२.८० कोटी लोकसंख्येला लागते ३६२१ एमएलडी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:07+5:302021-03-26T04:41:07+5:30

मुंबई महापालिकेला भातसासह मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा, भातसा, शहाड ...

2.80 crore population needs 3621 MLD of water | २.८० कोटी लोकसंख्येला लागते ३६२१ एमएलडी पाणी

२.८० कोटी लोकसंख्येला लागते ३६२१ एमएलडी पाणी

Next

मुंबई महापालिकेला भातसासह मोडकसागर, अपर वैतरणा, मध्य वैतरणातून पाणीपुरवठा होतो. याप्रमाणेच ठाणे मनपाला ४२२ एमएलडी पाणीपुरवठा, भातसा, शहाड टेमघर एमआयडीसी आणि पिसे धरणातून होत आहे. नवी मुंबईला ३३० एमएलडी पाणी मोरबे, हेटवणे आणि बारवी धरणातून सुरू आहे. कल्याण-डोंबिवली २६४, भिवंडी ११० व मीरा-भाईंदरला ९१ एमएलडी पाणीपुरवठा शहरांना टेमघर व एमआयडीसीद्वारे सुरू आहे. बदलापूरला ३७, अंबरनाथ ५५, उल्हासनगर १२० एमएलडी पाणीपुरवठा बारवी व उल्हास नदीतून एमआयडीसह महाराष्ट्र जीवन (एमजेपी) प्राधिकरणाकडून रोज होत आहे. शहरांच्या वाढीव लोकसंख्येस अनुसरून या वाढीव पाणीपुरवठ्यासाठी बारवी धरणाची उंची दोन मीटरने वाढवली. एमआयडीला १६० एमएलडी पाणीपुरवठाही बारवीतून होत आहे.

----------

* शहरांची लोकसंख्या - २,८०,०००००

* शहरांना होणारा पाणीपुरवठा- ३६२१ एमएलडी

* पाइपलाइनजवळील गावे-८२

* टंचाईग्रस्त गावे शहापूरमधील- २ गावे, १४ पाड्यांना पाच टँकरने पाणीपुरवठा

* नवीन मागणी - चार टँकरची

Web Title: 2.80 crore population needs 3621 MLD of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.