शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : देशभरात ११ वाजेपर्यंत २४ टक्के मतदान; महाराष्ट्रात प्रमाण सर्वात कमी
4
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
5
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
6
मतदानादरम्यान, किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
7
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट
8
ना पत्नी, ना मुलबाळ! सलमान खानच्या पश्चात कोण होणार त्याच्या संपत्तीचा वारसदार? नाव आलं समोर
9
Baramati Lok Sabha Election 2024 : 'ही चिडचिड खूप काही सांगून जाते...', रोहित पवारांनी दत्तात्रय भरणेंचा व्हिडीओ केला शेअर, म्हणाले...
10
‘रामगोपाल यादव यांचा राम मंदिराबाबत वादग्रस्त दावा, म्हणाले, हे मंदिर बेकार, त्याचा…’
11
अक्षय्य तृतीया का साजरी केली जाते? या दिवसाचे महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता जाणून घ्या
12
Akhilesh Yadav : "भाजपावाले जाणूनबुजून उन्हाळ्यात मतदान ठेवतात"; अखिलेश यादव यांचा आरोप
13
महाराष्ट्राची लढाई बारामतीत होते की काय? संजय राऊतांची मोदी-शाह यांच्यावर टीका
14
सांगली जिल्हा विशाल पाटील यांच्या घरासाठी जन्माला आलेला नाही; संजयकाका पाटलांचा हल्लाबोल
15
झारखंडचे मंत्री आलमगीर यांचे स्वीय सहायक आणि नोकराला ईडीने केली अटक; 35 कोटी जप्त
16
अक्षय्य तृतीया: ‘ही’ कामे अवश्य करा, सुख-समृद्धी मिळवा; लक्ष्मीकृपेने भरभराट, धनलाभ योग!
17
"इंग्रजांनी उभारलेल्या व्यवस्थेला गंज लागलाय..," UPSCचा उल्लेख करत माजी RBI गव्हर्नरांनी उपस्थित केला प्रश्न
18
लेकीसाठी शरद पवार बनले बारामतीचे मतदार; मुंबईच्या मतदार यादीतून नाव काढलं
19
अजबच! गणितात २०० पैकी २१२, तर भाषेमध्ये २११ गुण, मुलीचं प्रगती पुस्तक होतंय व्हायरल  
20
Video - हृदयस्पर्शी! वडिलांच्या मृत्यूनंतर सोडून गेली आई; 10 वर्षांचा मुलगा चालवतोय घर

जेव्हा एकही थेंब पाण्याशिवाय चारचाकी स्वच्छ होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 03, 2018 4:41 PM

वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे.  

ठळक मुद्देपुण्यात पाण्याशिवाय चारचाकी स्वच्छ करण्याचे तंत्रज्ञान  पुणेकरांचा उत्तम प्रतिसाद, दररोज १०० गाड्यांची स्वच्छता

 

पुणे : वाढती लोकसंख्या आणि त्या प्रमाणात कमी होत जाणारे पाण्याचे स्रोत त्यामुळे सर्वत्र पाण्याचा तुटवडा असताना पुण्यात पाण्याचा एकही थेंब न वापरता चारचाकी गाडी स्वच्छ करण्याचा तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. पुण्यातील निनाद आणि अक्षय ढोक या दोन भावांनी सुरु केलेल्या पाण्याविना गाडी स्वच्छ करण्याच्या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

 

   पाण्याने जगात तिसरे महायुद्ध होऊ शकते असा विचार अनेकदा मांडण्यात येतो. भारतातील अनेक राज्यात पाणी वाटपावरून अंतर्गत कलह आहे. भूजल साठाही दिवसागणिक कमी होत असून ही पर्यावरणाच्या दृष्टीने चिंतनीय बाब आहे. याच विचारातून अनेक ठिकाणी पाणी मीटर लावण्यात येत असून व्यक्तिगणिक पाणी वाटप करण्याचा विचार शासन करत आहे. पाणी वाचवण्याचा संदेशही सर्वत्र देण्यात येतो. मात्र गाडी धुणे किंवा कपडे धुणे, भांडी घासणे अशा घरगुती कामांसाठी भरमसाठ पाणी वापरण्यात येते. त्यावर उपाय शोधण्याची गरज असताना पुण्यात त्यावर उपाय शोधला गेला आहे. एका चारचाकीसाठी स्वच्छतेसाठी सुमारे १०० लिटर पाण्याचा वापर होत असताना नव्या तंत्रज्ञानामुळे पाण्याची बचत होणार आहे. 

 

     निनाद हे मेकॅनिकल इंजिनिअर असून सुमारे १८ वर्षे त्यांनी या क्षेत्रात काम केले होते. २०११ साली कामानिमित्त अमेरिकेत गेल्यावर त्यांना पाण्याच्या वापर न करता गाडी धुण्याचे तंत्र बघायला मिळाले. त्यांनी त्याचा तीन वर्ष अभ्यास करून स्वतःच्या कंपनीसाठी काही पदार्थ एकत्र करून एक वेगळे द्रावण तयार केले. या मिश्रणाचा वापर करत पाणी न वापरता कोणत्याही मशिनशिवाय गाड्या स्वच्छ करता येतात.हे काम पाणी न वापरता करण्यात येत असल्याने शेकडो लिटर पाण्याची बचत होत आहे. पुणेकर या पध्दतीने गाड्या स्वच्छ करण्यास प्राधान्य देत असून दररोज १०० गाड्या स्वच्छ केल्या जातात. याबाबत अक्षय यांनी माहिती दिली असून आम्ही तयार केलेल्या द्रावणामुळे कार फक्त स्वच्छ नाही तर चकचकीत होत असल्याचे सांगितले. व्यवसाय करताना पर्यावरणपूरक काहीतरी देण्याचा आमचा प्रयत्न सफल झाल्याचं समाधानही त्यांनी व्यक्त केलं. 

 

 

 

टॅग्स :Puneपुणेtechnologyतंत्रज्ञानWaterपाणीenvironmentवातावरण