शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

महापौर निधीतून १० कोटींचा कट्ट्यांचा घाट!,भाजपाच्या नगरसेवकांकडून आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2021 18:54 IST

Thane : शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या मुद्याला हात घातला. महापौर निधी कशा प्रकारे वापरला जाणे अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

ठाणे  : शहरातील अत्यावश्यक सेवांसाठी निधी मिळत नसतांना, त्यांचे प्रस्ताव निधी नसल्याचे कारण देत थांबविले जात असतांना, महापौर निधीतून शहराच्या विविध भागात तब्बल १० कोटींचा चुराडा करुन कट्ट्ये बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाच्या नगरसेवकांनी केला. परंतु महापौर निधी कसा आणि कुठे वापरायचा याचा सर्वस्वी अधिकार महापौरांना असल्याचे मत शिवसेनेच्या नगरसेवकांनी मांडले. मात्र, हे कट्टे बांधून त्याचा उपयोग काय, असा सवाल करीत ठाणेकरांच्या पैशांची उधळपटटी करण्याचाच हा प्रकार असल्याचा टोलाही भाजपाच्या नगरसेवकांनी लगावला.

शुक्रवारच्या स्थायी समितीच्या बैठकीत भाजपाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी या मुद्याला हात घातला. महापौर निधी कशा प्रकारे वापरला जाणे अपेक्षित आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. परंतु महापौर महोदय आपल्या मर्जीतील नगरसेवकांसाठीच जास्तीचा निधी देत असल्याची धक्कादायक माहितीही त्यांनी सभागृहासमोर दिली. त्यामुळे नियम काय सांगतो असा सवाल त्यांनी उपस्थित केला. यावर महापालिकेने महापौर निधी वापरण्याचे अधिकार हे महापौरांचे आहेत, तो कसा वापरायचा कोणाला द्यायचा हे अधिकार देखील त्यांचेच असल्याचे प्रशासनाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. परंतु भाजपच्या नगरसेवकांना हा मुद्दा रास्त वाटला नाही. त्यांनी थेट महापौर निधीतून केल्या जाणाऱ्या कामांवरच थेट बोट ठेवत त्यावरच आक्षेप नोंदविला. 

दुसरीकडे, भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाण यांनी तर महापौर निधीचा कसा चुकीच्या पध्दतीने वापर सुरु आहे, याचे उदाहरणच सभागृहासमोर आणले. महापौर निधीतून महत्वाची कामे शहरात होणे अपेक्षित असतांना शहराच्या विविध भागात १० कोटींचे कट्टे बांधण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. हे कट्टे केवळ बसण्यासाठी असणार आहेत. परंतु एका कट्ट्यांसाठी २५ लाखांचा खर्च केला जाणार असून त्याठिकाणी काय सोन्याचा मुलामा लावला जाणार आहे का? असा सवाल उपस्थित करुन त्यांनी शिवसेना नगरसेवकांना चक्रावुन सोडल्याचे दिसून आले.

विशेष म्हणजे शहरातील इतर काही महत्वाची अत्यावश्यक कामे शिल्लक आहेत, ती कामे व्हावीत, यासाठी इतर नगरसेवक प्रयत्न करीत आहेत, परंतु कोरोनामुळे निधी नसल्याचे कारण देत या कामांसाठी निधी नसल्याचे सांगितले जात आहे. अत्यावश्यक कामांना निधी मिळत नसतांना या कट्ट्यांसाठी निधी कसा मिळतो, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.त्यामुळे शिवेसनेचे नगरसेवक आणखीनच संतप्त झाल्याचे दिसून आले. 

महापौरांनी कोणाला निधी द्यायचा, कीती निधी द्यायचा हा अधिकार त्यांचा असल्याचे मत स्थायी समितीचे माजी सभापती राम रेपाळे यांनी व्यक्त केले. परंतु भाजपचे नगरसेवक आक्रमक झाल्याने अखेर सभापती संजय भोईर यांनी महापौर निधीच्या खर्चाबाबतचा अधिकार हा त्यांचा असल्याने त्यावर भाष्य करणो अयोग्य असल्याचे सांगत हा विषय थांबविण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा वाद काहीसा शमला असला तरी महासभेत या विरोधात जाब विचारला जाणार असल्याचे भाजप नगरसेवक चव्हाण यांनी स्पष्ट केले.

महापौरांच्या वॉर्डात १०० कोटींचे काममागील दोन वर्षापासून कोपरीतील कोपरी प्रसुतीगृहासाठी १० लाखांच्या निधीची मागणी केली जात आहे, त्याची फाईलही मंजुर आहे. काही दिवसांपूर्वी या प्रसुतीगृहातील एका बाजूचा स्लॅबही पडला आहे. दुसरीकडे बारा बंगला परिसरातील रस्त्याच्या कामासाठी ५ कोटींच्या निधीची फाईलही तयार आहे, निधीही मंजुर झाला आहे. परंतु त्यासाठी देखील आता निधी नसल्याचे कारण दिले जात आहे. असे शहरात इतर ठिकाणी देखील महत्वाची अत्यावश्यक कामे असून त्यासाठी निधी दिला जात नाही. मात्र महापौरांच्या वॉर्डात कामांसाठी १०० कोटींचा निधी मंजूर कसा झाला असा सवालही आता भाजपाच्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :Thane Municipal Corporationठाणे महानगरपालिकाBJPभाजपा