शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

"सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती राहणार तरी कशी?, आधी सुविधा द्या मग अपेक्षा करा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 10:08 IST

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली, त्या भेटीत त्यांनी शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली, आणि महासंघाला विचारात न घेतल्याबाबत खेद व्यक्त केला.

डोंबिवली - राज्य शासनाने सरकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची 100 टक्के उपस्थिती असण्याबाबत मनोदय व्यक्त केला असला तरीही आधी कामगारांच्या समस्यांचे निराकरण करणे गरजेचे आहे. कामाच्या ठिकाणी कामगारांना कोरोनाची लागण होणार नाही याची कोणतीही काळजी सरकारने घेतली नसल्याची खंत वाटत असल्याचे पत्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकतेच दिले.

महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी पवार यांची भेट घेतली, त्या भेटीत त्यांनी शासन निर्णयावर नाराजी व्यक्त केली, आणि महासंघाला विचारात न घेतल्याबाबत खेद व्यक्त केला. शासनाने कोणताही निर्णय न घेता 15 टक्क्यावरून एकदम 100 टक्के अधिकारी उपस्थिती निर्णय अव्यवहार्य असून जर त्याबाबत फेरविचार करून 50 टक्यासंदर्भात महासंघ विचार करेल असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. बहुतांशी कर्मचारी, अधिकारी हे ठाणे, कर्जत,कसारा तसेच पश्चिम रेल्वे मार्गे येतात. त्याना प्रवासात कोणतीही सुविधा नाही, तसेच लोकल फेऱ्या वाढवलेल्या नाहीत.

आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करणे गरजेचे

अधिकारी पूर्णपणे उपस्थित रहावे अशी अपेक्षा असताना त्यांच्या हाताखालचा कामगार, संबंधित यंत्रणा देखील उपस्थित राहणे गरजेचे आहे. पण अशा अपेक्षा व्यक्त करताना महासंघाच्या म्हणण्यानुसार आधी कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी कामाच्या ठिकाणी सॅनिटायझेशन सुविधा करायला हवी, कोरोना झाल्यास संबंधित कामगार, अधिकारी आदींचे उपचार संदर्भात ठोस निर्णय, भूमिका स्पष्ट असावी. तसेच 50 वर्षेपुढील अधिकारी, कामगारांच्या सेवेसंदर्भात, त्यांच्या उपस्थिती संदर्भात आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच गरोदर मातांनी येऊ नये त्यांनी आणि ज्येष्ठांनी वर्क फ्रॉम होम करणे, त्याबाबत धोरणात्मक निर्णय घेणे गरजेचे आहे.

मागण्यांची पूर्तता झाल्यानंतर उपस्थिती संदर्भात सामूहिक निर्णय घेण्यात येणार

कोणीही कामगार, अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे काही अप्रिय घडल्यास 50लाखांचा विमा कवच हे सगळ्यांना लागू करून त्याची तातडीने अंमलबजावणी करणे महत्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी येताना प्रत्येकाची विनामूल्य अँटिजेंन तसेच आवश्यकता असल्यास कोरोना टेस्ट करणे गरजेचे असल्याचेही महासंघाने स्पष्ट केले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार यांनी महासंघाच्या मागण्यांचा निश्चित विचार करून आवश्यक ती पावले उचलण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले आहे. मागण्यांची पूर्तता झाल्यानंतर उपस्थिती संदर्भात सामूहिक निर्णय घेण्यात येणार असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. महासंघाचे सल्लागार ग दी कुलथे, उपाध्यक्ष विष्णू पाटील, महिला संघटक सुशीला पवार, सुषमा कांबळी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या

तरुणांसाठी सुवर्णसंधी! 'ही' ई-कॉमर्स कंपनी देणार तब्बल एक लाख लोकांना नोकरी 

जय जिजाऊ, जय शिवराय! योगी सरकारच्या 'त्या' निर्णयावर फडणवीसांचं खास ट्विट, म्हणाले...

"मुंबई आणि महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियाचा पद्धतशीर वापर केला जातोय"

"बिहार निवडणूक येताच महाराष्ट्राच्या बदनामीचं कारस्थान सुरू, हा 'पॅटर्न' यशस्वी होणार नाही"

"कोरोनामध्ये आत्मनिर्भर व्हा, स्वतःचा जीव स्वतःच वाचवा कारण पंतप्रधान मोरासोबत व्यस्त आहेत"

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना वायरस बातम्याlocalलोकलAjit Pawarअजित पवारMaharashtraमहाराष्ट्र