शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 22:27 IST

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात.

एखाद्या प्रवासावेळी स्मार्ट फोनची बॅटरी अचानक संपली तर मिळेल त्या चार्जर किंवा पॉवर बँकने ती चार्ज करावी लागते. परंतू, त्यातून निघणाऱ्या वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. चला पाहूया काय खरे आहे ते. 

वारंवार चार्ज करणे एखाद्याला सवय असते की फोनची बॅटरी थोडीजरी कमी झाली तरीही फोन पुन्हा चार्जिंगला लावणे. बाहेर जायचे असल्यास बॅटरी अर्धी संपलेली असल्यास आपण दिवसातून एकदा तरी चार्जिंगला लावतोच. अशी वारंवार बॅटरी चार्ज केल्यास ती लवकर खराब होते, असे सांगितले जाते. खरे म्हणजे लिथिअम आयनच्या बॅटरीचे चार्जिंग सायकल ही काही लाखांत असते. म्हणजेच काही लाख वेळा ती चार्ज करता येते. आपण साधारण 2 ते 3 वर्षे मोबाईल वापरतो. यानंतर तो मोबाईल जुनाट होऊन जातो. दिवसातून तीन वेळा जरी बॅटरी चार्ज केल्यास ती लाख सायकलही पूर्ण करत नाही. यामुळे बॅटरी खराब होत नाही. 

चार्जिंगवेळी मोबाईल तापतो...लिथियम-आयन बॅटरी ही 32 डीग्री फॅरनहाईट तापमानापेक्षा कमी तापमानामध्ये चार्ज करू नये. वारंवार कमी तापमानात चार्ज केल्यास अॅनोडवर लिथियम-आयनचा थर बनतो. त्याला हटविता येत नाही. यामुळे बॅटरीचे आयुष्य घटते. यामुळे मोबाईल चार्ज करत असताना तापणे ही बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगलेच असते. 

दुसऱ्या चार्जरद्वारे चार्जिंगनव्या मोबाईलमधील बॅटरीमध्ये त्याला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा असते, जी बॅटरीला झेपू शकेल एवढाच विजेचा भार घेते. यामुळे जादा पावरच्या चार्जरद्वारे कमी पावरचा फोन चार्ज केल्यास त्याचा कोणताही परिणाम बॅटरीवर होत नाही. हा फोन त्याच्या ताकदीनुसार वीज घेतो. तसेच कमी पावरच्या चार्जरने जादा पावरचा फोन चार्ज केल्यासही काही परिणाम होत नाही. केवळ हळू चार्ज होते. यामुळे आयफोनलाही अँड्रॉईडचा चाजर दुसऱ्या केबलद्वारे लागू शकतो. 

अतिचार्जिंगमुळे स्फोट होतोअतिचार्जिंग केल्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो असा समज आहे. मात्र, एकदा फोनची बॅटरी 100 टक्के चार्ज झाली की ती चार्ज होणे बंद करते. यामध्ये एक चीप बसवलेली असते जी अतिचार्जिंग होण्यापासून वाचवते. मात्र, रात्रभर चार्जिंगला लावल्यास फोन गरम होऊन बॅटरीचे आयुष्य घटू शकते. 

नवीन फोन फुल चार्ज करायलाच हवा का?नवीन फोन पहिल्यांदाच पूर्ण चार्ज करण्यास सांगितले जाते. मात्र, ही बाब पाच, सहा वर्षांपूर्वी होती. आता नव्या तंत्रज्ञानाने युक्त लिथियम आयन बॅटरी आल्या आहेत. या बॅटरींना पूर्ण चार्ज करण्याची गरज भासत नाही. 

पूर्ण संपल्यावर चार्जिंगला लावणेबॅटरी पूर्ण संपल्यानंतर बरेचजण बॅटरी चार्ज करतात. मात्र, असे केल्याने बॅटरीतील आयन कमजोर होतात. यामुळे 30 टक्क्यांवर बॅटरी असताना मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य ठरेल.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानApple IncअॅपलAndroidअँड्रॉईड