शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

भिवंडीत वीटभट्टी मजुरांच्या १७ झोपड्या जळून खाक, गरिबांच्या संसाराची राख रांगोळी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2022 7:07 PM

भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली

भिवंडी : तालुक्यातील खांबाळे परिसरातील शिरगाव येथे वीटभट्टी मजुरांच्या झोपड्या जळून खाक झाल्याची घटना शनिवारी घडली आहे .विशेष म्हणजे दुर्घटनेच्या २४ तासानंतर ही घटना समोर आली आहे.त्या नंतर पोलीस व महसूल यंत्रणेची धावाधाव सुरू झाली असून, वीटभट्टी मालका विरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे.

भिवंडी तालुक्यातील शिरगाव येथे अरविंद प्रजापती यांचा परंपरागत वीटभट्टी व्यवसाय असून तेथे शनिवारी दुपारी विटा बनविण्याचे मातीकाम सुरू असताना अचानक लाकडी काटक्या गवता पासून बनविलेल्या झोपड्यांना आग लागली व पाहता पाहता ती सर्वत्र पसरत तेथील एकूण १७ झोपड्या जळून खाक झाल्या. या आगीत झोपड्यात मजूर कुटुंबीयांनी साठविलेले धान्य, कपडे,पांघरूण हे जळून नुकसान झाले आहे. सुदैवाने तेथील लहान बालके बाहेर खेळत असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या दुर्घटने नंतर मजुरांनीच ही आग पाणी मारून विझवली.परंतु या दुर्घटनेची माहिती वीटभट्टी मालक अरविंद प्रजापती यांनी पोलीस व महसूल प्रशासना न कळविता दुर्घटने वर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला असता रविवारी या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांनी कार्यकर्त्यांना काळविल्या नंतर ही घटना प्रकाशात आली आहे .त्यानंतर मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा केला आहे .तर तातडीची मदत म्हणून स्वयंसेवी संस्थां कडून धान्य कपडे पांघरूण उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती पडघा मंडळ अधिकारी संतोष आगीवले यांनी दिली आहे.

टॅग्स :bhiwandiभिवंडीthaneठाणेfireआग