शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
2
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
3
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
4
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
5
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
6
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
7
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
8
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
9
निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल
10
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
11
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
12
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
13
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
14
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
15
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
16
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
17
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
18
मुलाच्या ‘बर्थ डे’साठी घरी निघाला होता शहीद जवान; मृत्यूचा बदला घेण्यासाठी दहशतवाद्यांचा कसून शोध सुरू
19
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा
20
तंत्रज्ञानाचा वापर खेळासाठी चांगला; भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंचाचे मत

आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 1:13 PM

सिद्धवचन - दुःख

अपत्याच्या दुःखे | कष्टी बाप - माय |

इतरांस काय | दुःख त्याचे ? || २४९.६ ||(अभंगगाथा)

  आपल्या सदाचार आणि दुराचाराला आपणच जबाबदार असतो. दुसऱ्याने सदाचार केला. त्याचे मोक्षरूपी फल आपल्याला मिळणार आहे काय ? दुसऱ्याच्या दुराचारामुळे आपण भवपाशात ढकलले जाणार आहोत काय ? हे देवा, आमचे लक्ष लिंगावर असते. तुझे लक्ष आमच्यावर असते. माझे हे शब्द खोटे ठरवू नकोस. मुलांचे दुःख पाहून त्याच्या आई-वडिलांनाच दुःख होते. इतरांना दुःख होत नाही. हे कपिलसिद्ध मल्लिकार्जुना, आमचे दुःख तुझेच दुःख होय.

परमेश्वराची सेवा, चिंतन, नामस्मरण, भक्ती मनापासून केली की आपल्याला तो निश्चिंत करतो. जगद्गुरु तुकोबारायांनी ' घालूनियां भार राहिलों निश्चिंतीं || ३४५५.१ || असे म्हटले आहे. आपली सगळी चिंता त्याला असते. याचे ज्ञान ज्याला नाही तो चिंता करीत बसतो. याचे ज्ञान ज्याला झाले आहे तो निश्चिंत असतो. लक्ष्मण महाराज म्हणतात, ' दुःख निवारी शंकर | करा वश गंगाधर || १४४९.१ || शंकराला वश करण्यासाठी भक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला.

शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी आत्मविश्वासाने सांगितले आहे ; हे मल्लय्या तुझे लक्ष आमच्यावर असते. मल्लय्याचे लक्ष आपल्याकडे राहावे यासाठी शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी केलेले चिंतन, भक्ती आपल्यालाही करावी लागेल.

मल्लय्याची सेवा | करुया मनाने |

दुःख जाते त्याने | निश्चितच || १ ||

आपलेही दुःख | घेतो शिरावरी |

करू भक्ती खरी | तेव्हाच हो || २ ||

सिद्धदास म्हणे | करू आता भक्ती |

मग मिळे शक्ती | सर्वार्थाने || ३ ||

- डॉ. अनिल काशीनाथ सर्जे, सोलापूर

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक