शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

उल्हासनगरात मानस इमारतीचा स्लॅब कोसळून ४ जणांचा मृत्यू, ४ जण जखमी

By सदानंद नाईक | Updated: September 22, 2022 15:42 IST

एका महिन्याच्या अंतराने तीन इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असून धोकादायक इमारती बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्या बाबत नांगरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगर : कॅम्प नं-५ सर्वांनंद हॉस्पिटल परिसरातील मानस इमारतीचा चौथ्या मजल्याचा स्लॅब थेट तळमजल्याच्या दुकानावर दुपारी २ वाजता कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला. तर ढिगाऱ्याखाली ४ ते ५ जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. एका महिन्याच्या अंतराने तीन इमारतीचे स्लॅब कोसळण्याच्या घटना घडल्या असून धोकादायक इमारती बाबत शासन परिपत्रक प्रसिद्ध करीत नसल्या बाबत नांगरिकांनी नाराजी व्यक्त करीत आहेत.

उल्हासनगरात इमारतीचे स्लॅब कोसळण्याचे सत्र सुरू असून एका महिन्यात तीन इमारतीचें स्लॅब कोसळून जीवितहानी झाल्याच्या घटना शहरात घडल्या आहेत. कोमल पार्क व साई सदन इमारतीचा स्लॅब व गच्ची कोसळून दोघांचा मृत्यू झाला. तर गुरवारी दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान मानस पॅलेस या पाच मजली इमारतीचा चौथ्या मजल्याच्या स्लॅब थेट तळमजल्याच्या दुकानावर कोसळला. 

या दुर्घटनेत सागर ओचानी-१९, रेणू धोलांदास धनवानी-५५, धोलानदास धनावनी-५८, प्रिया धनवानी-२४ असे चार जणांचा मृत्यू झाला असून ४ ते ५ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त होत आहे. महापालिका अग्निशमन दलाचे कर्मचारी ढिगारा उचलण्याचे काम शिरू असून आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर व सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी घटनास्थळी ठाण मांडून कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. 

महापालिकेने सुरक्षेचा उपाय म्हणून मानस इमारत खाली केली असून इमारतीला स्ट्रॅक्टरल ऑडिटची नोटीस दिल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी यांनी दिली. इमारत दुर्घटनेत बेघर झालेल्या नागरिकांना पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचे संकेत महापालिका आयुक्त शेख यांनी दिली. पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थापन केलेल्या समितीचा अहवाल मिळल्याचे सांगून सन-२०२१ पर्यंतची अवैध बांधकामे नियमित तर धोकादायक इमारतीचे पुनर्बांधणी करण्याचे आश्वासन दिले होते.

तसेच काही दिवसात शासन परिपत्रक प्रसिद्ध करण्याचे सांगितले होते. मात्र अद्यापही परिपत्रक प्रसिद्ध न झाल्याने, नागरिकांत नाराजी आहे. इतर कामे बाजूला ठेवून शहरतील धोकादायक व जुन्या इमारतीच्या पुनर्बांधणी बाबत परिपत्रक काढण्याची मागणी विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून होत आहे. मानस इमारत दुर्घटनेत मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती महापालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून ढिगारा उपसण्याचे काम सुरू आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर