शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

तारुण्य हवे दिशादर्शक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 16:21 IST

जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते, कारण निम्म्याहून जास्त भारतात तरुणांची संख्या आहे.

ठळक मुद्देपाश्चात्य देशाचं अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वत:च्या देशाची आदर्श संस्कृती मात्र विसरत चाललेयजात, पात, धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार?

जगातील सर्वात तरुण देश म्हणून भारताकडे पाहिले जाते, कारण निम्म्याहून जास्त भारतात तरुणांची संख्या आहे. याच तरुणांच्या जीवावर डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी २०२० साली भारत महासत्ता बनेल असे स्वप्न पाहिले. पण, हा तरुण आज चैनीच्या वस्तूमध्ये, प्रसारमाध्यमे, दूरदर्शन, मोबाईल, राजकारण व व्यसनाच्या नादी लागल्यामुळे इतका भरकटला गेला आणि आमचा तरुण इथेच उद्ध्वस्त व दिशाहीन झाला. आपला भारत महासत्ता होणार हे स्वप्न चिरडले.

आज चैनीच्या वस्तूंमुळे (मोबाईल,टीव्ही यांचा अतिरेकी वापर) तरुण वाचन करणे विसरला येथेच अर्धा तरुण उद्ध्वस्त झाला. तरुण पिढीला योग्य तो मार्गदर्शक मिळाला नाही. राजकीय नेत्यांनी, पक्ष-संघटनांनी तरुण पिढीच्या डोक्यात जाती-धर्म भरले आणि त्यांच्याकडून दंगली घडवून आणल्या. इतिहासाचे चुकीचे लेखन आणि त्याची तरुणांच्या समोर चुकीची मांडणी केली गेली. अशा अनेक कारणामुळे आजचा तरुण दिशाहीन झाला आहे.

तरुण म्हटलं की, आठवतं ते एक धगधगतं सळसळतं तरुण रक्त.. ज्याच्यामध्ये लाथ मारेल तिथं पाणी काढण्याची धमक असते. आजचा तरुण स्वत:ला डिफरंट समजतो, त्याची मानसिकता ही ग्लोबल आहे! बी प्रॅक्टिकल.. बी पर्टिक्युलर असं म्हणणारा हा वर्ग आहे, पण म्हणून डोळे झाकून कोणालाही फॉलो करू नये आणि आपण देखील समाजात घडणाºया या घडामोडींकडे उघड्या डोळ्यांनी लक्ष देऊन समाजविधायक कार्यात सक्रिय सहभाग घेऊन भावी पिढीसमोर एक आदर्श निर्माण करुन त्यांना प्रेरणा देणे महत्त्वाचे आहे. आजचा तरुण ‘स्मार्ट’ आहे, आणि असलाच पाहिजे, पण स्मार्टनेस आणि झगमगाट यातला फरक देखील ओळखायला पाहिजे. केवळ करिअर, पैसा, ऐषआरामाची जिंदगी एवढंच महत्त्वाचं नाही तर आजूबाजूला घडणाºया गोष्टींविषयी विचारमंथन व स्वत:ची भूमिका या गोष्टी देखील आवश्यक आहेत, पण याचे दुर्लक्ष तरुणाई करत आहे. 

तरुणांचे दिशाहीन तारुण्य आज व्यर्थ जात आहे. त्याच्यापेक्षा जास्त ते कुटुंबाला, समाजाला घातक होत आहे. तरुणांचा सळसळता उत्साह, बलदंड ताकदीने मुसमुसणारे शरीर तलवारीच्या दुधारी पात्यासारखे असते. त्यांना योग्य दिशेने वापरले तर शत्रूवर वार होतो आणि वापराची दिशा चुकली तर आत्मघात होतो. आज या तारुण्याचा उपयोग आणि वापर आत्मघातकीच जास्त प्रमाणात होत आहे आणि हो पुढारी लोक स्वत: च्या फायद्यासाठी करून घेत आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो वाहते पाणी उतार मिळेल त्या दिशेने वाहते  त्याला योग्य ठिकाणी जाण्यासाठी बांधाची आणि पाटाची गरज असते. बेजबाबदार, बेफिकीर वृत्ती, ऐतखाऊ आणि आळशी स्वभाव, निष्क्रिय आणि उधळी, मानसिकता यापैकी एकाची जरी लागण जवानीला झाली की सगळे मुसळ केरात जाते. मार्ग दिसेना आणि वाट कळेना, बहुतांशी अशी अवस्था तरुणांची झालेली आहे. ध्येय व फळ ठरविले की किती वेगाने पळायचे.. हे निश्चित करता येते. ध्येय ठरविलेले आणि योग्य दिशा मिळालेले तारुण्य सर्वोत्तम फळ देणारे ठरते. तारुण्य व शक्ती ही नेहमी मार्ग शोधत असते, ज्याला वेळेवर याची किंमत कळाली, त्याचे जीवन सफल होते.

वेळ, काळ बदलला तसे दुनियाही बदलली. पाश्चात्य देशाचं अनुकरण करताना आमची तरुणाई मात्र स्वत:च्या देशाची आदर्श संस्कृती मात्र विसरत चाललेय.  इंटरनेटने जग जवळ आले; मात्र माणसातील माणुसकी मात्र संपत चालली. संवेदना हरवलेली तरुणाई अडीच अक्षरी प्रेमात वेडी झालेली दिसते. तर दुसरीकडे जात, पात, धर्म यात अडकलेली तरुणाई कसला आणि काय देशाचा विकास करणार? असा केविलवाणा प्रश्न पडतोय. आजच्या तरुणाईला गरज आहे ती आदर्श विचारांची आणि कुशल नेतृत्वाची. कन्फ्युज असलेल्या तरुणांना मार्ग दाखवण्याची. आजचा तरुण उद्याची दशा आणि दिशा ठरवणारा आहे. तरुणांना पेटवणारे  व त्यांचा दुरुपयोग करून घेणारे खूप आहेत. तरुणांनी हे ओळखून ज्या त्या वयामध्ये त्या गोष्टी केल्या पाहिजेत. तोपर्यंत वेळ निघून जाते आणि त्याची किंमत कळते.- प्रा. तात्यासाहेब काटकर(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा