शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

ठाण्यात २६ जानेवारी रोजी रंगणार २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 4:46 PM

ठाण्यात २६ जानेवारी रोजी २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन रंगणार आहे. 

ठळक मुद्दे २६ वे भव्य राष्ट्रीय कवी संमेलन  'हिंदी भाषी एकता परिषद, ठाणे' या संस्थेच्या वतीने कवी संमेलन विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ३ व्यक्तींना पुरस्कार

ठाणे : सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृतीसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या 'हिंदी भाषी एकता परिषद, ठाणे' या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी, २०१९ रोजी सायंकाळी ७ वाजता गडकरी रंगायतन, ठाणे (प.) येथे २६ व्या भव्य राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे संयोजक संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष अड. बी.एल.शर्मा व सह-संयोजक समाजसेवकी-उद्योगपति अरुण जोशी हे आहेत अशी माहिती आज पत्रकार परिषदेत दिली. 

    मागील २५ वर्षांपासून सातत्याने दरवर्षी होणा-या सदर कार्यक्रमात प्रत्येक वर्षी राष्ट्रीय पातळीचे कवी ठाण्यात येत असून या प्रसंगी समाजातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी बजाविणा-या ३ व्यक्तींना संस्थेतर्फे प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येतो. या पुरस्कारांमध्ये साहित्य-पत्रकारितेसाठी 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणासाठी आपले प्राण पणास लावून अदभूत अशी शूरविरता दाखविणा-या व्यक्तीस 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' आणि आपल्या अतुल्य कलागुणाने महाराष्ट्राच्या नावास देश-परदेशात लौकिक मिळवून देणा-या व्यक्तीस 'छत्रपती शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' चा समावेश आहे, पत्रकार परिषदेत अशी माहिती देत अड शर्मा यांनी म्हटले की, यंदाच्या सत्कारमूर्तींमध्ये ज्येष्ठ पत्रकार (नवभारत टाइम्स) विमल मिश्र यांना 'डॉ. हरिवंशराय बच्चन साहित्यरत्न पुरस्कार', देशाच्या संरक्षणार्थ कश्मीर येथे अतिरेकींचा सामना करताना भारतमातेच्या सेवेत आपले प्राण अर्पित करणारे लष्कर दलाचे शहिद मेजर कौस्तुभ राणे यांना 'महाराणा प्रताप शौर्य पुरस्कार' तर नामवंत ज्येष्ठ अभिनेते सुबोध भावे यांना 'छत्रपति शिवाजी महाराज गौरव पुरस्कार' देऊन गौरविण्यात येणार आहे. 

      समारंभाचे उद्घाटन बंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ति कमळकिशोर तातेड व न्यायमूर्ति मकरंद कर्णिक यांच्या हस्ते दिप प्रज्ज्वलनाने करण्यात येईल. या प्रसंगी ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर (आयपीएस) व कोकण निभागिय विशेष पोलीस महानिरीक्षक नवल बजाज (आयपीएस) हे विशेष पाहुणे तसेच ठाणे जिल्हा वकिल संघटनेचे अध्यक्ष अड. प्रकाश भोसले, 'राजस्थान पत्रिका' (मुंबई) चे संपादक डॉ. उरुक्रम शर्मा व ज्येष्ठ उद्योगपती-समाजसेवक अजिताभ बच्चन यांची कार्यक्रमात सम्माननिय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभणार आहे. 

    सदर सोहळ्यात होणा-या राष्ट्रिय कवी संमेलनाचे सुत्र-संचालन ज्येष्ठ विनोदसम्राट कवी सत्यनारायण सत्तन हे करणार असून या प्रसंगी पद्मश्री डॉ. सुरेंद्र दुबे (रायपुर), प्रताप फौजदार (आगरा), आशीष 'अनल' (लखीमपुर-खीरी), गजेंद्र प्रियांशु (बाराबंकी), गौरव चौहान (इटावा), गौरव शर्मा (मुंबई) आणि डॉ. भुवन मोहिनी (उज्जैन) आदी मान्यवर कवी आपापल्या काव्यरचना सादर करतील.     

    कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी आयोजन समितीतील महेश जोशी, डॉ. सुशिल इन्दोरिया, अड. सुभाष झा, महेश बागड़ा, अशोक पारेख, राजेंद्र दाधीच, ए. एन. रुबिन, राजेंद्र शर्मा यांच्यासह संस्थेचे अनेक पदाधिकारी व सक्रिय कार्यकर्ते अहोरात्र मेहनत घेत आहेत. प्रवेश विनामुल्य ठेवण्यात आलेल्या या समारंभात सर्व राष्ट्रभक्त नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, शेवटी असे आवाहन शर्मा यांनी लोकांना केले आहे. 

टॅग्स :thaneठाणेMumbaiमुंबईcultureसांस्कृतिक