शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

४२ कामगार हजेरी पुस्तकावरच ‘हजर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2019 00:11 IST

वेळेआधीच घरी : सत्ताधारी सदस्यांनीच केली पोलखोल, निलंबित करण्याची मागणी

कल्याण : केडीएमसीच्या कचरागाड्यांवरील सात चालक व ३५ कामगार सोमवारी सकाळी खंबाळपाडा येथील आगारात कामावर आले होते. मात्र, हजेरी पुस्तकावर ११ वाजताच ते दुपारी १ वाजताचे आउट टाइम टाकून घरी परतले. ही बाब सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी उघडकीस आणली असून, या कामगारांच्या विरोधात निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, पुरेसे कामगार असतानाही कचरा उचलला जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग पाहायला मिळत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, याकडे सदस्यांनी लक्ष वेधले आहे.

खंबाळपाडा येथील बस डेपोसाठी आरक्षित असलेल्या जागेत कचरागाड्या उभ्या केल्या जातात. स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे व शिवसेनेचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ राणे यांनी तेथे सकाळी ११.३० वाजता अचानक भेट दिली. तेथील कामगारांचे हजेरी पुस्तक तपासले असता सात कामगार कामावर हजर असल्याची नोंद होती. मात्र, हे कामगार कामावर हजर नव्हते. ते ११.३० वाजताच दुपारी १ वाजताची वेळ लिहून बाहेर पडल्याचे उघड झाले.

कचरा उचलणाºया एका आरसी गाडीवर एक वाहनचालक आणि पाच सफाई कामगार असतात. सात आरसी गाड्यांवरील सात चालकांची नोंद हजेरी पुस्तकावर होती. मात्र, या चालकांप्रमाणे ३५ सफाई कामगारांनी वाहनचालकांचाच कित्ता गिरवत १ वाजताची नोंद करून त्याआधीच घर गाठले होते. हा प्रकार पाहून सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शहरात ठिकठिकाणी कचरा उचलला जात नाही. कामगार हजेरी लावून पळ काढतात, हा काय प्रकार आहे, याचा जाब विचारण्यासाठी त्यांनी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अमित पंडित व अधिकारी विलास जोशी यांना तेथे पाचारण केले. ते आल्यानंतर उपायुक्तांचे कामगारांवर नियंत्रण नाही. त्यामुळे हे प्रकार घडत आहेत, असा आरोप सदस्यांनी केला. उपायुक्त व आयुक्तांनी कामगारांवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. ते नसल्याने कामगार हजेरी लावून कचरा उचलण्याचे काम केल्याचे भासवत आहे. आरोग्य निरीक्षकांची त्यांना साथ आहे. कामगार व अधिकारी नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत आहेत. अधिकारी व कामगारांच्या विरोधात कडक कारवाई करावी. तसेच या कामगारांना सेवेतून तातडीने निलंबित करावे, अशी मागणी केली. त्यावर या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे पंडित यांनी सांगितले.अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोपमहापालिकेने चार प्रभाग क्षेत्रांतील कचरा उचलण्याचे १०७ कोटी रुपयांचे कंत्राट आर अ‍ॅण्ड डी कंपनीला दिले आहे. ओला-सुका कचरा वेगळा गोळा करून त्याची वाहतूक करणे, याचा समावेश आहे.या कंत्राटामुळे चार प्रभाग क्षेत्रांतील कामगार अन्य सहा प्रभाग क्षेत्रांत कामाला लावता येतील, असा त्यामागील विचार होता. मात्र, कामगार हजेरी लावून घरी पळ काढतात. त्यामुळे शहरात कचºयाची समस्या कायम आहे. त्याला अधिकारी जबाबदार आहेत. तसेच कंत्राटदाराने गणवेश व सुरक्षेची साधने पुरविलेली नाहीत, याकडेही सदस्यांनी लक्ष वेधले आहे.