शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरून ७५ दिवसांची भटकंती, भराड ते चोर्ला घाटादरम्यान एक हजार किमीचा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2017 03:33 IST

कल्याण : महाविद्यालयीन जीवनापासून साहस करण्याचे वेड लागलेल्या प्रसाद निक्ते यांनी २० वर्षांत विविध ट्रेकिंग ग्रुपसोबत अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली.

मुरलीधर भवार कल्याण : महाविद्यालयीन जीवनापासून साहस करण्याचे वेड लागलेल्या प्रसाद निक्ते यांनी २० वर्षांत विविध ट्रेकिंग ग्रुपसोबत अनेक गडकिल्ल्यांवर चढाई केली. तेव्हापासून त्यांना सह्याद्रीचा घाटमाथा खुणावत होता. त्या वेळीच त्यांनी हा घाटमाथा चालण्याचा चंग बांधला. पेशाने मेकॅनिकल इंजिनीअर असलेल्या निक्ते यांनी आता वयाच्या ४५ व्या वर्षी एकट्याने ही मोहीम फत्ते केली. नर्मदेच्या तीरावरील भराडपासून त्यांनी सह्याद्रीचा घाटमाथा चालण्याची मोहीम सुरू केली. तब्बल ७५ दिवसांनी तिला चोर्ला घाटात पूर्णविराम दिला. एक हजार किलोमीटरचा घाटमाथा चालणारी एकल साहसी मोहीम करणारे निक्ते हे ‘वॉकिंग आॅन दी एज मॅन’ ठरले आहेत.नर्मदेनजीकच्या भराड गावातून २६ मार्चला निक्ते यांनी मोहीम सुरू केली. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या तीन राज्यांच्या सीमेवर भराड गाव आहे. पाच दिवस चालून त्यांनी सातपुडा पर्वतरांगेत प्रवेश केला. सातपुडा पार करून नंदुरबार येथे हळताणी गावात आल्यानंतर त्यांनी सह्याद्रीचे पठार चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर, इगतपुरी आणि तेथून कुलंग गाठले. कुलंगवाडीत प्रवेश केला. तेथून हरिश्चंद्र गड, भीमाशंकर, लोणावळा, मुळशी, पुढे कोयनानगरच्या दिशेने, राधानगरातून प्रवास करत गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर बेळगावनजीक चोर्ला घाटापर्यंत असा ७५ दिवस एक हजार किलोमीटरचा पायी प्रवास केला. तेथे त्यांनी मोहिमेला पूर्णविराम दिला.निक्ते यांनी या प्रवासात काही वेळेस दिवसाला १५ ते २० किलोमीटरचे, तर काही वेळेस ३० ते ३५ किलोमीटरचे अंतर कापले. पाण्याची बाटली, हेड टॉर्च, डोंगर चढण्यासाठी काठी, बनवता येतील अशा अन्नपदार्थांची १२ किलोची सॅकही त्यांच्या पाठीवर होती. खाण्यासाठी चणे, शेंगदाणे तसेच लापशी बनवण्यासाठी विविध डाळींचे पीठही त्यांनी सोबत घेतले होते.मोहिमेतील अनुभवांबाबत ते म्हणाले की, ‘सह्याद्रीचे उत्तरेकडील पठार हे रखरखीत आहे. जंगल कमी आहे. त्याचबरोबर तेथे पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पानगळीस लागलेले वृक्ष जास्त प्रमाणात आहेत. त्यामुळे सावली फारशी नाही. उत्तरेकडील सह्याद्रीचा घाटमाथा हा मोकळाठाक आहे. तेथे पाण्याचे सिंचन नाही. रस्ते चांगले नाहीत. मात्र, पाहुणचार अगदी मोठा केला जातो. गावातील वस्तीला मूग व उदिडाची डाळ, सोबत ज्वारी व मक्याची भाकरी खायला मिळत होती. त्या ठिकाणी भाजी मिळत नाही. भाजी आणायला दूरवर बाजारात जावे लागते. सातपुड्यातील आदिवासी भागांत आदरातिथ्य अगदी परमोच्च होते. पाहुणा आल्याचा आनंद त्यांच्या डोळ्यांत पाहावयास मिळतो.’‘सह्याद्रीच्या घाटमाथ्याच्या दक्षिणेकडील भागात दाट जंगल आहे. सागवान झाडे आहेत. सुबत्ता आहे. वाटेत पाण्याचे झरे आहेत. इगतपुरीपासून पुढे ज्या ठिकाणी वस्ती केली, तेथे तांदळाची भाकर, उदिडाचे बेसन, नागलीची भाकरी असा मेन्यू रोजच्या जेवणात होता. मांसाहारही होता. न्याहारीला सकाळी अंडीही खायला मिळत होती’, असे निक्ते यांनी सांगितले.एकल ट्रेकिंग एक मोठे आव्हान‘एकल ट्रेकिंगमध्ये सलग चालणे होते. एकटेच असल्याने एक मोठे आव्हान असते. अशा प्रकारचे ट्रेक हे वयाच्या ४० नंतरच करावयाचे असतात. अनुभव व दृष्टिकोनाच्या जोरावर ते पार पाडले जातात. अशा प्रकारच्या ट्रेकमध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही प्रकारच्या धोक्याला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते. त्यासाठी मानसिक तयारी हवी. कितीही तयारी केली, तरी प्रत्यक्षात ट्रेक सुरू असताना कोणता प्रसंग उद्भवू शकतो, त्याला कसे तोंड द्यायचे, हे त्या वेळेची प्राप्त परिस्थितीच ठरवू शकते. घाटमाथा चढू शकतो. मात्र, तो उतरताना जास्त धोका असतो. तोल जाणे, घसरून पडणे, अशा घटना होऊ शकतात. सोबत, वजनदार सॅक असल्याने तसे होऊ शकते’, याकडे निक्ते यांनी लक्ष वेधले.>अन धोक्यातून झाली सुटका : माझ्यावर धोक्याचा प्रसंग या ट्रेकच्या दरम्यान आला. हरिश्चंद्र गड ते भीमाशंकरदरम्यान दुर्ग ढाकोबा आहे. दºया, घाट चढून गेल्यावर वर अडकून पडण्याची वेळ आली. सायंकाळ झाली होती. रात्र होणार होती. त्यामुळे पुन्हा पायथ्याच्या गावाला जाण्याचा विचार आला. पण, नशीब बलवत्तर म्हणून हिरडा वनस्पती गोळा करणारा एक जण तेथे सुदैवाने मला भेटला. त्याच्या मदतीने पुढची वाट सर करणे ठरले.

टॅग्स :kalyanकल्याण