कोणाच्या डोक्यातून काय सुपिक कल्पना निघेल काहीच सांगता येत नाहीय. इथे भल्या भल्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत पाय रोवता येत नाहीएत आणि आता एक नवीन कंपनी येत आहे. ही कंपनी एक वेगळीच कल्पना घेऊन येत आहे, ती म्हणजे सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन देण्याची. पण यासाठी ही कंपनी रिसायकल केलेले पार्ट वापरणार आहे.
कल्पना तशी चांगली आहे. कारण जगात ईवेस्टचा कचरा वाढत चालला आहे. या निमित्ताने तो पुन्हा वापरात येईल आणि कमी होईल. रिअलमी, ऑनर, अल्काटेलसारख्या चायनिज कंपन्यांना भारतात लाँच करणारे माधव सेठ हे या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी नुकतेच अल्काटेल कंपनीला पुन्हा भारतात लाँच केले आहे.
आता सेठ हे NxtQuantum नावाची कंपनी भारतात लाँच करत आहेत. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार ही भारतीयच कंपनी असणार आहे जी भारतातच फोनचे डिझाईन करेल, भारतीयांचाच विचार करून उत्पादन करेल असे सांगितले जात आहे. NxtQuantum Shift Technologies असे या कंपनीचे नाव असून नोवा सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने एआय प्लस असे या फोनव ब्रँडिंग केले आहे, जे वन प्लस सारखे वाटत आहे.
नवीन फोन वाटत असला तरी त्यात जुने वापरलेले, रिसायकल केलेले पार्ट वापरले जाणार आहेत. यामुळे या फोनची किंमत ५ ते आठ हजारांच्या आत असणार आहे. एआय 5G सपोर्ट, एडवांस्ड फीचर, भारतीय लोकांसाठी ईको फ्रेंडली डिझाइन असणार आहे. यामध्ये युजर ऑपरेटिंग सिस्टिम कस्टमाईज करू शकणार आहे. २५ जूनपासून या फोनची विक्री सुरु होण्याची शक्यता आहे.
नोव्हा सिरीजच्या हँडसेटची विक्री २५ जूनपासून सुरू होईल. ते ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटद्वारे विकले जाईल. या सिरीजची सुरुवातीची किंमत ५००० रुपये आहे. तथापि, या हँडसेटबद्दल अधिक माहिती लवकरच उघड केली जाईल.