शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
2
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
3
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
4
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
5
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
6
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
7
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
8
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
9
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
10
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
11
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
12
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
13
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
14
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
15
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
16
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
17
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
18
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
19
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
20
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात जगात भारताचा पहिला क्रमांक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2019 11:56 IST

इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात देशभरात मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जात आहे. या आंदोलनादरम्यान अनेक ठिकाणी हिंसाचार घटना घडून सार्वजनिक मालमत्तेचे नुकासान झाले आहे. कोणतेही आंदोलन असताना परिस्थिती चिघळू नये, कोणत्याही अफवा पसरु नये यासाठी सरकारडून इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतले जातात. 

इंटरनेट बंद करण्यामध्ये जगभरातून भारताचा पहिला क्रमांक लागत असल्याचे माहिती इंटरनेट शटडाऊंस डॉट इन अहवालानूसार समोर आले आहे. तसेच इंटरनेट सेवा बंद केल्यामुळे मोठे आर्थिक नुकसान देखील झाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतामध्ये 2012 पासून आतापर्यत 367 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. जागतिक स्तरावर खंडित करण्यात आलेल्या इंटनेटपैकी भारतातील संख्या 67 टक्के आहे.

2018 मध्ये सर्वाधिक म्हणजे तब्बल 134 वेळा इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. जगाच्या तुलनेत भारतात इंटरनेट बंद करण्यात आलेल्या घटनांची संख्या सर्वाधिक होती. तसेच जम्मू काश्मीरमध्ये गेल्या 8 वर्षांत सर्वाधिक वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. 

जम्मू काश्मीरमध्ये सुमारे 180 वेळा इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. दहशवादी कारवाया आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचलण्यात आले होते. कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमधून  इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. 2012 मध्ये 3 वेळा, 2013 मध्ये 5 वेळा, 2014 मध्ये 6 वेळा, 2015 मध्ये 14 वेळा, 2016 मध्ये 31 वेळा, 2017 मध्ये 79 वेळा, 2018 मध्ये 134 वेळा आणि 2019 मध्ये 95 वेळा इंटरनेट बंद ठेवण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी देखील इंटरनेट बंद ठेवण्यात भारताचा या वर्षी जगात पहिला नंबर असल्याचे सांगत ट्विट केले आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटIndiaभारतcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370Maharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारPoliceपोलिस