शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

४२ कामगार हजेरी पुस्तकावरच ‘हजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:11 IST

वेळेआधीच घरी : सत्ताधारी सदस्यांनीच केली पोलखोल, निलंबित करण्याची मागणी

कल्याण : केडीएमसीच्या कचरागाड्यांवरील सात चालक व ३५ कामगार सोमवारी सकाळी खंबाळपाडा येथील आगारात कामावर आले होते. मात्र, हजेरी पुस्तकावर ११ वाजताच ते दुपारी १ वाजताचे आउट टाइम टाकून घरी परतले. ही बाब सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उघडकीस आणली असून, या कामगारांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पुरेसे कामगार असतानाही कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले आहे.

खंबाळपाडा येथील बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरागाड्या उभ्या केल्या जातात. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ राणे यांनी तेथे सकाळी ११.३० वाजता अचानक भेट दिली. तेथील कामगारांचे हजेरी पुस्तक तपासले असता सात कामगार कामावर हजर असल्याची नोंद होती. मात्र, हे कामगार कामावर हजर नव्हते. ते ११.३० वाजताच दुपारी १ वाजताची वेळ लिहून बाहेर पडल्याचे उघड झाले.

कचरा उचलणाºया एका आरसी गाडीवर एक वाहनचालक आणि पाच सफाई कामगार असतात. सात आरसी गाड्यांवरील सात चालकांची नोंद हजेरी पुस्तकावर होती. मात्र, या चालकांप्रमाणे ३५ सफाई कामगारांनी वाहनचालकांचाच कित्ता गिरवत १ वाजताची नोंद करून त्याआधीच घर गाठले होते. हा प्रकार पाहून सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरात ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही. कामगार हजेरी लावून पळ काढतात, हा काय प्रकार आहे, याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अमित पंडित व अधिकारी विलास जोशी यांना तेथे पाचारण केले. ते आल्यानंतर उपायुक्तांचे कामगारांवर नियंत्रण नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा आरोप सदस्यांनी केला. उपायुक्त व आयुक्तांनी कामगारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ते नसल्याने कामगार हजेरी लावून कचरा उचलण्याचे काम केल्याचे भासवत आहे. आरोग्य निरीक्षकांची त्यांना साथ आहे. कामगार व अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अधिकारी व कामगारांच्या विरोधात कडक कारवाई करावी. तसेच या कामगारांना सेवेतून तातडीने निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यावर या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पंडित यांनी सांगितले.अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपमहापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटी रुपयांचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी कंपनीला दिले आहे. ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची वाहतूक करणे, याचा समावेश आहे.या कंत्राटामुळे चार प्रभाग क्षेत्रांतील कामगार अन्य सहा प्रभाग क्षेत्रांत कामाला लावता येतील, असा त्यामागील विचार होता. मात्र, कामगार हजेरी लावून घरी पळ काढतात. त्यामुळे शहरात कचºयाची समस्या कायम आहे. त्याला अधिकारी जबाबदार आहेत. तसेच कंत्राटदाराने गणवेश व सुरक्षेची साधने पुरविलेली नाहीत, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे.