शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

ठाणे जिल्ह्यातील पाणी समस्या मिटली; भातसासह बारवी धरणात ९० टक्के पाणी साठा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2021 7:55 PM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे: जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. शहरांसह गांवखेड्यातही पाऊस पडला नाही. मात्र आतापर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांच्या पाणलोट क्षेत्रातही पाऊस उत्तमरीत्या बरसल्याने धरणांचा पाणी साठा वाढला आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणात ९०.११ टक्के व बारवी धरणात ८९.९६ टक्के पाणी साठा तयार झाला आहे. यामुळे वर्षे भराची पाणी समस्या आता मिटली आहे. मात्र गेल्या वर्षाच्या तुलनेत या दोन्ही धरणात काही अंशी पाणी साठा कमी झाला आहे.

जिल्ह्यातील सर्व महानगरांना व एमआयडीसीला पाणी पुरवठा करणाऱ्या बारवी धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा कमी पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या ‌वर्षी ९०.२० टक्के साठा होता. पण यंदा हा साठा ८९.९६ टक्के आहे. बारवी धरणात अवघा १८६९ मिमी पाऊस पडला आहे. यापेक्षा या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जास्त पाऊस पडला आहे. यामध्ये खानिवरे या पाणलोटात आजपर्यंत २६२३ मिमी पाऊस पडला आहे. कान्होळला २००१मिमी, पाटगांवला १९२२मिमी आणि ठाकूरवाडी या पाणलोटात २२२७ मिमी. सरासरी पाऊस पडलेला आहे. यामुळे धरणांतील पाणी साठा ८९.९६ टक्के झाला आहे.

या बारवी धरणाची आजची पाणी पातळी १७.५४ मीटर नोंदली आहे. या धरणात आज रोजी ३३८.८४० पैकी ३०४.८१ दश लक्षघनमीटर पाणी साठा तयार झाला आहे. या धरणाप्रमाणे भातसा धरणातही गेल्या वर्षापेक्षा आज रोजी कमी साठा आहे. गेल्यावर्षी भातसात ९५.३७ टक्के साठा होता. यंदा तो ९०.१३ टक्के आहे.या भातसा व बारवी धरणाच्या तुलनेत आंध्रा धरणात गेल्या वर्षाच्या तुलनेत आजरोजी जास्त पाणी साठा तयार झाला आहे. गेल्या वर्षी ६२.६६ टक्के असलेला पाणी साठा यंदा ६८.५६ टक्के तयार झाला आहे. 

टॅग्स :thaneठाणेDamधरण