शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

'एक नंबर' टेक्नॉलॉजी; आता चोरलेले मोबाइल ठरणार बिनकामाचे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 06:40 IST

येत्या महिन्यापासून नवे तंत्रज्ञान : सिम कार्ड बदलले तरी फोन चालणार नाही

नवी दिल्ली : हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाइल फोनचा नेमका शोध घेऊन तो फोन वापरण्यासाठी पूर्णपणे निरुपयोगी करण्याची आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवी यंत्रणा दूरसंचार विभागातर्फे पुढील महिन्यापासून देशभर सुरू केली जाण्याची शक्यता आहे. यामुळे मोबाइलच्या चोऱ्यांना प्रतिबंध होऊन चोरलेल्या मोबाइलची ‘सेकंड हँड’ म्हणून होणारी बेकायदा विक्रीही बंद होईल, अशी अपेक्षा आहे.प्रत्येक मोबाइल फोनला १५ आकडी ‘आयएमईआय’ नंबर असतो. हा नंबर प्रत्येक फोनसाठी एकमेवाद्वितीय असल्याने ती त्या फोनची ओळख असते.

देशात विकल्या जाणाºया सर्व मोबाइल फोनच्या अशा ‘आयएमईआय’ नंबरची माहिती संकलित करून, संपूर्ण देशासाठी ‘सेंट्रल इक्विपमेंट आयडेन्टिटी रजिस्टर’ (सीईआयआर) तयार केले जाईल. मोबाइल फोनची सेवा पुरविणाºया कंपन्यांकडे त्यांच्या प्रत्येक ग्राहकाच्या मोबाइलचा ‘आयएमईआय’ नंबर असतो.नव्या यंत्रणेसाठी असे तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे की, ग्राहकाने त्याचा मोबाइल हरविल्याचे किंवा चोरीला गेल्याचे कळविले की, त्या फोनचा ‘आयएमईआय’ नंबर लगेच या रजिस्टरमध्ये नोंदविला जाईल आणि त्याची माहिती सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांनाही तात्काळ दिली जाईल. थोडक्यात त्या ‘आयएमईआय’ नंबरचा मोबाईल फोन ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये टाकला जाईल. परिणामी त्या फोनवर कोणत्याही कंपनीची सेवा मिळू शकणार नाही.

मोबाईल चोरणारे त्या फोनमधील सिमकार्ड बदलतात किंवा त्याच्या ‘आयएमईआय’ नंबरमध्ये फेरफार करतात. त्यामुळे तो फोन वापरता येतो. मात्र या नव्या यंत्रणेच्या तंत्रज्ञानाने अशा फोनचा ‘‘आयएमईआय’ नंबर एकदा ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये गेला की, सिमकार्ड बदलून किंवा नंबरमध्ये फेरफार करूनही तो फोन वापता येणार नाही. कारण त्यावर देशातील कोणत्याही कंपनीची सेवा मिळणार नाही. अशा प्रकारे असा फोन कायमसाठी पूर्णपणे निरुपयोगी होईल.

दूरसंचार मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, ही नवी प्रतिबंधक यंत्रणा उभारण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान विकसित करण्याचे काम मंत्रालयाने ‘सेंटर फॉर डेव्हलपमेंट आॅफ टेलेमॅटिक्स’कडे (सी-डॉट) जुलै २०१७ मध्ये सोपविले होते. ‘सी-डॉट’ने हे तंत्रज्ञान विकसित केले असून त्यावर आधारित यंत्रणाही सज्ज करण्यात आली आहे. या ‘सीईआयआर’ यंत्रणेचा एक पथदर्शक चाचणी प्रकल्प महाराष्ट्रात यशस्वीपणे पार पडला आहे.

या यंत्रणेसाठी सरकारने १५ कोटी रुपये दिले आहेत. सध्या सुरु असलेले संसदेचे अधिवेशन २६ जुलै रोजी संपले की बहुधा आॅगस्टच्या सुरुवातीस दूरसंचार मंत्र्यांच्या हस्ते या नव्या यंत्रणेचा शुभारंभ केला जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला.कशी काम करेल ही यंत्रणा?प्रत्येक मोबाइल फोनला स्वत:ची ओळख देणारा १५ आकडी ‘आयएमईआय’ नंबर असतो.तुम्ही कोणत्याही सेवा पुरवठादार कंपनीचे सिम कार्ड घालून त्या मोबाइलचा वापर सुरू केला की, हा ‘आयएमईआय’ नंबर त्या कंपनीकडे आपोआप नोंदविला जातो.सर्व कंपन्यांच्या सेवा घेणाºया मोबाइल फोनच्या ‘आयएमईआय’ नंबरचे संकलन करून ‘सीईआयआर’ रजिस्टर तयार केले जाईल.

मोबाइल फोन हरविल्याचे किंवा चोरीला गेल्याचे ग्राहकाने कळविले की, त्या फोनचा ‘आयएमईआय’ नंबर ‘ब्लॅकलिस्ट’मध्ये टाकला जाईल व त्याची माहिती तत्काळ सर्व सेवा पुरवठादार कंपन्यांना दिली जाईल.यामुळे अशा फोनवर कोणत्याही कंपनीची कोणतीही सेवा त्यापुढे कधीही उपलब्ध होणार नाही.

टॅग्स :Mobileमोबाइल