शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
2
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
3
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
4
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
5
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
6
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
7
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
8
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
9
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
10
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
11
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
12
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
13
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
14
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
15
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
16
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
17
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
18
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
19
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
20
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य

उल्हासनगरमध्ये १५२ धोकादायक इमारती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 3:35 AM

महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

उल्हासनगर -  महापालिकेने शहरात १५२ धोकादायक, तर १९ अतिधोकादायक अशा एकूण १७२ इमारती जाहीर करून त्या इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. अतिधोकादायक इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.उल्हासनगर पालिका आयुक्त गणेश पाटील यांनी उपायुक्त प्रभाग अधिकाऱ्यांसह विभागप्रमुखांची बैठक घेतली. बैठकीत शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घेतला असता अभियंता महेश शितलानी यांनी १५२ धोकादायक व १९ अतिधोकादायक इमारतींची यादी सादर केली. आयुक्तांनी धोकादायक इमारतींमधील हजारो नागरिकांना नोटिसा देऊन घर सोडण्याचे तसेच अतिधोकादायक इमारतींचा पाणी व वीजपुरवठा खंडित करा, असे आदेश प्रभाग अधिकाºयांना देण्यात आले. यापूर्वी काही धोकादायक इमारती लाखो रुपये खर्चून अत्याधुनिक मशीनने जनीनदोस्त केल्या होत्या. अशा प्रकारची कारवाई अपवादात्मकवेळी करता येईल, असे संकेत पाटील यांनी दिले.महापालिकेने पावसाळ्यापूर्वी आपत्कालीन कक्षाची स्थापना करून विशेष पथकाची स्थापना केली. तसेच पथकाला कुदळ-फावडे, बोट यांच्यासह इतर साहित्य देऊन २४ तास तैनात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोठ्या व लहान नाल्यांची पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे आदेश देऊन शहरात साचलेले कचºयाचे ढीग जादा यंत्रणा लावून उचलण्याचे आदेश दिले. गुरुवारी व शुक्रवारी आयुक्तांनी पालिका अधिकारी, महापौर मीना आयलानी यांच्यासमवेत दौरा करून पावसाळ्यापूर्वीच्या तयारीचा आढावा घेत पाहणी केली. आपत्कालीनवेळी नागरिकांसाठी पर्यायी व्यवस्था पालिकेकडे नसल्याचे उघड झाले आहे.इमारतींच्या पुनर्बांधणीची मागणीधोकादायक इमारतींत राहणाºया नागरिकांनी इमारतींच्या पुनर्बांधणीची मागणी पालिकेकडे केली आहे. वाढीव एफएसआय देऊन नवीन बांधकामांना परवानगी दिल्यास धोकादायक इमारतींच्या जागी नवीन इमारती उभ्या राहणार असल्याचे मत अनेक फ्लॅटधारकांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरnewsबातम्या