शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

Chinese smartphones scrutiny: चिनी अ‍ॅपनंतर आता स्मार्टफोन कंपन्यांची वेळ भरली; Vivo, Oppo, Xiaomi ला मोदी सरकारची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 15:00 IST

Chinese smartphone brands under Government scrutiny: Vivo, Oppo, Xiaomi आणि OnePlus या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबिज केला आहे. या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीयांसाठी सुरक्षित आहेत का, हे शोधायचे आहे.

चिनच्या सैन्याने विश्वासघात करून लडाखमध्ये भारतीय जवानांवर हल्ला केल्यामुळे भारत सरकारने 220 हून अधिक चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. ही अ‍ॅप भारतीयांची माहिती आणि गोपनियता चोरत असल्याचे आढळले होते. आता अशाच प्रकारची कारवाई चिनी स्मार्टफोन कंपन्यांवर करण्याची तयारी मोदी सरकारने केली आहे. मोदी सरकारने वनप्लस, व्हिवो, ओप्पो, शाओमी सारख्या कंपन्यांना नोटीस पाठविली असून स्मार्टफोनमध्ये वापरला जाणारा डेटा आणि सुटे भाग, यंत्रणा आदीची माहिती मागविली आहे. यामुळे चिनी कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. 

Vivo, Oppo, Xiaomi आणि OnePlus या कंपन्यांनी भारतीय बाजारपेठेचा 50 टक्के हिस्सा काबिज केला आहे. या कंपन्यांचे स्मार्टफोन हे भारतीयांसाठी सुरक्षित आहेत का, हे शोधायचे आहे. ही माहिती दिल्यानंतर भारत सरकार या कंपन्यांना त्यांचे स्मार्टफोन तपासणीसाठी पाठविण्याची मागणी देखील करणारी नोटीस पाठविण्याच्या तयारीत आहे. The Morning Context ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

दुसरी नोटीस ही या चिनी कंपन्यांवर मोठी कारवाई असेल. चिनी स्मार्टफोन कंपन्यांची अ‍ॅप युजरचा डेटा चोरी करतात असा आरोप गेल्या काही वर्षांपासून होत आहे. मात्र, कमी किंमत आणि चांगले फिचर्स यामुळे हे फोन धडाधजड विकले जातात. शाओमीसारख्या काही ब्रँडनी आम्ही कसे भारतीय आहोत, हे दाखविण्यास सुरुवात केली आहे. यासाठी या कंपन्यांनी हे स्मार्टफोन भारतात बनविण्यास सुरुवाता केली आहे. 

भारत सरकार Huawei आणि ZTE या इंटरनेटसाठीच्या उपकरणे बनविणाऱ्या कंपन्यांना देखील नोटीस पाठविणार आहे. फक्त हार्डवेअरच नाही तर सॉफ्टवेअर डिटेल्स देखील मागण्यात आल्या आहेत. यामध्ये या कंपन्यांच्या प्री इनस्टॉल अ‍ॅपचा समावेश आहे. 

टॅग्स :chinaचीनVivoविवोoppoओप्पोOneplus mobileवनप्लस मोबाईल