शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
13
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
14
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
15
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
16
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
17
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
18
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
19
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
20
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?

अकस्मात मृत्यूंच्या ३७० प्रकरणांची जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी होणार  

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 7:22 PM

ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ते मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.  

ठाणे -  ठाणे, नवी मुंबई व मिरा-भाईंदर या तीन महानगरपालिकाहद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयामार्फत चौकशी करण्यात येत असून ज्यांना कुणाला यासंदर्भात काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी सात दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयात ते मांडावे असे आवाहन करण्यात आले आहे.  मनपा हद्दीत  एकुण दोन उपविभागीय पोलीस अधिकारी, सहा सहाय्यक पोलीस आयुक्त आहेत. त्यांच्याकडून जानेवारी२०१७ ते डिसेबंर २०१७ या कालावधीत एकुण ४८६ मयत व्यक्तींच्याप्रकरणांची अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. त्यापैकी ११६प्रकरणांमध्ये यापूर्वीच आदेश देण्यात आले आहेत.370 मयत इसमांची यादी मयतांच्या मृत्यूचे कारण व नातेवाईक/खबर देणाऱ्याच्या नावासह खालील कार्यालयांमध्ये प्रसिध्द करणेत आलेली आहे.

 जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे यांचे संकेतस्थळावर (www.thane.nic.in), उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय, ठाणे217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम), तहसिलदार कार्यालय, ठाणे  जिल्हा परिषद ठाणे समोर, स्टेशन रोड ठाणे, (प)

उपरोक्त ठिकाणी मयत इसमांच्या मृत्युबाबत/कारणाबाबत त्यांचे नातेवाईक, हितसंबंधित अथवा अन्य कोणासही संशय/तक्रार/हरकत असल्यास याबाबतचे म्हणणे किंवा त्याबाबतचे पुरावे/साक्ष देणेची असल्यास संबंधितांनी हा जाहिरनामा प्रसिध्द झाल्या पासुन 07 दिवसांचे आत उपविभागीय दंडाधिकारी ठाणे विभाग ठाणे, पत्ता- 217, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय, ठाणे कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) येथे कार्यालयीन वेळेत हजर राहुन आपले म्हणणे तोंडी अथवा लेखी स्वरुपात सादर करावे. विहीत मुदतीत कोणाच्याही हरकती/तक्रार प्राप्त न झाल्यास या संदर्भात कोणाचीही हरकत नाही असे ग्राहय धरुन अकस्मात मृत्युबाबतचे आदेश निर्गमित करण्यात येतील.

टॅग्स :Deathमृत्यूthaneठाणे