शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

Internet shutdown: आम्ही सज्ज, इंटरनेट होणार नाही बंद, भारताच्या टॉप सायबर अधिकाऱ्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2018 10:22 PM

पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

नवी दिल्ली- पुढच्या 48 तासांत इंटरनेट सेवा ठप्प होणार असल्यानं एकच खळबळ उडाली आहे. परंतु भारताच्या इंटरनेट सुरक्षेशी संबंधित असलेल्या अधिका-यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. राष्ट्रीय सायबर सुरक्षा अधिकारी गुलशन राय यांच्या मते, जगभरात जरी इंटरनेट सेवा खंडित झाली तरी भारतात इंटरनेटच्या माध्यमातून होणारी कामं सुरूच राहणार आहेत. यासाठी आधीच व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे लोकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.राष्ट्रीय सायबर सुरक्षातज्ज्ञ अधिकारी गुलशन राय यांनी NDTVच्या हवाल्यानं सांगितलं की, जगभरातल्या इंटरनेट धारकांना पुढच्या 48 तासांमध्ये नेटवर्क कनेक्शनचा समस्यांना सामोरं जावं लागणार आहे. परंतु आम्ही याची पूर्ण तयारी केली आहे. इंटरनेट बंद झाले तरी भारतात अशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही. Russia Today रिपोर्टनुसार, द इंटरनेट कॉर्पोरेशन ऑफ असाइन्ड अँड नंबर्स(ICANN)ही संस्था मेंटनन्सशी संबंधित काम करणार आहे. ICANN क्रिप्टोग्राफिक की(key) बदलणार आहे. ही इंटरनेट की(key)च अॅड्रेस बुक आणि डोमेन नेम सिस्टम(DNS)ची सुरक्षा करणार आहे.या मेंटनन्समुळे पूर्ण जगभरात फक्त 1 टक्के म्हणजेच जवळपास 36 मिलियन(3.6 कोटी) लोक प्रभावित होणार आहेत. कम्युनिकेशन रेग्युलेटरी अथॉरिटीच्या मते, डोमेन नेम सिस्टीमच्या सुरक्षेसाठी जगभरातील इंटरनेट सेवा काही काळासाठी बंद करणं गरजेचं आहे. जे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी तयार नाहीत. त्यांच्या ग्राहकांना याचा फटका बसू शकतो. या परिस्थितीत सिस्टम सिक्युरिटी एक्सटेन्शन बनवून मार्ग काढला जाऊ शकतो. 

टॅग्स :technologyतंत्रज्ञान