शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 22:27 IST

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात.

एखाद्या प्रवासावेळी स्मार्ट फोनची बॅटरी अचानक संपली तर मिळेल त्या चार्जर किंवा पॉवर बँकने ती चार्ज करावी लागते. परंतू, त्यातून निघणाऱ्या वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. चला पाहूया काय खरे आहे ते. 

वारंवार चार्ज करणे एखाद्याला सवय असते की फोनची बॅटरी थोडीजरी कमी झाली तरीही फोन पुन्हा चार्जिंगला लावणे. बाहेर जायचे असल्यास बॅटरी अर्धी संपलेली असल्यास आपण दिवसातून एकदा तरी चार्जिंगला लावतोच. अशी वारंवार बॅटरी चार्ज केल्यास ती लवकर खराब होते, असे सांगितले जाते. खरे म्हणजे लिथिअम आयनच्या बॅटरीचे चार्जिंग सायकल ही काही लाखांत असते. म्हणजेच काही लाख वेळा ती चार्ज करता येते. आपण साधारण 2 ते 3 वर्षे मोबाईल वापरतो. यानंतर तो मोबाईल जुनाट होऊन जातो. दिवसातून तीन वेळा जरी बॅटरी चार्ज केल्यास ती लाख सायकलही पूर्ण करत नाही. यामुळे बॅटरी खराब होत नाही. 

चार्जिंगवेळी मोबाईल तापतो...लिथियम-आयन बॅटरी ही 32 डीग्री फॅरनहाईट तापमानापेक्षा कमी तापमानामध्ये चार्ज करू नये. वारंवार कमी तापमानात चार्ज केल्यास अॅनोडवर लिथियम-आयनचा थर बनतो. त्याला हटविता येत नाही. यामुळे बॅटरीचे आयुष्य घटते. यामुळे मोबाईल चार्ज करत असताना तापणे ही बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगलेच असते. 

दुसऱ्या चार्जरद्वारे चार्जिंगनव्या मोबाईलमधील बॅटरीमध्ये त्याला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा असते, जी बॅटरीला झेपू शकेल एवढाच विजेचा भार घेते. यामुळे जादा पावरच्या चार्जरद्वारे कमी पावरचा फोन चार्ज केल्यास त्याचा कोणताही परिणाम बॅटरीवर होत नाही. हा फोन त्याच्या ताकदीनुसार वीज घेतो. तसेच कमी पावरच्या चार्जरने जादा पावरचा फोन चार्ज केल्यासही काही परिणाम होत नाही. केवळ हळू चार्ज होते. यामुळे आयफोनलाही अँड्रॉईडचा चाजर दुसऱ्या केबलद्वारे लागू शकतो. 

अतिचार्जिंगमुळे स्फोट होतोअतिचार्जिंग केल्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो असा समज आहे. मात्र, एकदा फोनची बॅटरी 100 टक्के चार्ज झाली की ती चार्ज होणे बंद करते. यामध्ये एक चीप बसवलेली असते जी अतिचार्जिंग होण्यापासून वाचवते. मात्र, रात्रभर चार्जिंगला लावल्यास फोन गरम होऊन बॅटरीचे आयुष्य घटू शकते. 

नवीन फोन फुल चार्ज करायलाच हवा का?नवीन फोन पहिल्यांदाच पूर्ण चार्ज करण्यास सांगितले जाते. मात्र, ही बाब पाच, सहा वर्षांपूर्वी होती. आता नव्या तंत्रज्ञानाने युक्त लिथियम आयन बॅटरी आल्या आहेत. या बॅटरींना पूर्ण चार्ज करण्याची गरज भासत नाही. 

पूर्ण संपल्यावर चार्जिंगला लावणेबॅटरी पूर्ण संपल्यानंतर बरेचजण बॅटरी चार्ज करतात. मात्र, असे केल्याने बॅटरीतील आयन कमजोर होतात. यामुळे 30 टक्क्यांवर बॅटरी असताना मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य ठरेल.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानApple IncअॅपलAndroidअँड्रॉईड