शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ७५ दिवसांची भटकंती, भराड ते चोर्ला घाटादरम्यान एक हजार किमीचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:33 IST

कल्याण : महाविद्यालयीन जीवनापासून साहस करण्याचे वेड लागलेल्या प्रसाद निक्ते यांनी २० वर्षांत विविध ट्रेकिंग ग्रुपसोबत अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली.

मुरलीधर भवार कल्याण : महाविद्यालयीन जीवनापासून साहस करण्याचे वेड लागलेल्या प्रसाद निक्ते यांनी २० वर्षांत विविध ट्रेकिंग ग्रुपसोबत अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली. तेव्हापासून त्यांना सह्याद्रीचा घाटमाथा खुणावत होता. त्या वेळीच त्यांनी हा घाटमाथा चालण्याचा चंग बांधला. पेशाने मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या निक्ते यांनी आता वयाच्या ४५ व्या वर्षी एकट्याने ही मोहीम फत्ते केली. नर्मदेच्या तीरावरील भराडपासून त्यांनी सह्याद्रीचा घाटमाथा चालण्याची मोहीम सुरू केली. तब्बल ७५ दिवसांनी तिला चोर्ला घाटात पूर्णविराम दिला. एक हजार किलोमीटरचा घाटमाथा चालणारी एकल साहसी मोहीम करणारे निक्ते हे ‘वॉकिंग आॅन दी एज मॅन’ ठरले आहेत.नर्मदेनजीकच्या भराड गावातून २६ मार्चला निक्ते यांनी मोहीम सुरू केली. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर भराड गाव आहे. पाच दिवस चालून त्यांनी सातपुडा पर्वतरांगेत प्रवेश केला. सातपुडा पार करून नंदुरबार येथे हळताणी गावात आल्यानंतर त्यांनी सह्याद्रीचे पठार चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इगतपुरी आणि तेथून कुलंग गाठले. कुलंगवाडीत प्रवेश केला. तेथून हरिश्चंद्र गड, भीमाशंकर, लोणावळा, मुळशी, पुढे कोयनानगरच्या दिशेने, राधानगरातून प्रवास करत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर बेळगावनजीक चोर्ला घाटापर्यंत असा ७५ दिवस एक हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. तेथे त्यांनी मोहिमेला पूर्णविराम दिला.निक्ते यांनी या प्रवासात काही वेळेस दिवसाला १५ ते २० किलोमीटरचे, तर काही वेळेस ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर कापले. पाण्याची बाटली, हेड टॉर्च, डोंगर चढण्यासाठी काठी, बनवता येतील अशा अन्नपदार्थांची १२ किलोची सॅकही त्यांच्या पाठीवर होती. खाण्यासाठी चणे, शेंगदाणे तसेच लापशी बनवण्यासाठी विविध डाळींचे पीठही त्यांनी सोबत घेतले होते.मोहिमेतील अनुभवांबाबत ते म्हणाले की, ‘सह्याद्रीचे उत्तरेकडील पठार हे रखरखीत आहे. जंगल कमी आहे. त्याचबरोबर तेथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पानगळीस लागलेले वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे सावली फारशी नाही. उत्तरेकडील सह्याद्रीचा घाटमाथा हा मोकळाठाक आहे. तेथे पाण्याचे सिंचन नाही. रस्ते चांगले नाहीत. मात्र, पाहुणचार अगदी मोठा केला जातो. गावातील वस्तीला मूग व उदिडाची डाळ, सोबत ज्वारी व मक्याची भाकरी खायला मिळत होती. त्या ठिकाणी भाजी मिळत नाही. भाजी आणायला दूरवर बाजारात जावे लागते. सातपुड्यातील आदिवासी भागांत आदरातिथ्य अगदी परमोच्च होते. पाहुणा आल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांत पाहावयास मिळतो.’‘सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या दक्षिणेकडील भागात दाट जंगल आहे. सागवान झाडे आहेत. सुबत्ता आहे. वाटेत पाण्याचे झरे आहेत. इगतपुरीपासून पुढे ज्या ठिकाणी वस्ती केली, तेथे तांदळाची भाकर, उदिडाचे बेसन, नागलीची भाकरी असा मेन्यू रोजच्या जेवणात होता. मांसाहारही होता. न्याहारीला सकाळी अंडीही खायला मिळत होती’, असे निक्ते यांनी सांगितले.एकल ट्रेकिंग एक मोठे आव्हान‘एकल ट्रेकिंगमध्ये सलग चालणे होते. एकटेच असल्याने एक मोठे आव्हान असते. अशा प्रकारचे ट्रेक हे वयाच्या ४० नंतरच करावयाचे असतात. अनुभव व दृष्टिकोनाच्या जोरावर ते पार पाडले जातात. अशा प्रकारच्या ट्रेकमध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी मानसिक तयारी हवी. कितीही तयारी केली, तरी प्रत्यक्षात ट्रेक सुरू असताना कोणता प्रसंग उद्भवू शकतो, त्याला कसे तोंड द्यायचे, हे त्या वेळेची प्राप्त परिस्थितीच ठरवू शकते. घाटमाथा चढू शकतो. मात्र, तो उतरताना जास्त धोका असतो. तोल जाणे, घसरून पडणे, अशा घटना होऊ शकतात. सोबत, वजनदार सॅक असल्याने तसे होऊ शकते’, याकडे निक्ते यांनी लक्ष वेधले.>अन धोक्यातून झाली सुटका : माझ्यावर धोक्याचा प्रसंग या ट्रेकच्या दरम्यान आला. हरिश्चंद्र गड ते भीमाशंकरदरम्यान दुर्ग ढाकोबा आहे. दºया, घाट चढून गेल्यावर वर अडकून पडण्याची वेळ आली. सायंकाळ झाली होती. रात्र होणार होती. त्यामुळे पुन्हा पायथ्याच्या गावाला जाण्याचा विचार आला. पण, नशीब बलवत्तर म्हणून हिरडा वनस्पती गोळा करणारा एक जण तेथे सुदैवाने मला भेटला. त्याच्या मदतीने पुढची वाट सर करणे ठरले.

टॅग्स :kalyanकल्याण