शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

यश जेवढे झटकन मिळते, तेवढ्याच चटकन...! शाओमीचेही तसेच झाले, पहिल्या पाचात राहतेय की नाही...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 04, 2023 12:39 PM

कोणे एकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. 

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी ब्रँड विवोने सॅमसंगला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. जुलैमध्ये हा एक धक्का झालाच परंतू त्याहून मोठा धक्का शाओमीला बसला आहे. कोणेएकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. 

तसे पहायला गेल्यास व्हिवो, शाओमी, ओप्पो, रिअमलमी या चिनी कंपन्या आहेत. म्हणजे चीनविरोधात भारतीयांची आघाडी असे काही चित्र नाहीय. परंतू, गेल्या काही काळापासून शाओमी चांगले स्मार्टफोन आणण्यात अपयशी ठरली आहे. डिझाईन, फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटी आदींमध्ये व्हिवो सध्या बाजी मारत आहे. याचाच फटका सॅमसंगलाही बसला आहे. 

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या ताज्या अहवालानुसार, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीतील डेटा आला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत, Vivo ने आपला बाजार हिस्सा 16 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जो गेल्या वर्षी या तिमाहीत 14.5 टक्के होता. या कालावधीत कंपनीच्या शिपमेंटमध्ये 7.4 टक्के वाढ दिसून आली आहे. 

आयडीसीच्या अहवालात कोरियन कंपनी सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी दुसऱ्या तिमाहीत, कंपनीचा हिस्सा 15.7% आहे, तर सॅमसंगचा बाजार हिस्सा गेल्या वर्षी या तिमाहीत 16.3% होता. Realme ब्रँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Realme चा बाजारातील हिस्सा १२.६ टक्के आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा १७.५ टक्के होता. Oppo ब्रँड चौथ्या स्थानावर आहे, ज्याचा बाजार हिस्सा 11 टक्के आहे.

एकेकाळी भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानावर असलेली Xiaomi आता पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ब्रँडचा बाजारातील हिस्सा 11 टक्के आहे, जो गेल्या वर्षी 17.6 टक्के होता.

टॅग्स :xiaomiशाओमी