शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

कल्याण ते आसनगाव, बदलापूर चार पदरी रुळांच्या कामाला गती द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत मार्गावरील तीन, चारपदरी लोहमार्ग व त्यातही कल्याण ते ...

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत मार्गावरील तीन, चारपदरी लोहमार्ग व त्यातही कल्याण ते आसनगाव आणि कल्याण ते बदलापूर हा प्रस्तावित चारपदरी लोहमार्ग लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी. तसेच कल्याण ते मुरबाड या नवीन मार्गाचा विकास आराखडा लवकर तयार करावा, आदी मागण्यांसाठी भिवंडीचे खा. कपिल पाटील यांनी मुंबईत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष संजीव मित्तल यांची सोमवारी भेट घेतली.

यावे‌ळी भिवंडी मतदारसंघात कोणकोणत्या ठिकाणी रेल्वेस्थानकांचा विचार केला आहे, याची माहिती मिळावी, अशी विनंती खा. पाटील यांनी केली. आसनगाव येथील उड्डाणपुलाचा प्रश्न तसेच प्रलंबित मुद्द्यांवरही चर्चा झाली. महाव्यवस्थापक व उपस्थित अधिकाऱ्यांनी पाटील यांच्या सूचनांवर सकारात्मक प्रतिसाद दिला. संबंधित यंत्रणांशी चर्चा, विनिमय करून लवकर आवश्यक ते बदल करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन त्यांना देण्यात आले.

यावेळी रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी मनोज शर्मा, अश्वनी सक्सेना, मनजित सिंग, मुकुल जैन, दिनेश वशिष्ठ, विजय नथावट, विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलाभ गोयल आदी उपस्थित होते.

---------