शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

शाओमी कंपनीने एका महिन्यात विकले एक कोटी स्मार्टफोन !

By शेखर पाटील | Updated: October 3, 2017 20:37 IST

शाओमी कंपनीने सप्टेबर महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन विकल्याची घोषणा करण्यात आली असून हा अतिशय महत्वाचा टप्पा मानला जात आहे.

शाओमी कंपनीचे सीईओ लेई जून आणि भारतीय अध्यक्ष मनुकुमार जैन यांनी ट्विट करून  या विक्रमाची माहिती दिली. यानुसार शाओमी कंपनीने सप्टेबर २०१७ या महिन्यात एक कोटींपेक्षा जास्त स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री केली. शाओमी कंपनीला ऑगस्ट महिन्यातच भारतात तीन वर्षे पूर्ण झाली आहेत. या कालखंडात कंपनीने भारतात अडीच कोटी स्मार्टफोन मॉडेल्सची विक्री केल्याचे आधीच घोषीत करण्यात आले होते. यानंतर अवघ्या एका महिन्यात एक कोटीच्या खपाचा आकडा गाठून शाओमीने अन्य कंपन्यांना धोक्याचा इशारा दिला आहे. विशेष बाब म्हणजे चीनच्या पाठोपाठ शाओमीने भारतातही आपला पाया मजबूत केला असून या एक कोटी स्मार्टफोनच्या विक्रीतही याचे प्रतिबिंब उमटले आहे.

शाओमी कंपनीच्या रेडमी नोट ४, रेडमी ४ आणि रेडमी ४ ए या मॉडेल्सला ग्राहकांचा अतिशय उत्तम असा प्रतिसाद लाभला आहे. याशिवाय गुगलच्या अँड्रॉइड वन या प्रकल्पाच्या अंतर्गत अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या शाओमी मीए १ या अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणार्‍या मॉडेललाही ग्राहकांची पसंती मिळाली आहे. शाओमी कंपनीच्या या यशात अत्यंत किफायतशीर मूल्यात उत्तमोत्तम फिचर्सचा समावेश असणार्‍या मॉडेल्सचा मोलाचा वाटा आहे. यातच या कंपनीने अलीकडे आपल्या विक्रीतंत्रात केलेला बदलदेखील कारणीभूत ठरल्याचे मानले जात आहे. शाओमी कंपनीने प्रारंभी फक्त ऑनलाईन विक्रीवरच भर दिला होता. अलीकडेच मात्र शाओमीने ऑफलाईन विक्रेत्यांचे जाळे मजबूत केले आहे. याशिवाय शाओमी कंपनीचे एक्सक्लुझिव्ह शोरूम असणार्‍या मी होम या शॉपीजचा विस्तारदेखील भारताच्या विविध शहरांमध्ये करण्यात आला आहे. यामुळे शाओमी कंपनीच्या विक्रीवर अनुकुल परिणाम झाल्याचे अभ्यासकांचे मत आहे. येत्या कालखंडात शाओमी अजून काही फ्लॅगशीप मॉडेल्स लाँच करणार असल्याने या कंपनीची घोडदौड कायम राहण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Mobileमोबाइल