शहरं
Join us  
Trending Stories
1
समृद्धी महामार्ग राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कॉरिडॉर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
2
१९५७पासून कुटुंब काँग्रेससोबत, पण आता २ बंधू शिवसेनेत; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
3
आजचे राशीभविष्य: ०६ जून २०२५; आर्थिक लाभ होईल, खूप विचार व संताप मानसिक स्वास्थ्य बिघडवेल
4
उद्धव-राज यांनीच एकमेकांशी बोलायला हवे, आम्ही बोलून फरक पडणार नाही- अमित ठाकरे
5
१२ वर्षांनी बुध-गुरु युती: १६ दिवस ७ राशींना दुप्पट लाभ, व्यापार-नोकरीत यश; शुभ-कल्याण होईल!
6
प्लास्टिकला नो, पर्यावरणाला हो म्हणा; पंकजा मुंडे यांचे आवाहन; प्लास्टिकविरोधी मोहीम सुरू
7
धारावी पुनर्वसन: भाजपाचे आशिष शेलार अन् काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात ‘तू तू मै मै’
8
अकरावी प्रवेश: येत्या रविवारी गुणवत्ता प्रवेश फेरी; १२.७ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; मुदत संपुष्टात
9
रेल्वे स्थानकांवरील प्रवाशांची सुरक्षितता अजूनही वाऱ्यावरच; आगीच्या घटनेने जनतेत राग
10
शिक्षकांसाठीच्या परीक्षेत झाला गोंधळ; अनेक विवाहित महिला परीक्षेपासून वंचित
11
विधि सीईटीत १०० पर्सेंटाईलचे चार विद्यार्थी चौकशीच्या फेऱ्यात; गैरप्रकाराचा संशय
12
राज्यातील २९५ शिक्षण संस्थांची मान्यता रद्द; कामगिरी मूल्यांकन अहवाल न दिल्याने कारवाई
13
‘आरटीई’साठी १७६ कोटी मंजूर; पहिली ते आठवीपर्यंतच्या ४.७ लाख विद्यार्थ्यांना लाभ
14
९०३ जलसंधारण योजनांची प्रशासकीय मान्यता रद्द; रखडलेल्या प्रकल्पांना मुख्यमंत्र्यांचा दणका
15
तीन कोटींचे बक्षीस असलेला नक्षली नेता सुधाकर ठार; सुरक्षा जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक
16
चर्चगेट स्थानकात आगीमुळे पळापळ; ऐन गर्दीच्या वेळी दुर्घटना; फलाटांवर धुराचे लोट
17
वाशी- मानखुर्द प्रवास आता सुसाट वाशी खाडी पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचे लोकार्पण
18
Vijay Mallya News : ...तर भारतात परतण्याचा गांभीर्याने विचार करेन; फरार आरोपी विजय मल्ल्याचं मोठं विधान
19
मी नसतो तर डोनाल्ड ट्रम्प निवडणुकीत हरले असते; एलन मस्क यांनी पुन्हा साधला निशाणा
20
बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणी मोठी कारवाई; पोलीस आयुक्तांसह अनेक अधिकारी निलंबित

5G फोन पाच हजारांत! भारतात नवी कंपनी आपले स्मार्टफोन घेऊन येतेय; फोन नवा असणार, पण पार्ट जुने... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 15:45 IST

कल्पना तशी चांगली आहे. कारण जगात ईवेस्टचा कचरा वाढत चालला आहे. या निमित्ताने तो पुन्हा वापरात येईल आणि कमी होईल.

कोणाच्या डोक्यातून काय सुपिक कल्पना निघेल काहीच सांगता येत नाहीय. इथे भल्या भल्या कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत पाय रोवता येत नाहीएत आणि आता एक नवीन कंपनी येत आहे. ही कंपनी एक वेगळीच कल्पना घेऊन येत आहे, ती म्हणजे सर्वात स्वस्त ५जी स्मार्टफोन देण्याची. पण यासाठी ही कंपनी रिसायकल केलेले पार्ट वापरणार आहे. 

कल्पना तशी चांगली आहे. कारण जगात ईवेस्टचा कचरा वाढत चालला आहे. या निमित्ताने तो पुन्हा वापरात येईल आणि कमी होईल. रिअलमी, ऑनर, अल्काटेलसारख्या चायनिज कंपन्यांना भारतात लाँच करणारे माधव सेठ हे या कंपनीचे सीईओ आहेत. त्यांनी नुकतेच अल्काटेल कंपनीला पुन्हा भारतात लाँच केले आहे. 

आता सेठ हे NxtQuantum नावाची कंपनी भारतात लाँच करत आहेत. सध्याच्या उपलब्ध माहितीनुसार ही भारतीयच कंपनी असणार आहे जी भारतातच फोनचे डिझाईन करेल, भारतीयांचाच विचार करून उत्पादन करेल असे सांगितले जात आहे. NxtQuantum Shift Technologies असे या कंपनीचे नाव असून नोवा सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीने एआय प्लस असे या फोनव ब्रँडिंग केले आहे, जे वन प्लस सारखे वाटत आहे.

नवीन फोन वाटत असला तरी त्यात जुने वापरलेले, रिसायकल केलेले पार्ट वापरले जाणार आहेत. यामुळे या फोनची किंमत ५ ते आठ हजारांच्या आत असणार आहे. एआय 5G सपोर्ट, एडवांस्ड फीचर, भारतीय लोकांसाठी ईको फ्रेंडली डिझाइन असणार आहे. यामध्ये युजर ऑपरेटिंग सिस्टिम कस्टमाईज करू शकणार आहे. २५ जूनपासून या फोनची विक्री सुरु होण्याची शक्यता आहे. 

नोव्हा सिरीजच्या हँडसेटची विक्री २५ जूनपासून सुरू होईल. ते ऑनलाइन आणि ऑफलाइन मार्केटद्वारे विकले जाईल. या सिरीजची सुरुवातीची किंमत ५००० रुपये आहे. तथापि, या हँडसेटबद्दल अधिक माहिती लवकरच उघड केली जाईल.

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोन