शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

घरच्या लोकांसाठी तुमचा जीव महत्त्वाचा, भंगार गाड्यात लटकून धोका पत्करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2021 11:38 IST

मुदत संपल्यावरही अनेक गाड्या रस्त्यावर : क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक

विठ्ठल खेळगी

सोलापूर : पंधरा वर्षांनंतर जुन्या वाहनांची वयोमर्यादा संपते. अशा धोकादायक वाहनांचे नूतनीकरण होणे गरजेचे आहे. मात्र, शहरात १५ वर्षांवरील वाहने आजही रस्त्यावर क्षमतेपेक्षा अधिक प्रवास घेऊन नियमित धावतात. अशा वाहनांमधून प्रवासांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. दुर्दैवाने अपघात झाल्यास निष्पाप लोकांचा बळी जातो. त्यामुळे भंगार वाहने रस्त्यावर हद्दपार करण्यासाठी कडक पाऊले उचलण्याची गरज आहे.

दररोज शेकडो वाहने रस्त्यावर धावत आहेत. मोटार वाहन कायद्यानुसार पंधरा वर्षांनंतर वाहनांची वयोमर्यादा ओलांडल्यानंतर दर पाच वर्षांनी वाहनांचे नूतनीकरण करून कर भरणे आवश्यक आहे. सध्या आरोग्याचे प्रश्न देखील ऐरणीवर आहेत. वाहन अनफिट असेल तर त्वरित कार्यवाही करून स्क्रॅप करणे अत्यावश्यक आहे. वाहनांची वयोमर्यादा संपुष्टात आल्यास अशी वाहने आरटीओने कारवाईमध्ये थेट जप्त करायला हवीत. गेल्या पंधरा दिवसांत एसटी गाड्या बंद असल्यामुळे खासगी गाड्या मोठ्या प्रमाणात धावत होत्या. भंगार गाड्यांतून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जाताना दिसून आले. शिवाय टेम्पोंमधून माणसे उभारुन लटकत जातानाही पाहायला मिळाले. जीव धोक्यात घालून प्रवास करू नये, कारण जीव महत्त्वाचा आहे.

.......

प्रवासी वाहनांची तपासणी करताना भंगार गाड्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येते. फिटनेस प्रमाणपत्र नसेल, तर ती गाडी ताब्यात घेऊन दंडात्मक कारवाई करण्यात येते. प्रवाशांनीही मुदत संपलेल्या जुन्या गाड्यातून प्रवास करून जीव धोक्यात घालू नये.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी.

नाईलास्तव मिळेल त्या गाडीत बसावे लागले

एसटी गाड्या बंद आहेत. शिवाय एसटी गाड्या सुरु असतानाही अनेकवेळा त्या गाड्या फुल्ल असतात. खाजगी गाड्यात माणसे कोंबून भरतात. मात्र, नाईलास्तव मिळेल त्या गाडीत बसूनच प्रवास करावा लागतो.

- अमर कांबळे, प्रवासी

खाजगी वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असतात. गाड्या जुन्या झालेल्या असतात. तरीही रस्त्यावर धावतात. एसटी भेटत नसल्यामुळे त्याच भंगार गाड्यातूनच प्रवास करावा लागतो.

- सिद्धनाथ म्हेत्री, प्रवासी

..............

दीडपट भाडे देऊनही जिवाला धोका

गेल्या पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. कर्मचारी संपावर असल्याने बस सेवा ठप्प झाली आहे. याचा फायदा आता खसगी वाहतूकदारांना होताना दिसत आहे. एसटी बस सेवा बंद असल्याने खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची लूट सुरू असून, भाड्यामध्ये तब्बल दीडपटीने वाढ करण्यात आली आहे. दीडपट भाडे देऊन देखील बऱ्याच वेळा वाहन वेळेवर मिळत नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.

.............

जिल्हातील एकूण प्रवासी वाहने : १८२२९

टॅग्स :SolapurसोलापूरRto officeआरटीओ ऑफीसST Strikeएसटी संप