शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तारुण्य हवे दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:21 IST

जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते, कारण निम्म्याहून जास्त भारतात तरुणांची संख्या आहे.

ठळक मुद्देपाश्चात्य देशाचं अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वत:च्या देशाची आदर्श संस्कृती मात्र विसरत चाललेयजात, पात, धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार?

जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते, कारण निम्म्याहून जास्त भारतात तरुणांची संख्या आहे. याच तरुणांच्या जीवावर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० साली भारत महासत्ता बनेल असे स्वप्न पाहिले. पण, हा तरुण आज चैनीच्या वस्तूमध्ये, प्रसारमाध्यमे, दूरदर्शन, मोबाईल, राजकारण व व्यसनाच्या नादी लागल्यामुळे इतका भरकटला गेला आणि आमचा तरुण इथेच उद्ध्वस्त व दिशाहीन झाला. आपला भारत महासत्ता होणार हे स्वप्न चिरडले.

आज चैनीच्या वस्तूंमुळे (मोबाईल,टीव्ही यांचा अतिरेकी वापर) तरुण वाचन करणे विसरला येथेच अर्धा तरुण उद्ध्वस्त झाला. तरुण पिढीला योग्य तो मार्गदर्शक मिळाला नाही. राजकीय नेत्यांनी, पक्ष-संघटनांनी तरुण पिढीच्या डोक्यात जाती-धर्म भरले आणि त्यांच्याकडून दंगली घडवून आणल्या. इतिहासाचे चुकीचे लेखन आणि त्याची तरुणांच्या समोर चुकीची मांडणी केली गेली. अशा अनेक कारणामुळे आजचा तरुण दिशाहीन झाला आहे.

तरुण म्हटलं की, आठवतं ते एक धगधगतं सळसळतं तरुण रक्त.. ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक असते. आजचा तरुण स्वत:ला डिफरंट समजतो, त्याची मानसिकता ही ग्लोबल आहे! बी प्रॅक्टिकल.. बी पर्टिक्युलर असं म्हणणारा हा वर्ग आहे, पण म्हणून डोळे झाकून कोणालाही फॉलो करू नये आणि आपण देखील समाजात घडणाºया या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी लक्ष देऊन समाजविधायक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन भावी पिढीसमोर एक आदर्श निर्माण करुन त्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे आहे. आजचा तरुण ‘स्मार्ट’ आहे, आणि असलाच पाहिजे, पण स्मार्टनेस आणि झगमगाट यातला फरक देखील ओळखायला पाहिजे. केवळ करिअर, पैसा, ऐषआरामाची जिंदगी एवढंच महत्त्वाचं नाही तर आजूबाजूला घडणाºया गोष्टींविषयी विचारमंथन व स्वत:ची भूमिका या गोष्टी देखील आवश्यक आहेत, पण याचे दुर्लक्ष तरुणाई करत आहे. 

तरुणांचे दिशाहीन तारुण्य आज व्यर्थ जात आहे. त्याच्यापेक्षा जास्त ते कुटुंबाला, समाजाला घातक होत आहे. तरुणांचा सळसळता उत्साह, बलदंड ताकदीने मुसमुसणारे शरीर तलवारीच्या दुधारी पात्यासारखे असते. त्यांना योग्य दिशेने वापरले तर शत्रूवर वार होतो आणि वापराची दिशा चुकली तर आत्मघात होतो. आज या तारुण्याचा उपयोग आणि वापर आत्मघातकीच जास्त प्रमाणात होत आहे आणि हो पुढारी लोक स्वत: च्या फायद्यासाठी करून घेत आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो वाहते पाणी उतार मिळेल त्या दिशेने वाहते  त्याला योग्य ठिकाणी जाण्यासाठी बांधाची आणि पाटाची गरज असते. बेजबाबदार, बेफिकीर वृत्ती, ऐतखाऊ आणि आळशी स्वभाव, निष्क्रिय आणि उधळी, मानसिकता यापैकी एकाची जरी लागण जवानीला झाली की सगळे मुसळ केरात जाते. मार्ग दिसेना आणि वाट कळेना, बहुतांशी अशी अवस्था तरुणांची झालेली आहे. ध्येय व फळ ठरविले की किती वेगाने पळायचे.. हे निश्चित करता येते. ध्येय ठरविलेले आणि योग्य दिशा मिळालेले तारुण्य सर्वोत्तम फळ देणारे ठरते. तारुण्य व शक्ती ही नेहमी मार्ग शोधत असते, ज्याला वेळेवर याची किंमत कळाली, त्याचे जीवन सफल होते.

वेळ, काळ बदलला तसे दुनियाही बदलली. पाश्चात्य देशाचं अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वत:च्या देशाची आदर्श संस्कृती मात्र विसरत चाललेय.  इंटरनेटने जग जवळ आले; मात्र माणसातील माणुसकी मात्र संपत चालली. संवेदना हरवलेली तरुणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झालेली दिसते. तर दुसरीकडे जात, पात, धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार? असा केविलवाणा प्रश्न पडतोय. आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्वाची. कन्फ्युज असलेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याची. आजचा तरुण उद्याची दशा आणि दिशा ठरवणारा आहे. तरुणांना पेटवणारे  व त्यांचा दुरुपयोग करून घेणारे खूप आहेत. तरुणांनी हे ओळखून ज्या त्या वयामध्ये त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तोपर्यंत वेळ निघून जाते आणि त्याची किंमत कळते.- प्रा. तात्यासाहेब काटकर(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा