शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत काँग्रेसनं केला उद्धव ठाकरेंचा गेम?; निवडणुकीनंतरचं स्नेहभोजन वादात
2
निवडणुकीत हरवले ४५ हजार कोटींचे मराठवाड्याचे पॅकेज; प्रचारातही कुणी शब्द काढला नाही
3
“इंडिया आघाडीचे सरकार आल्यास १०० दिवसांत इलेक्टोरल बॉण्डचा तपास करणार”: अरविंद केजरीवाल
4
पश्चिम बंगालमध्ये राडा! भाजपाच्या महिला कार्यकर्त्याच्या मृत्यूनं तणाव; TMC वर आरोप
5
IPL 2024: दोन वर्ष, दोन जिव्हारी लागणारे पराभव... एकाच मैदानाने दोन वेळा तोडलं Virat Kohli चं स्वप्न
6
Smriti Irani : "CM हाऊसमध्ये स्वाती मालीवाल यांच्याशी गैरवर्तन, केजरीवाल गप्प का?"; स्मृती इराणींचं टीकास्त्र
7
Rajkummar Rao : "आता तो माझ्या आयुष्याचा..."; राजकुमार राव आईच्या आठवणीत आजही करतो दर शुक्रवारी व्रत
8
"न्याय झाल्यासारखा दिसला पण पाहिजे"; मतांच्या आकडेवारीवरुन सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाला विनंती
9
बुडालेल्या लोकांना शोधायला गेलेल्या SDRF पथकाची बोट उलटली; तीन जवानांचा मृत्यू
10
Gold Silver Price 23 May: सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण, एकाच दिवसात सोनं ₹१२८९, चांदी ₹३४७६ स्वस्त 
11
...म्हणून मला भारतीय संघाचा कोच व्हायचं नाही; Ricky Ponting नं सांगितलं कारण
12
"... तो रिपोर्ट खोटा आणि निराधार," कोळसा पुरवठा घोटाळ्याच्या आरोपावर Adani Groupचं स्पष्टीकरण
13
"पैसे देऊन गर्दी करतात", मोदींच्या विधानावर सपा नेत्याचा संताप; म्हणाले, "भाजपाचे बादशाह..."
14
Aadhar Card : १४ जूननंतर जुने आधार कार्ड खरोखरच निरुपयोगी होईल का? जाणून घ्या संपूर्ण सत्य
15
Tata Safari Review: टाटाची सफारी, चिखलात घातली, डोंगरात पळविली, १००० किमी चालवली; मायलेज, फिचर्स कशी वाटली...
16
राजकुमार रावचा 'गजगामिनी वॉक' पाहून पोट धरुन हसाल, 'हीरामंडी'च्या बिब्बोजानची केली कॉपी
17
१७ हंगाम अन् ६ संघ! Dinesh Karthik च्या IPL कारकिर्दीला पूर्णविराम
18
“काही नेत्यांची कीव येते”; पुणे पोर्शे अपघात प्रकरणी वसंत मोरेंचे रोखठोक भाष्य, दिला इशारा
19
भारत सरकारने सत्या नडेलांना ठोठावला लाखोंचा दंड! दोन महिन्यांत पैसे भरण्याचे आदेश
20
Fact Check: प्रशांत किशोर यांनी भाजपामध्ये प्रवेश केला? व्हायरल होत असलेले पत्र आहे खोटे!

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राच्या १२ कोटी आवर्तनाचा महासंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 5:34 AM

गीता फाउंडेशन, मिरजचे संस्थापक विश्वस्त दिलीप आपटे गुरुजी यांच्या वतीने श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राची १२ कोटी आवर्तने संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येत्या १० वर्षांत पूर्ण करण्याचा महासंकल्प के ला आहे.

- जान्हवी मोर्येठाणे : गीता फाउंडेशन, मिरजचे संस्थापक विश्वस्त दिलीप आपटे गुरुजी यांच्या वतीने श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राची १२ कोटी आवर्तने संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांतून येत्या १० वर्षांत पूर्ण करण्याचा महासंकल्प के ला आहे. या महासंकल्पाला सुरुवात झाली आहे. या आवर्तनांची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्डमध्ये करण्याचा प्रयत्न असल्याचे या महासंकल्पाचे ठाणे गटप्रमुख सुनील देशपांडे यांनी सांगितले.सुमारे १२ कोटी श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राचा प्रयोग प्रथमच करण्यात येत आहे. संस्थेतर्फे यापूर्वी तीन हजार नागरिकांना घेऊन आवर्तनांचा प्रयोग केला होता. या आवर्तनपठणाला १ जानेवारीपासून सुरुवात झाली आहे. या महासंकल्पात नागरिकांनी घरात दररोज किमान दोनदा (म्हणजेच महिन्यातून ६० वेळा) स्तोत्रपठण करायचे आहे. तसेच आठवड्यातून एकदा किंवा दोनदा एकत्र जमून सामूहिक ठिकाणी आवर्तने करायची आहेत. यासाठी जातपात, स्त्री किंवा पुरुष असे कोणतेही बंधन नाही.संस्थेतर्फे २३ गटप्रमुख नेमण्यात आले आहेत. आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातून १२ हजार लोकांनी आपली नावनोंदणी केली आहे. त्यांनी आतापर्यंत ९०,२२३ आवर्तने केली आहेत. संस्थेने आपली एक वेबसाइट तयार केली आहे. त्या वेबसाइटवर प्रत्येकाने आपल्या आवर्तनांची नोंद करायची आहे. या वेबसाइटवर श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्राचे महत्त्व, त्याचे फायदे सांगण्यात आले आहेत.श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्रामुळे आत्मविश्वास वाढतो. सामूहिक ठिकाणी सुरू असलेल्या आवर्तनाला दिलीप आपटे गुरुजी भेट देणार असून नागरिकांना त्यांच्या प्रवचनाचा लाभ मिळणार आहे. या महासंकल्पात जास्तीतजास्त नागरिकांनी सहभागी व्हावे. लोकसहभाग वाढल्यास हा महासंकल्प येत्या सहा वर्षांतच पूर्ण होईल, असा विश्वासही देशपांडे यांनी व्यक्त केला.ठाण्यातील विठ्ठल मंदिरात पठणठाण्यातील विठ्ठल मंदिरात १५ दिवसांपासून श्रीविष्णुसहस्रनाम स्तोत्राचे पठण केले जात आहे. हे पठण कल्याण, नाशिक, पुणे, मुंबई, सोलापूर, सांगली, नाशिक अशा सर्वच ठिकाणी सुरू आहे. सध्या मराठी व कन्नड भाषिक आवर्तनेच पठण करत आहेत. कन्नडमधील तुमकुर आणि बंगळुरू येथे आवर्तनांचे पठण सुरू आहे.