शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

१९५ गावांसह ५७२ आदिवासी पाड्यांत पाणी समस्या

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2019 11:52 PM

ठाणे जिल्ह्याची परिस्थिती; उपाययोजनेसाठी साडेसात कोटींचा खर्च; विहिरी खोल करणार, नवीन विंधण विहिरी खोदणार

- सुरेश लोखंडे ठाणे : जिल्ह्यातील १९५ गावे आणि ५७२ आदिवासी, दुर्गम भागातील पाड्यांंमध्ये तीव्र पाणीटंचाई उद्भवण्याची शक्यता आहे. त्यावर उपाययोजना म्हणून ठाणे जिल्हा परिषदेने युध्दपातळीवर हालचाली करून सात कोटी ४२ लाख रूपये खर्चाचे नियोजन केले आहे. या निधीतून विहिरी खोल करण्यासह टँकर - बैलगाडीने पाणी पुरवठा, नळपाणी पुरवठ्याची दुरूस्ती, पुरक योजना, नवीन विंधन विहिरी तयार करणे आदी कामे हाती घेण्याचे नियोजन आहे.‘ग्रामीण भागात टंचाईच्या झळा तीव्र’, या मथळ्याखाली लोकमतने ८ जानेवारी रोजी वृत्त प्रसिध्द करून जिल्हा परिषदेचे लक्ष वेधले. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्वरित हालचाली करून सात कोटी ४२ लाखांच्या खर्चाचे नियोजन केले. या निधीतून पाणी टंचाईवर मात केली जाईल. महापालिकांसह औद्योगिक क्षेत्राच्या पाणी कपातीपेक्षाही जिल्ह्णातील ग्रामीण, आदिवासी आणि दुर्गम भागात पाणी टंचाईच्या झळा तीव्र आहेत.शहरांना पाणी पुरवठा करणाऱ्या ग्रामीण, दुर्गम भागात धरणांचे जाळे पसरले आहे. मात्र त्यापासून जवळच्या गावखेड्यांना सर्वच पातळीवरील लोकप्रतिनिधींच्या निष्काळजीमुळे वर्षानुवर्षे पाणी टंचाई सोसावी लागते आहे. दरवर्षी कोट्यवधी खर्च होऊनही उन्हाळ्यात पाणी समस्या उद्भवते. प्रशासनाच्या निष्काळजीमुळे भ्रष्टाचाराच्या चक्रव्युहातील पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या नाही. या अर्धवट योजनांच्या गावातील पाणी टंचाईवरील उपाययोजनेसाठी साधी बोरवेलही घेता येत नसल्याची खंतही लोाकप्रतिनिधींकडून व्यक्त होत आहे. गेल्या वर्षी १२१ मोठे गावे आणि ३२७ पाड्यांनी पाणी समस्येला तोंड दिले. यंदा ही १९५ गावे आणि ५७२ पाडे पाणी टंचाईच्या चक्रव्युहात अडकले आहेत.टंचाई भेडसावणाºया गांवपाड्यांपैकी ८८ गावे अािण २३० पाड्यांना एक कोटी ३५ लाख रूपये खर्चून टँकर किंवा बैलगाडीने यंदा पाणी पुरवठा होईल. जेथे वाहन जाणे शक्य नाही, तेथे बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. या नियोजनात शहापूर तालुक्यातील सर्वाधिक ६५ गावे, १८३ पाड्यांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एक कोटी पाच लाखांच्या खर्चाची तरतूद झाली आहे. या खालोखाल मुरबाड तालुक्यात १८ गावे व ३३ पाड्यांना टँकर किंवा बैलगाडीने पाणी पुरवठा होईल. त्यावर २१ लाख ७६ हजार रूपये खर्च होतील. यानंतर भिवंडीला तीन गावे सहा पाडे आणि अंबरनाथला दोन गावे आठ पाड्यांना टँकर, बैलगाडीने पाणी पुरवठा होईल.योजनांची दुरूस्ती- नवीन बोरवेलविहिरी खोल करण्यासाठी १८लाखांची तरतूद केली आहे. यातून शहापूरच्या ३० गावांसह ६३ पाड्यांच्या विहिरी खोल होतील. नळपाणी पुरवठा योजनांच्या विशेष दुरूस्तीसाठी दोन कोटी २२ लाखांची तरतूद आहे. यातून शहापूरचे सहा गावे, सहा पाड्यांसाठीह एक कोटी ५४ लाखांच्या खर्चा नियोजन आहे.मुरबाडमधील पाच गावे आणि एक पाड्यासाठी ५८ लाखांचा खर्च होणार आहे. चार गावे आणि दोन पाड्यांना पुरक पाणी पुरवठा योजना होईल. त्यासाठी एक कोटी ६८ लाखांचे नियोजन केले. नवीन विंधन विहिरीसाठी एक कोटी ९८ लाखांचा खर्च निश्चित केला.त्यातून ६२ गावे आणि २३९ पाड्यांना विंधन विहिरी (बोरवेल) तयार होणार आहे. यापैकी सर्वाधिक मुरबाड तालुक्यामधील २० गावे ४४ पाड्यांना ३८ लाख ४० हजारांचे नियोजन असून, शहापूरच्या १८ गावांसह ५० पाड्यांवर ४० लाख ८० हजार रूपये खर्च होईल.टंचाईग्रस्त गावे, पाड्यांवरील खर्चाचे नियोजनतालुका        गावे      पाडे        निधीची तरतूदअंबरनाथ      १२        ४४            ४१ लाखकल्याण        १०        ३६         १ कोटी १६ लाखभिवंडी         ०९        ११०        ६९ लाख ८४ हजारमुरबाड        ४३         ७९         १ कोटी ३३ लाखशहापूर       १२१       ३०३         ३ कोटी ८२ लाख

टॅग्स :water shortageपाणीटंचाईthaneठाणे