शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

स्मार्ट फोन चार्जिंगबाबत अनेक अफवा; वाचा काय खरे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2018 22:27 IST

वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात.

एखाद्या प्रवासावेळी स्मार्ट फोनची बॅटरी अचानक संपली तर मिळेल त्या चार्जर किंवा पॉवर बँकने ती चार्ज करावी लागते. परंतू, त्यातून निघणाऱ्या वीज प्रवाहामुळे फोनची बॅटरी खराब होईल किंवा वारंवार चार्ज केल्याने खराब होईल अशी भीती सारखी वाटत राहते. याबाबत बऱ्याचदा सल्लेही ऐकायला मिळतात. चला पाहूया काय खरे आहे ते. 

वारंवार चार्ज करणे एखाद्याला सवय असते की फोनची बॅटरी थोडीजरी कमी झाली तरीही फोन पुन्हा चार्जिंगला लावणे. बाहेर जायचे असल्यास बॅटरी अर्धी संपलेली असल्यास आपण दिवसातून एकदा तरी चार्जिंगला लावतोच. अशी वारंवार बॅटरी चार्ज केल्यास ती लवकर खराब होते, असे सांगितले जाते. खरे म्हणजे लिथिअम आयनच्या बॅटरीचे चार्जिंग सायकल ही काही लाखांत असते. म्हणजेच काही लाख वेळा ती चार्ज करता येते. आपण साधारण 2 ते 3 वर्षे मोबाईल वापरतो. यानंतर तो मोबाईल जुनाट होऊन जातो. दिवसातून तीन वेळा जरी बॅटरी चार्ज केल्यास ती लाख सायकलही पूर्ण करत नाही. यामुळे बॅटरी खराब होत नाही. 

चार्जिंगवेळी मोबाईल तापतो...लिथियम-आयन बॅटरी ही 32 डीग्री फॅरनहाईट तापमानापेक्षा कमी तापमानामध्ये चार्ज करू नये. वारंवार कमी तापमानात चार्ज केल्यास अॅनोडवर लिथियम-आयनचा थर बनतो. त्याला हटविता येत नाही. यामुळे बॅटरीचे आयुष्य घटते. यामुळे मोबाईल चार्ज करत असताना तापणे ही बॅटरीच्या आयुष्यासाठी चांगलेच असते. 

दुसऱ्या चार्जरद्वारे चार्जिंगनव्या मोबाईलमधील बॅटरीमध्ये त्याला सुरक्षित ठेवणारी यंत्रणा असते, जी बॅटरीला झेपू शकेल एवढाच विजेचा भार घेते. यामुळे जादा पावरच्या चार्जरद्वारे कमी पावरचा फोन चार्ज केल्यास त्याचा कोणताही परिणाम बॅटरीवर होत नाही. हा फोन त्याच्या ताकदीनुसार वीज घेतो. तसेच कमी पावरच्या चार्जरने जादा पावरचा फोन चार्ज केल्यासही काही परिणाम होत नाही. केवळ हळू चार्ज होते. यामुळे आयफोनलाही अँड्रॉईडचा चाजर दुसऱ्या केबलद्वारे लागू शकतो. 

अतिचार्जिंगमुळे स्फोट होतोअतिचार्जिंग केल्यामुळे बॅटरीचा स्फोट होतो असा समज आहे. मात्र, एकदा फोनची बॅटरी 100 टक्के चार्ज झाली की ती चार्ज होणे बंद करते. यामध्ये एक चीप बसवलेली असते जी अतिचार्जिंग होण्यापासून वाचवते. मात्र, रात्रभर चार्जिंगला लावल्यास फोन गरम होऊन बॅटरीचे आयुष्य घटू शकते. 

नवीन फोन फुल चार्ज करायलाच हवा का?नवीन फोन पहिल्यांदाच पूर्ण चार्ज करण्यास सांगितले जाते. मात्र, ही बाब पाच, सहा वर्षांपूर्वी होती. आता नव्या तंत्रज्ञानाने युक्त लिथियम आयन बॅटरी आल्या आहेत. या बॅटरींना पूर्ण चार्ज करण्याची गरज भासत नाही. 

पूर्ण संपल्यावर चार्जिंगला लावणेबॅटरी पूर्ण संपल्यानंतर बरेचजण बॅटरी चार्ज करतात. मात्र, असे केल्याने बॅटरीतील आयन कमजोर होतात. यामुळे 30 टक्क्यांवर बॅटरी असताना मोबाईल चार्जिंगला लावणे योग्य ठरेल.

टॅग्स :Mobileमोबाइलtechnologyतंत्रज्ञानApple IncअॅपलAndroidअँड्रॉईड