शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

मांजामुळे १२ कबुतरांचा गेला बळी; चायनीज, नायलॉन मांजावर कारवाई नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 12:47 AM

मीरा-भाईंदरमधील चित्र : विविध सामाजिक संस्थांच्या केंद्रांत ९० जखमींना आणले

मीरा रोड : मीरा-भार्इंदरमध्ये मकरसंक्रांतीनिमित्त मंगळवारी व बुधवारी पतंगांच्या मांजामुळे ९० कबुतरे जखमी झाली. त्यातील १२ कबुतरांना जीव गमवावा लागला. मागील काही वर्षांच्या तुलनेत ही संख्या कमी होत चालली आहे. परंतु, चायनीज वा नायलॉन मांजावर कारवाई झाली नसल्याची खंतही संस्थांनी बोलून दाखवली आहे.

भार्इंदर पश्चिमेच्या जैन अ‍ॅलर्ट ग्रुपने १२ वर्षांपूर्वी जखमी पक्ष्यांवर उपचार करण्यासह पतंगांच्या मांजांमुळे होणाऱ्या जीवघेण्या प्रकारांविरोधात जनजागृती सुरू केली. विविध माध्यमांतून या ग्रुपने जनजागृती करत पतंग न उडवण्याची शपथ देण्यास लावली. याशिवाय अहिंसा चॅरिटेबल ट्रस्ट, स्टेनलेस स्टील असोसिएशन, जीवदया फाउंडेशन, समकीत ग्रुप आदींनीही शहरात यासाठी जनजागृती व जखमी पक्ष्यांवर उपचार करत आहेत. यंदाही मकरसंक्रांतीच्या आधी या संस्थांनी पतंग उडवल्याने मांजामुळे होणाºया परिणामांची माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती.

मंगळवार व बुधवार अशा दोन दिवसांत मांजामुळे जखमी झालेली ९० कबुतरे विविध केंद्रांत उपचारासाठी आणली होती. त्यातील १२ कबुतरांचा मृत्यू झाला. यात भार्इंदर पश्चिमेच्या अहिंसा चॅरिटेबल ट्रस्टच्या रुग्णालयात २२ जखमी कबुतरे आली होती व त्यातील तिघांचा मृत्यू झाला. जैन अ‍ॅलर्ट ग्रुपच्या केंद्रात आलेल्या जखमी ३७ कबुतरांपैकी चौघांचा मृत्यू झाला. भार्इंदर पूर्वेला स्टेनलेस स्टील असोसिएशन व जीवदया फाउंडेशन यांनी उभारलेल्या केंद्रात ११ जखमी कबुतरांना उपचारासाठी आणले असता त्यातील एकाचा मृत्यू झाला. मीरा रोडच्या समकीत ग्रुपच्या केंद्रात जखमी १८ कबुतरांपैकी तिघांचा मृत्यू झाला. जीवदया परिवार केंद्रात बुधवारी आलेल्या दोन जखमी कबुतरांपैकी एकाचा मृत्यू झाला.

गेल्या काही वर्षांत पतंगबाजीमुळे जखमी व मृत्युमुखी पडणाºया कबुतरांच्या संख्येत घट होत असून त्याला विविध संस्थांनी गेल्या काही वर्षांत चालवलेल्या जनजागृतीचे प्रमुख कारण आहेच. पण, त्याचसोबत वाढती महागाई व आजकाल मुले, तरुण मोबाइलमध्ये गुंतल्याने पतंग उडवण्याचे प्रमाण घटले असल्याचे अहिंसा ट्रस्टचे कौशल शाह यांनी सांगितले. पतंगबाजीदरम्यान कापलेली पतंग व मांजा झाडांच्या फांद्यांमध्ये अडकून राहतो. त्यामुळे झाडांवरील मांजा पक्ष्यांना घातक आहे. त्यात अडकून पक्षी जखमी वा मरण पावतात. त्यामुळे पालिकेने शहरातील झाडांवर अडकलेला मांजा काढून घेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.चायनीज, नायलॉन मांजावर कारवाई नाहीपतंग उडवण्यासाठी बंदी असलेल्या चायनीज वा नायलॉन मांजावर पोलिसांनी कारवाई केली. परंतु, मीरा-भार्इंदरमध्ये मात्र अशी कारवाई झाली नाही. वास्तविक, महिनाभर आधीपासून बंदी असलेल्या अशा घातक मांजावर कारवाई झाली असती, तर जखमी व मृत्युमुखी पडलेल्या पक्ष्यांच्या संख्येत आणखी घट झाली असती. यामुळे कारवाई व्हायला हवी होती, अशी खंत कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :kiteपतंग