शहरं
Join us  
Trending Stories
1
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
3
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
4
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
5
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
6
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
7
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
8
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
9
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
10
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
11
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
12
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
13
क्रिकेट चाहत्यांना धक्का! पुढील वर्षीचा टी२० वर्ल्ड कप मोबाईलवर दिसणार नाही? जिओस्टारने घेतली माघार
14
२०२५ च्या शेवटी भारतीय गुगलवर का सर्च करताहेत ५२०१३१४? अर्थ समजल्यावर तुम्हीही व्हाल हैराण
15
"उदय सामंतांसारखे खुर्ची पाहून पळून जाणारे ते नाहीत"; अंबादास दानवेंकडून भास्कर जाधवांची पाठराखण
16
'वंदे मातरम्'वर चर्चेची गरजच काय? बंगालचा उल्लेख करत प्रियंका गांधींचा सरकार हल्लाबोल...
17
तपोवन वृक्षतोड प्रकरणी सयाजी शिंदे यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट; बैठकीत काय चर्चा झाली?
18
"परीक्षेच्या चार दिवस आधी…" T20 वर्ल्ड कप तयारीच्या प्रश्नावर सूर्यानं दिला थेट शाळेचा दाखला
19
आदित्य ठाकरेंना विरोधी पक्षनेतेपद दिलं तर काय करणार? भास्कर जाधव यांचं मोठं विधान, म्हणाले...
20
'सध्यातरी' शब्दात अडकले वडेट्टीवार; मग म्हणाले, "मुद्दाम बोललो..., जेलमध्ये जाईन, पण भाजपमध्ये जाणार नाही...!" नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

यश जेवढे झटकन मिळते, तेवढ्याच चटकन...! शाओमीचेही तसेच झाले, पहिल्या पाचात राहतेय की नाही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 12:39 IST

कोणे एकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. 

भारतीय स्मार्टफोन मार्केटमध्ये चिनी ब्रँड विवोने सॅमसंगला मागे टाकत पहिला क्रमांक पटकावला आहे. जुलैमध्ये हा एक धक्का झालाच परंतू त्याहून मोठा धक्का शाओमीला बसला आहे. कोणेएकेकाळी नाही तर अवघ्या दोन वर्षांपूर्वी भारतात नंबर वन असलेली शाओमी पाचव्या क्रमांकावर घसरली आहे. 

तसे पहायला गेल्यास व्हिवो, शाओमी, ओप्पो, रिअमलमी या चिनी कंपन्या आहेत. म्हणजे चीनविरोधात भारतीयांची आघाडी असे काही चित्र नाहीय. परंतू, गेल्या काही काळापासून शाओमी चांगले स्मार्टफोन आणण्यात अपयशी ठरली आहे. डिझाईन, फिचर्स आणि कॅमेरा क्वालिटी आदींमध्ये व्हिवो सध्या बाजी मारत आहे. याचाच फटका सॅमसंगलाही बसला आहे. 

इंटरनॅशनल डेटा कॉर्पोरेशन (IDC) च्या ताज्या अहवालानुसार, 2023 च्या दुसऱ्या तिमाहीतील डेटा आला आहे. दुसऱ्या तिमाहीच्या शेवटच्या महिन्यापर्यंत, Vivo ने आपला बाजार हिस्सा 16 टक्क्यांपर्यंत वाढवला आहे. जो गेल्या वर्षी या तिमाहीत 14.5 टक्के होता. या कालावधीत कंपनीच्या शिपमेंटमध्ये 7.4 टक्के वाढ दिसून आली आहे. 

आयडीसीच्या अहवालात कोरियन कंपनी सॅमसंग दुसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षी दुसऱ्या तिमाहीत, कंपनीचा हिस्सा 15.7% आहे, तर सॅमसंगचा बाजार हिस्सा गेल्या वर्षी या तिमाहीत 16.3% होता. Realme ब्रँड तिसऱ्या क्रमांकावर आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Realme चा बाजारातील हिस्सा १२.६ टक्के आहे, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत हा आकडा १७.५ टक्के होता. Oppo ब्रँड चौथ्या स्थानावर आहे, ज्याचा बाजार हिस्सा 11 टक्के आहे.

एकेकाळी भारतीय बाजारपेठेत अव्वल स्थानावर असलेली Xiaomi आता पाचव्या स्थानावर पोहोचली आहे. या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत ब्रँडचा बाजारातील हिस्सा 11 टक्के आहे, जो गेल्या वर्षी 17.6 टक्के होता.

टॅग्स :xiaomiशाओमी