ये झाले. पण उर्वरित ७९ शिक्षकांना विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केले आहेत. त्यांचे समायोजन आता कोकणातील जिल्ह्यांत अन्यथा राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागे केले जाणार आहे.विद्यार्थी संख्ये अभावी जिल्ह्यात अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न निकाली काढण्यासाठी तीन दिवसांपूर्वी कोपरी येथील मंगला हायस्कूलमध्ये कॅम्प घेण्यात आला. त्यावेळीजिल्ह्यात रिक्त असलेल्या जागांवर शिक्षकांचे समायोजन झाले. यामध्ये १५ शिक्षकांचे पाचवी ते सहावीच्य विद्यार्थ्यांसाठी समायोजन झाले. तर सातवी ते आठवीच्या वर्गासाठी ३१ शिक्षक आणि नववी ते दहावीच्या वर्गासाठी ३१ शिक्षकांचे रिक्त जागी समायोजन झाले. या सुमारे ७७ शिक्षकांचे जिल्ह्यातील खाजगी माध्यमिक शाळांमध्ये समायोजन करण्यात आले आहे. यानंतर उरलेल्या ७९ शिक्षकांची रवानगी आता कोकण विभागीय आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे. त्यांचे समायोजन ठाणे जिल्ह्या व्यतिरिक्त कोकण विभागीतील अन्य जिल्ह्यात होईल.या शिक्षकाना जिल्ह्या बाहेर सेवा देण्याचा गंभीर प्रश्न उद्भवला आहे. आता त्यांची उर्वरित सेवा अन्य जिल्ह्यातच पूर्ण होणार आहे. काही शिक्षकांचे महापालिकांमधील शाळेत तर काहींची सेवा जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये पूर्ण होणार आहे. महापालिकांमध्ये कार्यरत होणाऱ्या शिक्षकांचा मात्र फायदाच होणार असल्याचे जाणकारांकडून सांगितले जात आहे. तर जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये दाखल होणाºयां शिक्षकांची अतिरिक्त ठरण्याची समस्या कायमची सुटणार असल्याचे बोलले जात आहे. कोकण विभागातील शाळांमध्येही या कर्मचाºयांना सामावून घेण्याचा प्रश्न उद्भवल्यास त्यांना राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील शाळांमधील रिक्त जागी सामावून घेण्याचे शासन धोरण जारी करण्यात आले आहे.

टॅग्स :thaneठाणेzp schoolजिल्हा परिषद शाळा